शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

मास्क न लावणाऱ्यावंर आता पथकांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 12:22 IST

५०० रुपयांचा दंड : शहरात व ग्रामीण भागात स्वतंत्र नियोजन

ळगाव : मास्क लावणे व सोशल डिस्टन्सिंगचा पालन अधिक प्रभावीपणे व्हावे, यासाठी आता शहरी व ग्रामीण भागात अधिकारी व कर्मचाऱ्यांची स्वतंत्र पथके नेमण्यात येणार असून नियमांचे उल्लंघन करणाºयांवर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे़ ५०० रुपये दंडाचा अधिकार या पथकांना देण्यात आला आहे़ जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यासंदर्भात शुक्रवारी आदेश काढले आहेत़मास्क लावणे, सोशल डिस्टन्ंिसगचे पालन, गर्दी टाळणे, सार्वजनिक ठिकाणी थुंंकणे व इतर तरतुदींचा भंग झाल्यास दंडात्मक कारवाई करण्याकरीता जिल्ह्यातील जळगाव शहर महापालिका क्षेत्रात व तालुकास्तरावर जिल्हा परिषद गटनिहाय स्वतंत्र पथकाची नेमणूक करणे आवश्यक असल्यानुसार ही पथके नियुक्त करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी म्हटले आहे़या पथकात शहरात वॉर्ड, प्रभाग निहाय एक अधिकारी व दोन कर्मचारी व एक पोलीस कर्मचारीही पथकात असतील तसेच जि़ प़ गटनिहाय व नगरपालिका क्षेत्रात वार्ड, प्रभाग निहाय एक अधिकारी व दोन कर्मचारी यांचा समावेश असेल या पथकांना दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार प्रदान करोव, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय दंडाधिकारी व आयुक्तांना दिले आहे़ करण्यात आले आहेत़मास्क, सुरक्षित अंतर व साबणाने हात धुणे या त्रिसूत्रीचा वापर कराजिल्ह्यात कोरोनाची संख्या ११ हजार १०३ तर मृत्यूचा आकडा ५१८ इतका पोहचला आहे. देशभरातील सर्वाधिक रुग्ण संख्या असलेल्या शहरात जळगाव जिल्ह्याचे नाव आता समाविष्ट झाले आहे. त्यामुळे प्रशासनाने हा विषय अजून गांभीर्याने घेतला आहे. रुग्ण संख्या वाढू नये यासाठी नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळणे आवश्यक आहे. रुग्ण संख्या वाढल्याने कोविड सेंटरमध्ये रुग्णांना जागा शिल्लक नाही, प्रत्येक रुग्णावर उपचार करणे, त्यांना दाखल करुन घेण्यासाठी आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे. दुसरीकडे गेल्या चार महिन्यापासून आरोग्य कर्मचारी, डॉक्टर रात्रंदिवस रुग्णसेवेत असल्याने त्यांचीही मानसिकता खालावल चालली आहे. आरोग्य व खाकीतील योध्दे बाधित झाले आहेत, तरीही अविरत सेवेचे काम या यंत्रणांकडून सुरुच आहे. आजूबाजुला घडणारी घटना आपल्याकडे घडू नये यासाठी नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे व वारंवार साबणाने हात स्वच्छ करणे या त्रिसुत्रीचा वापर करावा, असे आवाहन वैद्यकिय यंत्रणेने केले आहे.दंड टाळण्यासाठी काय बंधनकारक-सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, वाहतूक,प्रवास करताना मास्कचा लावणे- कोणत्याही दुकानात, आस्थापनेत एक वेळी पाच पेक्षा जास्त ग्राहक असणार नाहीत़- विना मास्क दुकानात आल्यास, दुकानमालक अशा ग्राहकांना वस्तू देणार नाहीत- सर्व दुकान मालक, आस्थापना दुकान मालक, कर्मचारी व ग्राहक यांना मास्कचा वापर बंधनकारक- लग्नासंभारंभासाठी ५० व अत्यंविधिसाठी २० पेक्षा अधिक व्यक्ति आढळून आल्यास प्रति व्यक्ति २०० रुपये दंड व कायद्यानुसार गुन्हा दाखल करावे़वाहनांसाठी काय ?दुचाकीवर दोन व्यक्तिंना मास्क लावणे बंधनकारक, तीन चाकीसाठी एक चालक व अत्यावश्यक सेवेसाठी दोन प्रवासी, चार चाकीमध्ये अत्यावश्यक सेवेसाठी चालक अधिक ३ प्रवासी असतील, या नियमांचा भंग केल्यास वाहनांना ५०० रुपये दंड व वाहनाचा अहवाल तयार करून उपप्रादेशिक परिवहन अधिकाºयांकडे द्यावा, त्यानुसार परवाना निलंबित किंवा दंडाची आकारणी करण्याबाबत कारवाई करण्यात येईल.रुग्णांची वाढती संख्या कमी करण्यासाठी या निर्णयाची कडक अमलबजावणी केली जाणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याJalgaonजळगाव