शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

जळगावातील हॉकर्स बांधवांचा 29 नोव्हेंबर रोजी मुंबईत मंत्रालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 12:48 IST

बैठकीत निर्णय

ठळक मुद्देमनपासमोरील उपोषणाची सांगताप्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 26 - मनपा प्रशासनाने 21 नोव्हेंबरपासून अतिक्रमण हटाव मोहिम सुरु केल्याच्या निषेधार्थ हॉकर्स बांधवांनी 22 नोव्हेंबरपासून मनपा समोर उपोषणास प्रारंभ केला होता. मात्र मनपा प्रशासनाने उपोषणाची दखल घेतली नाही. त्यामुळे शनिवारी हॉकर्स संघटनेच्या सदस्यांनी उपोषण मागे घेतले व आपल्या विविध मागण्यांसाठी 29 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला.मनपा प्रशासनाने चार दिवसांपासून मनपा समोर उपोषण करणा:या हॉकर्सच्या आंदोलनाची कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे मनपाच्या धोरणाविरोधात फेरीवाला समितीच्या सदस्यांनी शनिवारी उपोषणस्थळीच बैठक घेतली. बैठकीत हॉकर्सचा न्याय-हक्कासाठी 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मोर्चा काढून संबधित अधिकारी किंवा मंत्र्यांना हॉकर्सच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व फेरीवाला राष्ट्रीय समितीचे सदस्य दयाशंकर सिंह व महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सलमा शेख या करणार आहेत. महाराष्ट्र शासनाने याबाबत दखल न घेतल्यास थेट दिल्लीर्पयत लढा दिला जाईल अशी भूमिका हॉकर्स बांधवांनी घेतली आहे. सोमवारी सायंकाळी सर्व हॉकर्स बांधव मुंबईकडे रवाना होणार असल्याची माहिती जिल्हा हॉकर्स समितीकडून देण्यात आली.शनिवारी आमदार सुरेश भोळे व राष्ट्रवादी कॉँग्रेसचे विकास पवार यांच्या उपस्थितीत उपोषण मागे घेतले. आमदार सुरेश भोळे यांनी मदतीचे आश्वासन हॉकर्स बांधवांना दिले. दरम्यान, मनापाने हॉकर्स विरुद्ध हातगाडय़ा तोडत अन्यायकारक कारवाई सुरु केली आहे. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून ही कारवाई थांबवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगर प्रमुख नीलेश पाटील यांनी केली आहे. 2 डिसेंबर र्पयत हा प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. या आहेत मागण्या महानगर पालिका प्रशासनाने शहरातील हॉकर्स विरोधात सुरु केलेली कारवाई  पथ विक्रेता कायदा 2014 चे उल्लंघन करणारी असून ती त्वरित थांबविण्यात यावी व हॉकर्सचे अतिक्रमण विभागाच्या कारावाई दरम्यान झालेले नुकसान भरून द्यावे, पथ विक्रेता कायदा 2014 च्या कलम 22 नुसार नगर पथ विक्रेता समिती निवडणूक घेवून त्वरित स्थापन करण्यात यावी,  कलम 19 माल-सामान परत मागणीचा अधिकाराचे पालन व्हावे, नोंदणीकृत फेरीवाले 1 मे 2014 च्या पूर्वीचे असून ते कायद्याने व उच्चन्यायालयाच्या आदेशान्वये संरक्षित होण्यास पात्र आहेत. त्यांना हटवू नये व संरक्षित करावे, नगरपथ विक्रेता समिती गठित करण्याचे आदेश द्यावेत. गठित करण्यात आलेल्या समितीच्या व स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार पथ विक्रेता कायदा कलम 38 नुसार विक्रीची योजना तयार करण्यात यावी.