शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अरे देवा, पती देवांना तर पत्नीचाही मोबाईल क्रमांक आठवेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST

डमी 895 रिॲलिटी चेक लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मोबाईलमुळे सुविधा वाढल्या असल्या तरी काही प्रमाणात अनेक घटकांवरही परिणाम ...

डमी 895

रिॲलिटी चेक

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मोबाईलमुळे सुविधा वाढल्या असल्या तरी काही प्रमाणात अनेक घटकांवरही परिणाम झाला. यात घड्याळ, वॉकमन, टॉर्च यांच्या मागणीवर परिणाम झाला, त्याचप्रमाणे मोबाईल क्रमांकदेखील लक्षात ठेवला जात नसल्याने मेंदूही आळशी होत असल्याचे समोर येत आहे. हा विसराळूपणा नाही तर आळसपणा असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मोबाईल क्रमांक पाठ असण्याविषयी काही जणांकडे विचारणा केली असता १० पैकी सात जणांना तर पत्नीचाही क्रमांक पाठ नसल्याचे आढळ‌ून आले. विशेष म्हणजे लहान मुले, महिला यांना मोबाईल क्रमांक पाठ होता.

गेल्या काही दिवसांत मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून संपर्क साधण्याचे माध्यम असण्यासह करमणूक म्हणूनही त्याकडे पाहिले जाते. इतकेच मोबाईल सोबत राहत असल्याने कोणाचेही संपर्क क्रमांक त्यात आपण सेव्ह करीत असतो. त्यामुळे आता मोबाईल अथवा दूरध्वनी क्रमांक पाठ राहत नाही. कोणीही भेटले किंवा नवीन ओळख झाली की, त्यांचा नंबर नावाने मोबाइलमध्ये ठेवण्याची सवय झाली आहे. कोणाला फोन करायचा झाल्यास त्या-त्या नावाने नंबर शोधून थेट डायल करण्याची सवय लागली आहे.

यामुळे आता घरच्या मंडळींचेही संपर्क क्रमांक पाठ आहेत की नाही, या विषयी लोकमतने शहरातील काव्यरत्नावली चौकात काही जणांशी संवाद साधला. यामध्ये १० पैकी सात जणांना आपल्या पत्नीचेही क्रमांक पाठ नसल्याचे समोर आले.

तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारे सारखेच

एकूण दहा जणांपैकी सात जणांना पत्नीचा मोबाईल नंबर आठवला नाही. त्यात चार तरुण पतींचाही समावेश होता, तर दोन वृद्धांचा आणि एक मध्यम वयाच्या व्यक्ती होत्या. त्यांना पत्नीचा मोबाईल नंबर पाठ नव्हता. एकूणच तरुणांपासून वृद्धांपर्यंत सर्वच जण मोबाईलमध्ये क्रमांक सेव्ह करीत असल्याने ते लक्षात ठेवत नसल्याचे आढळून आले.

लोकमत @ काव्यरत्नावली चौक

एका जणाला पत्नीचा क्रमांक आठवत नव्हता मात्र कार्यालयाचा क्रमांक तोंडपाठ असल्याचे आढळून आले.

एका जणाने पत्नीच्या मोबाईल क्रमांकाचे सुरुवातीचे काही क्रमांक सांगितले, मात्र पुढचे क्रमांक सांगितले नाहीत.

एका जणाने तर कार्यालयातील काही सहकाऱ्यांचे क्रमांक सांगितले, मात्र घरातील क्रमांक सांगता आले नाहीत.

एका शिक्षकाने मोबाईलचे कारण सांगत त्यात आपण मोबाईल क्रमांक सेव्ह करीत असतो, त्यामुळे पाठ ठेवत नसल्याचे सांगितले.

१० पैकी सात जणांना वेगवेगळे कारण सांगत मोबाईल क्रमांक पाठ नसल्याचे सांगितले.

बायकांना पती देवाचा नंबर पाठ

बाहेर कोठे जायचे झाल्यास बऱ्याचवेळी एकटे जावे लागते. त्यामुळे सोबत मोबाईल असो अथवा नसो, पीसीओवरून पतीशी संपर्क साधण्याचे काम पडले तर मोबाईल क्रमांक आठवावा, यासाठी अगोदरचपासूनच मोबाईल क्रमांक पाठ आहे. आता पीसीओ नसले तरी क्रमांक अजूनही पाठ आहे.

- एक गृहिणी

पती बाहेर गेलेले असले की घरी असलेल्या दूरध्वनीवरून त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी त्यांचा क्रमांक लावताना तो पाठ होऊन गेला. त्यामुळे मोबाईल आला तरी क्रमांक अजूनही पाठ आहे.

- एक गृहिणी

मुलांना आई-बाबांचा क्रमांक पाठ

आई-वडिलांसह नातेवाईकांचे मोबाईल क्रमांक तोंडपाठ आहेत. आई-वडिलांसह नातेवाईकांचे मोबाईल नंबर तत्काळ सांगू शकतो. मावशीसह इतरांचेही मोबाईल नंबर पाठ आहेत.

- हर्षल कुलकर्णी, विद्यार्थी

आई, बहिणीसह इतर नातेवाईकांचे नंबर लक्षात आहेत. शाळेत अथवा इतर ठिकाणाहून मोबाईल लावायचे काम पडल्यास क्रमांक पाठ असल्याने लगेच फोन लावता येतो.

- आशुतोष महाजन, विद्यार्थी

ज्या गोष्टी आ‌वश्यक आहेत, त्याच गोष्टी मनुष्य लक्षात ठेवत असतो. हा विसराळूपणा नाही तर आळसपणा आहे. मनुष्याचा मेंदू कितीही क्रमांक लक्षात ठेवू शकतो; मात्र तंत्रज्ञानाकडे जसे वळत आहे, तसा आळसपणा येत आहे. हा आळसपणा घालविण्यासाठी प्राधान्यक्रम ठरविणे महत्त्वाचे आहे.

- डॉ. पंकज संघवी, मानसोपचार तज्ज्ञ