शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

कुणालाही तहानलेले राहू देणार नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:13 IST

जळगाव : जलजीवन मिशनच्या माध्यमातून २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यासाठी १३ हजार ...

जळगाव : जलजीवन मिशनच्या माध्यमातून २०२४ पर्यंत प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी राज्यासाठी १३ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यांसाठी २०२५ गावात ३ हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील ८५० गावांसाठी तब्बल १२०० कोटी रुपयांची तरतूद केली असून कोणालाही तहानलेले राहू देणार नसल्याचा संकल्प राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे केला.

पाणीपुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जळगाव, धुळे आणि नंदुरबार या तीन जिल्ह्यांसाठी जळगाव येथे नवीन मंडळ कार्यालयाचे सोमवारी उद्घाटन झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोरराजे निंबाळकर अध्यक्षस्थानी होते. तर व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, आमदार सुरेश भोळे, चिमणराव पाटील, किशोर पाटील, चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, लता सोनवणे, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, अधीक्षक अभियंता शिवशंकर निकम यांचीही उपस्थिती होती.

या आधीच्या योजना या दरडोई ४० लीटर पाण्याचा निकषावर आखण्यात आल्या होत्या. त्या जलजीवन मिशन ही ५५ लिटर दरडोई निकषावर आखण्यात आली आहे, अशी माहितीही पालकमंत्र्यांनी कार्यक्रमात दिली.

स्वच्छता विभागातर्फे जिल्ह्यासाठी ३१४ कोटी रुपयांची तरतूद

स्वच्छता विभागातर्फे जळगाव जिल्ह्याला तब्बल ३१४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यात वैयक्तिक शोषखड्डे, कचराकुंडी, सामूहिक शौचालयांसह इतर बाबींचा समावेश आहे, अशीही माहिती पाटील यांनी दिली. तसेच किशोर राजे निंबाळकर यांनी जलजीवन प्राधिकरणात राज्यभरात सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. अपूर्वा वाणी यांनी सूत्रसंचालन केले.

आ.चिमणराव पाटील यांची पालकमंत्र्यांवर स्तुतीसुमने...

सेनेचे पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले होते. त्यात नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याप्रसंगी या दोघांनी एकमेकांशी बोलणे टाळल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर पारोळ्यात झालेल्या सेनेच्या मेळाव्यात आमदार चिमणराव पाटील यांच्यासमक्षच पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या विषयावर जाहीर भाष्य करीत गैरसमज टाळण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सोमवारी झालेल्या या कार्यक्रमात या दोघांकडे शिवसैनिकांचेही लक्ष होते. मात्र व्यासपीठावर शेजारीच बसलेल्या दोघांनी आपसात संवाद साधला. आपल्या भाषणात आ.चिमणराव पाटील यांनी पालकमंत्र्यांवर स्तुतीसुमनेही उधळली. जलजीवन मिशनच्या माध्यमातून सर्वांना शुध्द पाणी मिळणार असल्याचे सांगत त्यांनी पालकमंत्र्यांमुळेच मजिप्राचे कार्यालय मान्यता मिळाल्यानंतर लगेच सुरू झाले. त्यामुळे आता ग्रामीण भागात घरापर्यंत पाणी पोहोचेल, असे सांगितले.