शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

आता रेल्वे येऊ लागलीय पूर्वपदावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:12 IST

भुसावळ : अनलॉकनंतर आता रेल्वे स्थानकावर ‘यात्री गण कृपया ध्यान दे’, यासह चाय वाला, बिस्किटवाला असे विविध ...

भुसावळ : अनलॉकनंतर आता रेल्वे स्थानकावर ‘यात्री गण कृपया ध्यान दे’, यासह चाय वाला, बिस्किटवाला असे विविध प्रकाराचे ध्वनी पूर्वीसारखे ऐकायला येत आहे. जूनच्या अवघ्या फक्त २४ दिवसात रेल्वे प्रवासात प्रवाशांची दुपटीने वाढ झाली असून तितकेच उत्पन्नदेखील वाढले आहे. अनलॉकनंतर आता रेल्वे पूर्वपदावर येताना दिसून येत आहे.

उत्पन्न ८ वरून २१ लाख

कोरोना दुसऱ्या लाटेत ‘मार्च ते मे’ या दरम्यान अक्षरशः थैमान घातले होते. अनेकांना आपले जीवसुद्धा गमवावे लागले. त्यानंतर सब कुछ ठीक हे असे समजत प्रशासनाने प्रवासासह इतर सर्वच बाबींमध्ये शिथिलता दिली, मात्र दुसऱ्या लाटेचे कहर दिसताच प्रशासनाने कडक निर्बंध लादले होते व आता जवळपास दुसरी लाट ओसरली आहे. जीवनमान पूर्वपदावर येत असून, याचा परिणाम रेल्वेवरही दिसून येत आहे. पूर्वी मे महिन्यात प्रति दिवस भुसावळ येथील रेल्वे स्थानकाच्या तिकीट खिडकीवरून अवघ्या आठ ते दहा लाखाचे उत्पन्न रेल्वेला व्हायचे. मात्र आता जवळपास २१ लाखापर्यंत उत्पन्न रेल्वेला होत आहे.

४३७ प्रवासी दिवसाला

मे महिन्यात प्रति दिवस सरासरी ४३७ प्रवासी दिवसाला तिकीट बुकिंग करायचे. यातून प्रति दिवस रेल्वेला १० लाखांचे उत्पन्न मिळायचे. ती संख्या जूनच्या अवघ्या २५ दिवसात प्रतिदिवस ८५० प्रवासी तिकीट बुकिंग करीत आहेत. यातून दुपटीने अर्थातच २१ लाखांपर्यंतचे प्रति दिवस रेल्वेच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.

७० रेल्वे गाड्या

याशिवाय पूर्वी निम्म्यावर झालेल्या गाड्यांची संख्या आता दुपटीने झाली आहे. कोरोना काळात काही गाड्या सोडल्यास आजही भुसावळ रेल्वे स्थानकावरून तब्बल ७० पेक्षा जास्त प्रवासी गाड्या अप-डाऊनध्ये धावत आहे.

चैतन्य हळूहळू पूर्वपदावर

कोरोना काळापूर्वी रेल्वेस्थानकावर प्रवाशांसाठी नेहमी उद्घोषणा ऐकायला मिळायची. यात्री गण कृपया ध्यान दे, अमूक गाडी या स्थानकावरून या फलाटावरून सुटणार आहे. तसेच गाडी स्थानकावर थांबल्यानंतर चाय वाला, भजे वाला, पाणीवाला यांचीही पूर्वीच्या मानाने आता विक्री तेजीत होत असून, कुली बांधवाच्या हातालाही रोजगार मिळत आहे. एकूणच कोरेाना काळात मध्यंतरी झालेली स्थिती आता पूर्वपदावर येताना दिसून येत आहे.

मुंबई-पुणे, अहमदाबाद, सुरतकडे प्रवाशांचा कल

अनलॉकनंतर जे प्रवासी युपी, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार पश्चिम बंगाल, दिल्ली या राज्यांमध्ये गेले होते आता ते डाऊनच्या दिशेने अर्थातच मुंबई, पुणे, सुरत, अहमदाबाद या शहरांकडे रोजगारासाठी परत येताना दिसत आहेत. जास्तीची बुकिंग व गर्दी डाऊन दिशेनेच दिसून येत आहे तर यु.पी., बिहार, दिल्ली, मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या पूर्वीच्या तुलनेत अत्यल्प झाली आहे.

ऑनलाइन व एजंटकडूनही बुकिंग तेजीत

स्मार्ट युगामध्ये घरबसल्या अगदी सगळे काम ऑनलाइन होत असताना प्रवासीही आता स्मार्ट झाले आहेत. पूर्वी जो कल प्रवाशांचा तिकीट काऊंटर बुकिंग खिडकीवरून मॅन्युअली तिकीट काढायचा होता. यात मोठ्या प्रमाणात बदल झालेला दिसून येत आहे. आता प्रवासी ऑनलाइन तिकीट बुकिंग करताना दिसून येत आहेत. याशिवाय अनेक व्यावसायिक हे बुकिंग एजंट करून तिकीट बुक करण्याला पसंती देत आहे.

फलाट तिकिटाची किंमत कमी झाल्याने सोडण्यासाठी गर्दी

मध्यंतरी कोरोना रुग्ण संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे प्रवाशांशिवाय इतरांनी फलाटावर येऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने फलाट तिकिटाची किंमत ५० रुपये केली होती. मात्र आता ती पूर्वीसारखेच १० रुपये केल्यामुळे नातेवाइकांना सोडण्यासाठी स्थानिक मंडळी फलाटाचे तिकीट काढून स्थानकापर्यंत सोडण्यासाठी मोठी गर्दी करताना दिसून येत आहेत.

तत्काळ तिकीटही जोरात

तत्काळ तिकीट हे अवघ्या काही मिनिटातच उपलब्ध होते. यानंतर तिकिटाची स्थिती वेटिंगवर जाऊन पोहोचते. अगदी वेळेवर प्रवासाचे नियोजन झालेल्या प्रवाशांचा कल हे तत्काळ तिकिटावर अवलंबून असते. याकरिता आता व्यावसायिकांची व्यवसायानिमित्त तत्काळ तिकिटाच्या वेळेत गर्दी होताना दिसून येत आहे.

तत्काळ तिकीट काढण्याच्या वेळेवर गोंधळ होऊ नये याकरिता प्रवाशांना नियमानुसार टोकन दिल्यानंतर तिकीट खिडकीवर सोडण्यात येते. तिकीट बुकिंग खिडकीवर सोडताना तिकीट बुकिंग अधिकारी आरपीएफ.