शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शासन नव्हे आता संत-महंतच बनवतील राम मंदिर

By admin | Updated: October 6, 2015 00:52 IST

शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती : केवळ राज्यात नव्हे तर देशभरात गो हत्या बंदी करणे आवश्यक

जळगाव : अनेक वर्षापासून अयोध्या येथे राम मंदिर उभारण्याचे प्रय} सुरू आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी किंवा अन्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी हे काम मुळीच करू शकत नाही. राम मंदिर हे केवळ संत, महंत उभारु शकतात. आर्यन शैलीत राम मंदिर उभे करण्याचे आमचे स्वप्न असून लवकरच सत्यात उतरविणार, असा विश्वास द्वारका व ज्योतीषपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केला.

उद्योजक संजय दादलिका यांच्या निवासस्थानी सोमवारी दुपारी ही पत्रपरिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते.

मशिदीचा उल्लेख नाही..

अयोध्या येथील राम मंदिरात मशिद होती, याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. त्यामुळे या जागेवर केवळ राम मंदिर व्हावे, यासाठी आम्ही काम करत असून त्यासाठी आम्हाला राजकीय पक्षाच्या पाठिंब्याची गरज नाही. संत, महंत हे काम करू शकतात, असे ही शंकराचार्य म्हणाले.

कुंभमेळ्यामुळे महाराष्ट्राची भूमी पवित्र झाली

राज्यातील नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या कुंभमेळाबाबत शंकाराचार्य म्हणाले, कुंभमेळासाठी देशभरातून साधू, महंतासोबत परदेशातूनही अनेक जण आले होते. त्यामुळे महाराष्ट्राची भूमी पवित्र झाली आहे. कुंभमेळाचे नियोजन चांगले होते. या मेळ्यात एकत्र आलेल्या सनातन धर्मियांनी एकतेचा संदेश दिला.

पवित्र गोदामाईला शुद्ध करण्याची गरज काय?

कुंभमेळाव्याच्या पर्वणी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानसरोवरातील तीर्थ आणून टाकले. मूळात गोदावरी नदी ही पवित्र व शुद्ध आहे. हे तीर्थ आणून शुद्ध करण्याची काहीही गरजच नव्हती असे म्हणत, शंकराचार्य यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

गोदेचा प्रवाह मुक्त करावा

गोदावरी स्वच्छतेसाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचे स्वागत आहे. मात्र, गोदावरी नदीचे पाणी हे आडवण्यात आल्यामुळे प्रदूषण वाढले आहे. हा प्रवाह मुक्त केला तर प्रदूषणच झाले नसते.

सनातनवर बंदी हवी की नको? या प्रश्नावर शंकाराचार्य म्हणाले, की सरकार हे धर्मनिरपेक्ष राहील. मात्र, व्यक्ती धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही. सनातन संस्था काय आहे? हे माहीत नाही. मात्र, आम्ही सनातन आहोत.