शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कुणालाही तहानलेले राहू देणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:13 IST

जळगाव : जलजीवन मिशनच्या माध्यमातून २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यासाठी १३ हजार ...

जळगाव : जलजीवन मिशनच्या माध्यमातून २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसाठी २०२५ गावात ३ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील ८५० गावांसाठी तब्बल १२०० कोटी रुपयांची तरतूद केली असून कोणालाही तहानलेले राहू देणार नसल्याचा संकल्प राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे केला.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी जळगाव येथे नवीन मंडळ कार्यालयाचे सोमवारी उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. तर व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, आमदार सुरेश भोळे, चिमणराव पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, लता सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अधीक्षक अभियंता शिवशंकर निकम यांचीही उपस्थिती होती.

या आधीच्या योजना या दरडोई ४० लीटर पाण्याचा निकषावर आखण्यात आल्या होत्या. त्या जलजीवन मिशन ही ५५ लिटर दरडोई निकषावर आखण्यात आली आहे, अशी माहितीही पालकमंत्र्यांनी कार्यक्रमात दिली.

स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यासाठी ३१४ कोटी रुपयांची तरतूद

स्वच्छता विभागातर्फे जळगाव जिल्ह्याला तब्बल ३१४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात वैयक्तिक शोषखड्डे, कचराकुंडी, सामूहिक शौचालयांसह इतर बाबींचा समावेश आहे, अशीही माहिती पाटील यांनी दिली. तसेच किशोर राजे निंबाळकर यांनी जलजीवन प्राधिकरणात राज्यभरात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. अपूर्वा वाणी यांनी सूत्रसंचालन केले.

आ.चिमणराव पाटील यांची पालकमंत्र्यांवर स्तुतीसुमने...

सेनेचे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याप्रसंगी या दोघांनी एकमेकांशी बोलणे टाळल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर पारोळ्यात झालेल्या सेनेच्या मेळाव्यात आमदार चिमणराव पाटील यांच्यासमक्षच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या विषयावर जाहीर भाष्य करीत गैरसमज टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सोमवारी झालेल्या या कार्यक्रमात या दोघांकडे शिवसैनिकांचेही लक्ष होते. मात्र व्यासपीठावर शेजारीच बसलेल्या दोघांनी आपसात संवाद साधला. आपल्या भाषणात आ.चिमणराव पाटील यांनी पालकमंत्र्यांवर स्तुतीसुमनेही उधळली. जलजीवन मिशनच्या माध्यमातून सर्वांना शुध्द पाणी मिळणार असल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्र्यांमुळेच मजिप्राचे कार्यालय मान्यता मिळाल्यानंतर लगेच सुरू झाले. त्यामुळे आता ग्रामीण भागात घरापर्यंत पाणी पोहोचेल, असे सांगितले.