शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

शासन नव्हे आता संत-महंतच बनवतील राम मंदिर

By admin | Updated: October 6, 2015 00:52 IST

शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती : केवळ राज्यात नव्हे तर देशभरात गो हत्या बंदी करणे आवश्यक

जळगाव : अनेक वर्षापासून अयोध्या येथे राम मंदिर उभारण्याचे प्रय} सुरू आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टी किंवा अन्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी हे काम मुळीच करू शकत नाही. राम मंदिर हे केवळ संत, महंत उभारु शकतात. आर्यन शैलीत राम मंदिर उभे करण्याचे आमचे स्वप्न असून लवकरच सत्यात उतरविणार, असा विश्वास द्वारका व ज्योतीषपीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी सोमवारी आयोजित पत्रपरिषदेत व्यक्त केला.

उद्योजक संजय दादलिका यांच्या निवासस्थानी सोमवारी दुपारी ही पत्रपरिषद झाली. त्यावेळी ते बोलत होते.

मशिदीचा उल्लेख नाही..

अयोध्या येथील राम मंदिरात मशिद होती, याचा उल्लेख कुठेही आढळत नाही. त्यामुळे या जागेवर केवळ राम मंदिर व्हावे, यासाठी आम्ही काम करत असून त्यासाठी आम्हाला राजकीय पक्षाच्या पाठिंब्याची गरज नाही. संत, महंत हे काम करू शकतात, असे ही शंकराचार्य म्हणाले.

कुंभमेळ्यामुळे महाराष्ट्राची भूमी पवित्र झाली

राज्यातील नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या कुंभमेळाबाबत शंकाराचार्य म्हणाले, कुंभमेळासाठी देशभरातून साधू, महंतासोबत परदेशातूनही अनेक जण आले होते. त्यामुळे महाराष्ट्राची भूमी पवित्र झाली आहे. कुंभमेळाचे नियोजन चांगले होते. या मेळ्यात एकत्र आलेल्या सनातन धर्मियांनी एकतेचा संदेश दिला.

पवित्र गोदामाईला शुद्ध करण्याची गरज काय?

कुंभमेळाव्याच्या पर्वणी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानसरोवरातील तीर्थ आणून टाकले. मूळात गोदावरी नदी ही पवित्र व शुद्ध आहे. हे तीर्थ आणून शुद्ध करण्याची काहीही गरजच नव्हती असे म्हणत, शंकराचार्य यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.

गोदेचा प्रवाह मुक्त करावा

गोदावरी स्वच्छतेसाठी सरकारने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याचे स्वागत आहे. मात्र, गोदावरी नदीचे पाणी हे आडवण्यात आल्यामुळे प्रदूषण वाढले आहे. हा प्रवाह मुक्त केला तर प्रदूषणच झाले नसते.

सनातनवर बंदी हवी की नको? या प्रश्नावर शंकाराचार्य म्हणाले, की सरकार हे धर्मनिरपेक्ष राहील. मात्र, व्यक्ती धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही. सनातन संस्था काय आहे? हे माहीत नाही. मात्र, आम्ही सनातन आहोत.