शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

‘नोटा’ चक्क तिसर्‍या स्थानावर

By admin | Updated: May 16, 2014 23:02 IST

नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीप्रमाणेच लोकसभा निवडणुकीतदेखील नकारात्मक मतदान अर्थात ‘नोटा’ वापरणार्‍यांची संख्या दिसून आली.

मनोज शेलार 

नंदुरबार जिल्हा परिषद निवडणुकीप्रमाणेच लोकसभा निवडणुकीतदेखील नकारात्मक मतदान अर्थात ‘नोटा’ वापरणार्‍यांची संख्या दिसून आली. तब्बल २१ हजार १७८ जणांनी त्याचा वापर केला. नऊ उमेदवारांमध्ये चक्क तिसर्‍या क्रमांकावर ‘नोटा’ राहिला असल्याने त्याचा प्रभाव दिसून आला. निवडणूक आयोगाने नकारात्मक मतदान अर्थात रिंगणातील उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसल्यास ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्याचा पहिल्यांदा वापर नोव्हेंबर २०१३ मध्ये झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत करण्यात आला होता. त्या वेळी ‘नोटा’चा पाहिजे तसा प्रचार व प्रसार झालेला नसतानाही जिल्ह्यातील १९ हजार ५३३ मतदारांनी त्याचा वापर केला होता. लोकसभा निवडणुकीत हा आकडा २१ हजार पार करून गेला. नाराज गटानेही केला वापर ‘नोटा’चा वापर भाजपासह इतर पक्षातील नाराज गटानेही केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच ही संख्या वाढल्याचा अंदाज आहे. भाजपाचा उमेदवार जाहीर झाल्यापासून एक गट नाराज होता. प्रचारात किंवा संपूर्ण निवडणुकीत संबंधित गट कुठेच दिसून आला नाही. असाच प्रकार काही प्रमाणात काँग्रेस व इतर पक्षातदेखील होता. अशा कार्यकर्त्यांनी व मतदारांनी ‘नोटा’चा वापर केल्याचे बोलले जात आहे. सात उमेदवारांपेक्षा जास्त निवडणूक रिंगणात एकूण नऊ उमेदवार होते. त्यात मुख्य लढत भाजप व काँग्रेस उमेदवारांमध्ये होती. दोन्ही उमेदवारांनी पावणेपाच लाख व पावणेसहा लाख मते घेतली. इतर उमेदवारांनी १२ हजारांच्या आतच मते मिळविली. त्यांच्यापेक्षा ‘नोटा’ सरस ठरत तिसर्‍या क्रमांकाची मते मिळविलेल्या उमेदवारापेक्षा १० हजारांनी जास्त मते ‘नोटा’ने मिळविली. तिसर्‍या क्रमांकावरील उमेदवाराला १२ हजार १३३ तर ‘नोटा’ला २१ हजार १७८ मते मिळाली आहेत. सर्वात शेवटचे बटण मतदान यंत्रात सर्वात शेवटचे बटण हे ‘नोटा’चे असते. अशिक्षित मतदार मतदान केंद्रात गेल्यावर गोंधळून जातो. मतदान यंत्रावरील आपल्या उमेदवाराचे चिन्ह दिसले नाही तर सरळ मतदार शेवटचे बटण दाबतो. त्यामुळेदेखील ‘नोटा’ मते खाऊन गेल्याचे बोलले जात आहे. तर काहींनी जाणूनबुजून ‘नोटा’चा वापर केल्याचे चित्र आहे. अक्कलकुव्यात सर्वाधिक ‘नोटा’चा वापर सर्वाधिक अक्कलकुवा मतदारसंघात झाला आहे. तेथे पाच हजार ५७ जणांनी त्याचा वापर केला. अक्कलकुवा मतदारसंघातील ९० टक्के भाग हा आदिवासी दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. त्याखालोखाल साक्री विधानसभा मतदारसंघात चार हजार ५८ जणांनी तर सर्वात कमी वापर साक्री मतदारसंघात दोन हजार ३९० जणांनी केल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे टपाली मतदानातदेखील १५ जणांनी त्याचा वापर केल्याचे स्पष्ट झाले आहे.