शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जळगाव तालुक्यातील १९७ बीएलओंवर आज दाखल होणार गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 19:21 IST

दुपारपर्यंत काम सुरू करण्याची संधी: तहसीलदार निकम यांचा इशारा

ठळक मुद्दे छायाचित्रासह मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमशहरात ३८२ व तालुक्यातील ग्रामीण भागात ७८ बीएलओंची नियुक्तीशहरातील १५८ व तालुक्यातील ग्रामीण भागातील ३९ बीएलओंकडून कामाला सुरूवातच नाही

जळगाव: मतदार याद्या पडताळणी व नोंदणीसाठी तालुक्यात नेमलेल्या ४६० बीएलओंपैकी शहरातील १५८ व तालुक्यातील ग्रामीण भागातील ३९ अशा एकूण १९७ बीएलओंनी कारवाईचा इशारा देऊनही अद्याप कामच सुरू केलेले नाही. या बीएलओंना सोमवार दि.२७ रोजी दुपारपर्यंतची अंतीम संधी देण्यात आली असून दुपारपर्यंत कामाला सुरवात न केल्यास त्यांच्याविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार अमोल निकम यांनी ‘लोकमत’ला दिली.छायाचित्रासह मतदार याद्यांचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी जास्तीत जास्त अचूक होण्यासाठी व मतदारांना मतदान विषयक चांगल्या सुविधा देता याव्यात याकरिता या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांनी (बीएलओ) घरोघरी भेट देवून मतदारांची पडताळणी व नोंदणी करण्याचे भारत निवडणूक आयोगाने निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार शहरात ३८२ व तालुक्यातील ग्रामीण भागात ७८ बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे.१५ तारखेला या मोहीमेला सुरूवात झाली असल्याने शहरातील ३८२ व तालुक्यातील ग्रामीण भागातील ७८ बीएलओंनी केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार, २४ रोजी तालुक्यातील बीएलओंची बैठक तहसीलदार अमोल निकम, नायब तहसीलदार रूपाली काळे यांच्या उपस्थितीत झाली. त्यात बीएलओंनी अडचणींचा पाढा वाचला होता. ज्या कर्मचाºयांची बीएलओ म्हणून नियुक्ती होऊनही त्यांनी अद्यापही काम सुरू केलेले नसेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा तहसीलदार निकम यांनी दिला होता. मात्र शनिवार, दि.२५ रोजीही या बीएलओंनी कामाला सुरूवात केलेली नव्हती. त्यामुळे तहसीलदार कार्यालयाने या बीएलओंवर कारवाईची तयारी केली आहे. मात्र त्यांना सोमवार, दि.२७ रोजी दुपारपर्यंत अखेरची संधी दिली आहे. या कालावधीपर्यंत या बीएलओंनी कामास सुरूवात न केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.