शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

आता लागले ‘मुंबई’चे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 17:07 IST

लोकसभा निवडणुकीतील विजयाने भाजपची वाढली जबाबदारी ; जनतेच्या अपेक्षापूर्तीचे आव्हान, विधानसभा निवडणुकीत युती, आघाडीविषयी लवकर निर्णय झाल्यास उमेदवारांना मिळेल प्रचाराला वेळ

मिलिंद कुलकर्णीजळगाव : लोकसभा निवडणुकीप्रमाणेच राज्य विधानसभेच्या निवडणुकीत भाजप-सेनेची युती तर काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेसची आघाडी राहण्याची दाट शक्यता आहे. राष्टÑवादीने पूर्वी इतक्या जागा राखल्या तर काँग्रेसचे एका जागेने नुकसान झाले. भाजप- सेनेने गतवेळेची कामगिरी कायम ठेवली. काही ठिकाणी युती आणि आघाडीत बेबनाव दिसून आला. त्यावर मार्ग काढला जाईल. वंचित बहुजन आघाडी, राज ठाकरे यांच्या सभा यांचा परिणाम याविषयी विधानसभेच्यादृष्टीने फेरमांडणी होऊ शकते.लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. निकालाकडे पाहिले तर भाजप-शिवसेनेला जे मोठे यश मिळाले आहे ते पाहता या पक्षाकडे इच्छुकांची मोठी गर्दी होईल, असा अंदाज वर्तविता येतो. तुलनेने दोन्ही काँग्रेस, मनसे, वंचित बहुजन आघाडी यांच्याकडे उमेदवारांचा ओघ कमी राहील. काँग्रेस आघाडीला तर उमेदवारांचा शोध घ्यावा लागेल, अशी स्थिती राहील. २०१४ मध्ये साऱ्याच पक्षांनी स्बळावर निवडणूक लढवली होती. त्यावेळी प्रत्येक पक्षाला आपल्या ताकदीचा अंदाज आला होता.खान्देशातील २० जागांचा विचार केला तर गेल्यावेळी सर्वाधिक १० जागा भाजपने जिंकल्या होत्या. सहा महिन्यांपूर्वी असलेल्या मोदी लाटेचा परिणाम या निवडणुकीत पुन्हा दिसून आला होता. यंदाही तो दिसावा, अशी अपेक्षा भाजपला असणार आहे. यंदा त्यांच्यासोबत शिवसेना राहील, त्यामुळे मतांचे विभाजन टळेल.शिवसेनेला जळगाव जिल्ह्यात ३ जागा मिळाल्या. काँग्रेसच्या ५ जागा या नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातून निवडून आल्या होत्या. राष्टÑवादीची एक जागा एरंडोलची तर अपक्ष अमळनेरातून निवडून आले होते.भाजप-शिवसेनेच्या नेत्यांची खरी कसोटी ही जागा वाटप आणि उमेदवार निश्चितीच्यावेळी लागणार आहे. परंतु, दोन्ही पक्ष आणि त्यांचे नेतृत्व आणि स्थानिक नेते आता परिपक्वतेने हा प्रश्न हाताळतील, अशी उदाहरणे लोकसभा निवडणुकीत दिसून आली. पालघरची पोटनिवडणूक प्रचंड गाजल्यानंतर भाजपच्या राजेंद्र गावीत यांना सेनेने शिवधनुष्य देऊन रिंगणात उतरविले, हे वेगळे उदाहरण होते.लोकसभा निवडणुकीत गिरीश महाजन यांनी उत्तर महाराष्टÑात शिवसेनेच्या दोन जागांसह सर्व ८ जागा जिंकण्याचे भाकीत प्रत्यक्षात उतरविल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे त्यांचे वजन निश्चित वाढलेले आहे. त्यामुळे जागा आणि उमेदवाराचा पेच प्रसंग निर्माण झाल्यास महाजन तो कुशलतेने हाताळतील, असे वाटते.लोकसभा निवडणुकीतील यशामुळे भाजप-सेनेचे कार्यकर्ते गाफील राहिले तर मात्र अघटित घडू शकते. कारण मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि कर्नाटकात काँग्रेसला अवघ्या चार महिन्यांपूर्वी यश देणाºया जनतेने लोकसभेत मात्र भाजपला हात दिला. मतदारांची मानसिकता पाहता भाजप-सेनेला दक्ष रहावे लागेल. दोन्ही काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते पराभवाच्या धक्क्यातून सावरत विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागतील. नवे मित्र जोडतील. मात्र जागा वाटप व उमेदवार निश्चिती वेळेत झाल्यास प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळू शकणार आहे. सगळ्यांना ते फायदेशीर ठरु शकते.व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो हा विचार लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा अधोरेखित झाला. जळगावचे विद्यमान खासदार ए.टी.पाटील यांचे तिकीट कापले; विद्यमान विधान परिषद सदस्य स्मिता वाघ यांना आधी तिकीट दिले आणि नंतर तेही कापले, ऐनवेळी चाळीसगावचे आमदार उन्मेष पाटील यांना तिकीट मिळाले आणि त्यांनी विक्रमी मते मिळवित विजय प्राप्त केला. अनिल गोटे आणि डॉ.सुहास नटावदकर यांनी भाजपविरोधात बंडखोरी केली. पण त्यांना अनामत वाचविता आली नाही. भाकरी फिरवावी लागते, हे तत्व भाजपने खूप चांगल्या पध्दतीने अंगिकारले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव