शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

मेहरुण तलावावर विदेशी पक्ष्यांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : यंदा सर्वदुर असलेली पाण्याची मुबलकता, तलाव व धरणांमध्ये खोलगट करण्यात आलेला भाग यामुळे यंदा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : यंदा सर्वदुर असलेली पाण्याची मुबलकता, तलाव व धरणांमध्ये खोलगट करण्यात आलेला भाग यामुळे यंदा मेहरुण तलाव परिसरात विदेशी पक्ष्यांनी पाठ फिरवली आहे. निसर्ग मित्र संस्थेतर्फे रविवारी मेहरूण तलाव परिसरात पक्षी निरीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जानेवारी महिन्यात नेहमी देशी-विदेशी पक्ष्यांच्या चिवचिवाटामुळे गजबजणारा तलाव यंदा शांत असल्याचे आढळून आले. काही स्थानिक व विदेशी पक्ष्यांनी तलाव परिसरात हजेरी लावली असली तरी अनेक पक्ष्यांनी यंदा मेहरूण तलाव परिसराकडे पाठ फिरविल्याचेच दिसून येत आहे.

निसर्गमित्र संस्थेतर्फे रविवारी मेहरुण तलाव परिसरात पक्षी निरीक्षण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये संस्थेचे प्रमुख राजेंद्र गाडगीळ, शिल्पा गाडगीळ यांच्यासह उपजिल्हाधिकारी रविंद्र भारदे, डॉ.अक्षता महा, कनिष्का कुलकर्णी, लावण्या कुलकर्णी यांच्यासह काही विद्यार्थ्यांनी पक्षी निरीक्षणात सहभाग घेतला. पक्षीनिरीक्षणादरम्यान एकूण ४७ प्रकारच्या प्रजाती आढळून आल्या. यामध्ये वॉटर बर्ड, पांढरा पक्षी , चार प्रजातीचे बदक, तुतारी, चिखल्या, शेकाटे, बगडे, पानकावळे, पान कोंबड्या, हीरॉन,पॉन हीरॉन सैबेरीया श्वेत कंठी युरोप, आशियाई तपकीरी माशीमार, पिवळा धोबी उत्तरेकडून वारकरी बदक, हळदी-कुंकु बदक या पक्ष्यांचा समावेश आहे.

पक्ष्यांची संख्या कमी होण्याचे कारण

यंदा सर्वदुर पाऊस झाला आहे. त्यामुळे पाण्याचा शोधात महाराष्ट्रापर्यंत येणारे पक्षी मध्यप्रदेश, राजस्थान या भागातच थांबले आहेत. यासह मेहरूण तलाव परिसरात गाळ काढताना, काही टेकळ्या देखील काढण्यात आल्या. यामुळे पक्ष्यांना लागणारी पाणथळ जागा मेहरूण तलावात कमी झाली आहे. खोल पाण्यात पक्ष्यांना अन्न मिळत नाही. तसेच पक्षी या पाण्यात उभे सुध्दा राहू शकत नाहीत. मनपाकडून गाळ काढताना चुकीची पध्दत वापरल्याने पक्ष्यांनी मेहरूण तलावाकडे पाठ फिरवल्याचे पक्षीमित्र राजेंद्र गाडगीळ यांनी सांगितले.

फेब्रुवारीत पक्ष्यांची वाढू शकते संख्या

मेहरूण तलाव परिसरात साधारणपणे डिसेंबर महिन्यापासून विदेशी पक्ष्यांचे आगमण होत असते. मार्च महिन्याचा शेवटच्या आठवड्यानंतर या पक्ष्यांचा परतीचा प्रवास सुरु होत असतो. दरम्यान, जानेवारी महिन्यात जरी पक्ष्यांनी पाठ फिरवली असली तरी मात्र फेब्रुवारी महिन्यात ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. कारण, तलाव परिसरातील पाणी कमी होईल त्यामुळे पाणथळ जागा तयार होईल, यामुळे पक्ष्यांना मुबलक अन्न उपलब्ध होईल.