शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लोकसेवेसाठी मनपाची अधिसूचना!

By admin | Updated: November 1, 2015 00:21 IST

या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनपाने अधिसूचना जाहीर केली असून लवकरच याबाबत एजन्सीची नेमणूक केली जाणार आह़े

धुळे : महापालिका प्रशासनाकडून नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेऊन त्यांना तत्पर व दज्रेदार सेवा पुरविण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश शासनाने 23 जूनला जाहीर केला आह़े या अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मनपाने अधिसूचना जाहीर केली असून लवकरच याबाबत एजन्सीची नेमणूक केली जाणार आह़े त्यामुळे नागरिकांना सर्व सेवा ठराविक कालावधीतच उपलब्ध करून द्याव्या लागणार आहेत़

सदर अधिसूचनेनुसार सेवा न पुरविल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने प्रथम अपिलीय अधिकारी व व्दितीय अपिलीय अधिकारी यांच्याकडे दाद मागता येईल़ वेळेत सुविधा उपलब्ध करून न दिल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आह़े

अधिसूचनेत नमूद केल्याप्रमाणे जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी 50 रुपये फी आकारली जाणार असून 3 दिवसांत हे प्रमाणपत्र देणे अनिवार्य असेल़ विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी तीन महिन्यांच्या आत 1 हजार 50, 3 महिन्यांनंतर 1150, 1 वर्षानंतर 1250 (3 दिवस), मालमत्ता कर व जुन्या घराचा उतारा, फी 50 रुपये, (3 दिवस), थकबाकी नसल्याचा दाखला देण्यासाठी फी 50 रुपये (3 दिवस), दस्तावेजांच्या आधारे मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देण्यासाठी खरेदी खताच्या अर्धा टक्का फी आकारणी होणार असून मुदत 15 दिवस आहे, वारसा हक्काने मालमत्ता हस्तांतरण नोंद प्रमाणपत्र देणे, फी 1 हजार, (मुदत 15 दिवस), झोन दाखला फी-500 रुपये, (मुदत 7 दिवस), भाग नकाशा देणे, फी 200 रुपये, (मुदत 3 दिवस), बांधकाम परवानगी देण्यासाठी विकास शुल्क नियमाप्रमाणे आकारण्यात येणार असून 60 दिवसांत हे काम करणे बंधनकारक असेल, जात प्रमाणपत्र, (मुदत 15 दिवस), भोगवटा प्रमाणपत्र, फी 250 रुपये, (मुदत 30 दिवस), नळ जोडणी देणे, फी- अर्धा इंची- घरगुतीसाठी 1205, व्यावसायिकसाठी 3980, पाऊण इंची-घरगुती-1955, व्यावसायिक-7538 व 1 इंचीसाठी- घरगुती-4062, व्यावसायिक-16,552 रुपये आकारण्यात येणार असून नळ जोडणी 15 दिवसात देणे अनिवार्य आहे. जलनि:स्सारण जोडणी-फी- 200 व रस्ता खोदकाम खर्च, मुदत 15 दिवस, अग्निशमन ना हरकत दाखला 7 दिवसात व अंतिम ना हरकत दाखला 15 दिवसात देणे अनिवार्य असणार असून त्यासाठी चौ़मी़नुसार फी आकारणी केली जाणार असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले

आह़े

कर्मचा:यांच्या कमतरतेमुळे एजन्सीची नेमणूक

अधिसूचना तूर्तास प्रसिद्ध करण्यात आली असली तरी हे सर्व काम महापालिका प्रशासनाला कर्मचा:यांच्या कमतरतेमुळे शक्य नाही़ परिणामी यासाठी एखाद्या एजन्सीला ठेका देऊन सेतू केंद्र सुरू करण्याच्या विचारात मनपा प्रशासन आह़े नागरिकांना मनपात चकरा माराव्या लागू नयेत, यासाठी हे केंद्र सुरू केले जाणार आह़े एजन्सीला कमिशन देऊन नेमणूक केली जाऊ शकते, काम वेळेत न झाल्यास दंडही केला

जाईल़ मनपाच्या या अधिसूचनेचा नागरिकांसह नगरसेवकांनाही फायदा होणार आह़े.

परिपूर्ण प्रस्तावच स्वीकारणार

सेतू केंद्रात सर्व दाखल्यांसाठी आवश्यक अर्ज उपलब्ध होणार असून परिपूर्ण प्रस्तावच स्वीकारला जाणार आह़े जर प्रस्तावात त्रुटी असतील तर त्या दूर करण्याच्या सूचना दिल्या जातील, जोर्पयत परिपूर्ण प्रस्ताव सादर होत नाही तोर्पयत तो स्वीकारला जाणार नाही़ प्रस्ताव स्वीकारल्यानंतर त्यावर विहित मुदतीत सेवा पुरवावीच लागेल़