शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

प्रदेश काँग्रेसवरील जिल्ह्याची संख्या चारवरून एकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : काँग्रेसच्या गत कार्यकारिणीत जिल्ह्याला चार पदे मिळाली होती, यंदा मात्र ही संख्या एकवर आली ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : काँग्रेसच्या गत कार्यकारिणीत जिल्ह्याला चार पदे मिळाली होती, यंदा मात्र ही संख्या एकवर आली आहे. गेल्या कार्यकारिणीतील केवळ आमदार शिरीष चौधरी यांची प्रदेश सरचिटणीसपदावरून प्रदेश उपाध्यक्षपदावर निवड करण्यात आली आहे. मात्र, विस्तारित कार्यकारिणीत आणखी पदे मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रदेश कार्यकारिणी जाहीर करताना प्रत्येक जिल्ह्यातील एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्यास या कार्यकारिणीत घेतले जाते. मात्र, जळगावाला त्यामानाने झुकते माप मिळाले होते. जिल्ह्याला प्रदेशवार चार पदे मिळाली होती. यंदा मात्र, कार्यकारिणीत बदल होऊन पहिल्या कार्यकारिणीत जिल्ह्याला एकच पद मिळाले आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणावर याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तविली जात असली तरी सर्व एकत्रित मिळूनच काम करणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येते.

प्रदेशस्तरावर पदे मात्र महानगराध्यक्षपद रिक्त

काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची प्रदेशवार निवड होत असली तरी त्याचा स्थानिक काँग्रेस वाढीसाठी फायदा होत नसल्याचे चित्र आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ एकच जागा लढवायला मिळाली होती. ती काँग्रेसने जिंकली. मात्र, आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये एकत्रित परिस्थिती बघता यश मिळविणे हे काँग्रेसला सोपे नसेल, असे एकत्रित चित्र आहे. त्यातच गेल्या दीड वर्षापासून काँग्रेसचे जळगाव महानगराध्यक्षपद रिक्तच असून, जिल्हाध्यक्ष ॲड. संदीप पाटील यांच्याकडे हा पदभार आहे. यामुळे शहरात काँग्रेस पक्षाची संघटना आहे कुठे? असाही एक प्रश्न उपस्थित केला जातो.

...अशी होती गत कार्यकारिणी

तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कार्यकारिणीत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याकडे प्रदेश उपाध्यक्ष, डी.जी. पाटील यांच्याकडे प्रदेश सचिव, आमदार शिरीष चौधरी यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस व ललिता पाटील यांच्याकडे प्रदेश सरचिटणीस, अशी जबाबदारी सोपविण्यात आली होती. यात ललिता पाटील भाजपमध्ये गेल्याने हे पद रिक्त होते. त्यानंतर तत्कालीन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी हीच कार्यकारिणी कायम केली होती.

कोट

विस्तारित कार्यकारिणीत काय होणार, हे आताच सांगता येणार नाही. जिल्ह्याला पदे मिळूही शकतात. संघटनेत बदल होत असतात. मात्र, जिल्ह्यात सर्व एकत्रित मिळूनच काम करणार आहेत.

-ॲड. संदीप पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेस