शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

आता ठोस विकासकामे दाखविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:16 IST

मनपा वार्तापत्र महापालिकेत ऐतिहासिक सत्तांतर घडवून शिवसेनेची सत्ता येऊन आता दोन महिने पूर्ण झाले? आहेत. दोन महिन्यांत महापौर व ...

मनपा वार्तापत्र

महापालिकेत ऐतिहासिक सत्तांतर घडवून शिवसेनेची सत्ता येऊन आता दोन महिने पूर्ण झाले? आहेत. दोन महिन्यांत महापौर व उपमहापौरांनी शुभेच्छा, सत्कार स्वीकारत, भेटीगाठी घेत व आपल्या पुढील धोरणाबाबत आपली भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळात शिवसेनेला ठोस विकासकामे दाखविण्याची गरज राहणार आहे. अडीच वर्षांत भाजपला शहरात कोणतेही ठोस काम दाखविता आले नव्हते, यामुळे नागरिकांमध्ये सत्ताधारी म्हणून भाजपबद्दल प्रचंड नाराजी निर्माण झाली होती. त्याचमुळे अडीच वर्षांनंतर महापालिकेत बहुमत असतानाही व घोडेबाजार घडवून आणल्यानंतरही नागरिकांनी महापालिकेत झालेल्या सत्तांतराबद्दल सकारात्मकच प्रतिक्रिया दिलेल्या दिसून आल्या. कारण भाजपला शहरातील मुख्य प्रश्नांवर कोणतेही काम करता आले नाही. आता नागरिकांच्या अपेक्षा शिवसेनेकडून वाढल्या आहेत. कारण राज्यात शिवसेनेची सत्ता असल्याने महापालिकेला राज्य शासनाकडून निधी प्राप्त होऊन अनेक कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा जळगावकरांना आहे. त्या दृष्टीने आता शिवसेनेने प्रयत्न करण्याची गरज असून, गेल्या अडीच वर्षांत काय झाले? यावर आरोप-प्रत्यारोप न करता, उर्वरित अडीच वर्षांत जळगावकरांना काय देता येईल, यासाठी सत्ताधारी म्हणून शिवसेनेने कामे करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांपासून जळगावकर रस्त्यांच्या समस्येने ग्रस्त झाले? आहेत. आता अमृत योजनेंतर्गत सुरू असलेली कामेही अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना रस्त्यांचा प्रश्न टाळण्यासाठी अमृतचे कारणही आता पुढे करता येणार नाही, तसेच शहरात जी कामे सुरू आहेत किंवा होणार आहेत, अशा कामांनाही गती देण्याची गरज आहे. त्यात भोईटे नगर रेल्वे उड्डाणपुलाचा प्रश्नही आता मार्गी लावण्याची गरज आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाबाबत घोषणाच झाल्या आहेत. मात्र, याकडे कोणतेही लक्ष महापालिकेने दिलेले नाही. अनेक दिवसांपासून या पुलासाठी भूसंपादनाची प्रक्रिया रखडली असून, याकडे सत्ताधाऱ्यांनी लक्ष देऊन ही प्रक्रिया पार पाडून या पुलाचे काम तातडीने सुरू करण्याबाबत पाठपुरावा करण्याची गरज आहे. मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांच्या प्रश्नावर सत्ताधाऱ्यांनी मनपा प्रशासनाचा प्रस्ताव मंजूर करून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिंमत दाखविली असली, तरी आता पुढील कारवाईसाठी सत्ताधाऱ्यांनी मनपा प्रशासनाला बळ देण्याची गरज आहे.