शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याची प्रवाशी संख्या निम्म्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:15 IST

कोरोना परिणाम : जिल्हा बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यापासून कोरोनाने ...

कोरोना परिणाम : जिल्हा बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची संख्या घटली

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवड्यापासून कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे याचा परिणाम मोठ्या प्रमाणावर महामंडळाच्या प्रवासी संख्येवर झाला आहे. यामध्ये नेहमी उत्स्फूर्त प्रतिसाद असलेल्या पुण्याच्या मार्गावरील प्रवाशांची संख्या निम्म्यावर आली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रवाशांनी तिकीट आरक्षणाकडे पाठ फिरवून, बाहेतगावी जाणाऱ्यांची संख्या निम्म्यावर आली आहे.

कोरोनामुळे महामंडळाची सेवा सहा महिने बंद होती. कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाल्यानंतर टप्प्या-टप्प्याने महामंडळाची सेवा पूर्ववत सुरू झाली. महामंडळातर्फे सर्व लांब पल्ल्याच्या मार्गावरच्या बसेस सुरू करण्यात आल्या. यामध्ये पुणे, वसई, लातूर व परराज्यातील बसेससाठी आरक्षणाची सुविधाही सुरू करण्यात आली. यामुळे प्रवाशांचा या सेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. परंतु,आता कोरोनामुळे पुन्हा पहिल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, प्रवाशांची संख्या निम्म्यावर आली आहे.

इन्फो :

मुख्यालयातून ,सध्या ३०० फेऱ्या

महामंडळाच्या जळगाव विभागातील जळगाव आगार हे जिल्ह्याचे मुख्यालय असून, या ठिकाणाहून राज्यात सर्व ठिकाणी बसेस सुटतात. कोरोनापूर्वी जळगाव आगारातून दिवसभरात ५०० ते ५५० फेऱ्या व्हायच्या.मात्र,आता कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटल्याने, सध्या जळगाव आगारातून ३०० फेऱ्या होत आहेत.

इन्फो :

सर्व मार्गावरील बसेसच्या आरक्षणाला अल्प प्रतिसाद

सध्या जळगाव आगारातून वसई, पुणे, लातूर, सेलवास, वापी या मार्गावरील बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत. प्रवाशांना एक महिना आधी या बसेसचे आरक्षण करण्याची सुविधा आहे.मात्र, कोरोनामुळे या सर्व मार्गावरील बसेसचे आरक्षण घटले आहे. यात बहुतांश मार्गावरील आरक्षण संख्या निम्म्यावर आली असून, काही मार्गावर आरक्षणही होत नसल्याची माहिती देण्यात आली.

इन्फो :

रातराणीची फक्त एकच बसेस

सध्या जळगाव आगारातून वसई येथेच रातराणी बस सेवा सुरू आहे. दररोज जळगाव आगारातून सायंकाळी ही बस सुटत असते. सुरुवातीला या बसला उत्स्फूर्त प्रतिसाद होता. मात्र, आता कोरोनामुळे या रातराणी बसलाही प्रवाशांचा अत्यल्प प्रतिसाद असल्याचे आगार प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

इन्फो :

जिल्हाबाहेर जाणाऱ्यांची संख्या घटली

दिवाळीनंतर कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे महामंडळाच्या सेवेला टप्प्या-टप्प्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. आगार प्रशासनातर्फे सर्व मार्गावरच्या फेऱ्या नियमित करण्यात आल्या होत्या. मात्र,गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्याने, प्रवाशी संख्या घटू लागली आहे. परिणामी जिल्हाबाहेर जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत मोठी घट निर्माण झाल्याचे सांगण्यात आले.

इनफो

सध्या कोरोनामुळे प्रवाशांची संख्या घटली असून,यामुळे जळगाव सह जिल्हाभरातून ९०० फेऱ्या कमी केल्या आहेत. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यानंतर पुन्हा फेऱ्या पूर्ववत करण्यात येतील.

दिलीप बंजारा, विभागीय वाहतूक अधिकारी