शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहाराबाबत उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2019 16:50 IST

दुष्काळी परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये सुट्टीच्या कालावधीत शालेय पोषण आहार शिजवण्याचा स्तुत्य उपक्रम शिक्षण विभागाने राबवलेला असला तरी विद्यार्थीच नसल्याने या योजनेची दैनावस्था झाली आहे.

ठळक मुद्देप्रशासन आहे मात्र लाभार्थीच नाहीमुक्ताईनगर तालुक्यातील अशीही स्थिती

विनायक वाडेकरमुक्ताईनगर, जि.जळगाव : दुष्काळी परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये सुट्टीच्या कालावधीत शालेय पोषण आहार शिजवण्याचा स्तुत्य उपक्रम शिक्षण विभागाने राबवलेला असला तरी विद्यार्थीच नसल्याने या योजनेची दैनावस्था झाली आहे. विशेष म्हणजे प्रशासन हजर आहे, मात्र लाभार्थीच नसल्याची वेगळीच गत या योजनेची गेल्या महिन्याभरात झालेली दिसून येत आहे.मुक्ताईनगर तालुका हा महसूल विभागांतर्गत दुष्काळी तालुका म्हणून घोषित करण्यात आला आहे. दुष्काळी परिस्थिती असल्याने विविध उपाययोजना व विविध शासकीय योजना लाभार्र्थींपर्यंत पोहोचवल्या जात आहेत. त्यातीलच एक योजना म्हणजे शालेय विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविणे.दुष्काळी तालुक्यांमध्ये सुट्टीच्या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबवली जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ही योजना राबवली जात असताना मुक्ताईनगर तालुक्यातदेखील ही योजना राबवली जात आहे. मात्र योजनेचे लाभार्थी यासंदर्भात लाभ घेण्यापासून दूर राहत असल्याची वेगळीच बाब लक्षात येत आहे.सुट्टीचे दिवस वगळता २ मे २०१९ पासून ही योजना १३ जून २०१९ पर्यंत सर्व जि.प. शाळा, माध्यमिक शाळांमध्ये राबवली जात आहे. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या या शालेय पोषण आहार योजनेचा मात्र दुष्काळी तालुक्यातच फज्जा उडत असल्याचे दिसून येत आहे.मुक्ताईनगर तालुक्यात १२१ जि.प. शाळा,१६ माध्यमिक शाळा,१२ कनिष्ठ महाविद्यालये, २ वरिष्ठ महाविद्यालय, ३ आश्रमशाळा असून शैक्षणिकदृष्ट्या आघाडीवर असलेला मुक्ताईनगर तालुका आहे.त्यातील जि.प., माध्यमिक व आश्रम शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवला जाणार होता. मात्र २ मेपासून शाळेला सुट्टी लागल्यानंतर बहुतांशी शाळांमध्ये एकही विद्यार्थी शाळा आवारात फिरकत नसल्याने पोषण आहार शिजवायचा कोणासाठी? असा प्रश्न शालेय प्रशासनाला पडला आहे.मुक्ताईनगर तालुक्यात पहिली ते आठवीसाठी जवळपास सात हजार विद्यार्थी हे शालेय पोषण आहारासाठी लाभार्थी आहेत..मात्र एकही विद्यार्थी शाळेच्या आवारात फिरकत दिसून येत नाही. प्रत्येक शाळेमध्ये प्रशासनातर्फे मुख्याध्यापकांमार्फत एका शिक्षकाची नेमणूक केलेली आहे. नेमणूक केलेले शिक्षक, पोषण आहार शिकवणारे कर्मचारी हे शाळेत जरी हजर राहत असले तरी विद्यार्थीच नसले तर पोषण आहार शिजवायचा कुणासाठी? असा खरा प्रश्न निर्माण होत आहे.यासंदर्भात मुक्ताईनगर तालुक्यातील विविध माध्यमिक व जि.प. शाळांमध्ये भेटी दिल्या असता सकाळी १० वाजेपर्यंत शिक्षक व शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या अंगणवाडी, बचत गटात योजनेच्या महिला किंवा अन्य महिला या शालेय आवारात दिसतात. मात्र विद्यार्थीच येत नसल्याने पोषण आहार शिजवायचा कशासाठी? असा प्रश्न त्यांच्यासमोर पडतो. त्यामुळे ही योजना बारगळली यातच जमा आहे.शिक्षकांकडून पुरेशी जागृतीदुष्काळी तालुक्यांमध्ये योजनेसंदर्भात जनजागृती ही शिक्षकांनी शाळेला सुट्टी लागण्यापूर्वीच नियोजनपूर्वक केलेली असली तरी विद्यार्थी मात्र यासंदर्भात जागरूक नाही, ही बाब तेवढेच सत्य आहे. एका अर्थाने ‘प्रशासन आहे मात्र लाभार्थीच नाही’ अशी विचित्र गत या योजनेची झाली आहे.मुक्ताईनगर तालुक्यात शालेय पोषण आहार देण्यासंदर्भात सर्व शाळांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार शिक्षकांच्या पाळ्या लावण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांशी शाळांमध्ये विद्यार्थीच येत नसल्याचे दुर्दैव आहे. मेहुण (कासा) सारख्या शाळेत मात्र दहा ते बारा विद्यार्थी हजर राहतात, ही मात्र तेवढीच आशेचे किरण असलेली बाब आहे.-विजय सरोदे, गटशिक्षणाधिकारी, मुक्ताईनगर.उन्हाळ्याच्या सुट्टीत शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी शिक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र आपल्याकडे पाचवी ते आठवीच्या एकूण २६ तुकड्या असतानादेखील विद्यार्थ्यांची उपस्थिती शून्य असल्याने शालेय पोषण आहार कोणासाठी शिजवावा, हाच प्रश्न पडत आहे.-आर.पी.पाटील, मुख्याध्यापक, जगजीवनदास इंग्लिश स्कूल, मुक्ताईनगर. 

टॅग्स :SchoolशाळाMuktainagarमुक्ताईनगर