शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतर करून येणाºया देशी-विदेशी पक्ष्यांची मेहरूण तलावाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 16:30 IST

अधिवास नष्ट केल्याचा परिणाम: तलावात मानवी हस्तक्षेप, वावर कारणीभूत

ठळक मुद्दे ९५ प्रकारचे पक्षी यायचे पक्ष्यांचा अधिवास केला नष्टमानवी हस्तक्षेप वाढला

जळगाव: मेहरूण तलावाच्या खोलीकरण व सुशोभिकरणाच्या नावाखाली केलेले खोदकाम व भराव तसेच तलावात वाढलेला मानवी वावर यामुळे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करून येणाºया देशी व विदेशी पक्ष्यांनी तलावाकडे यंदा पाठ फिरविली आहे. परिसरातही केवळ स्थानिक पॉण्ड हेरॉन, पाणकावळा आदी ४-५ प्रकारचेच पक्षी तेही अगदी तुरळकपणे दिसून येत असल्याची माहिती पक्षी अभ्यासक प्रा.राजेंद्र गाडगीळ यांनी ‘लोकमत’ला दिली.मेहरूण तलाव परिसरात इतर पाणवठे नसल्याने व जे आहेत ते प्रदूषित असल्याने शिरसोली रस्त्यावरील छोट्या तलावाकाठी मोरश्ेराटी, ब्राह्मीबदक आदी चारपाच  प्रकारचे पक्षी आलेले आहेत. मात्र त्यांची संख्याही फार नाही.९५ प्रकारचे पक्षी यायचेपूर्वी मेहरूण तलाव हे पक्ष्याचा मोठा अधिवास क्षेत्र होते. हिवाळा सुरू झाला की पूर्व युरोप, सैबेरिया, आफ्रिका आदी देशांमधून तसेच हिमालयातूनही सुमारे ९५ प्रकारचे पक्षी मोठ्या संख्येने स्थलांतर करून यायचे. त्यात ३०-४० प्रकारचे स्थानिक पक्षीही असायचे. मोठमोठ्या थव्याने हे पक्षी मेहरूण तलावाच्या परिसरात काही दिवस आश्रय घेत. तलावातील पाणवनस्पतींवर बसून पाण्यातील किडे, मासे यांची शिकार करीत.पक्ष्यांचा अधिवास केला नष्टमेहरूण तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू झाल्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून तलावावर स्थलांतर करून येणाºया पक्ष्यांच्या संख्येत घट होत होती. हीबाब निदर्शनास आणून देऊनही मनपाने त्याकडे दूर्लक्ष करीत तलावात मानवी हस्तक्षेप सुरूच ठेवल्यामुळे  पक्ष्याच्या अधिवास नष्ट झाला आहे. पक्ष्यांना बसण्यासाठी पाण्यात असलेले उंचवटे नष्ट झाले आहेत. तसेच पक्ष्यांना बसण्यासाठी अंडी घालण्यासाठी आवश्यक झाडोरा (पाण्यातील झुडपे) नष्ट झाली आहेत. त्यामुळे यंदा मेहरूण तलाव परिसरात स्थलांतर करून पक्षी आलेच नाहीत.मानवी हस्तक्षेप वाढला तलावाच्या हद्दीत भराव घालून रस्ता करण्यात आला आहे. आता हा रस्ता आणखी रूंद करण्याचा घाट घातला जात आहे. तलावाच्या लगतच्या रहिवाशांनी अनेक वर्षांपासून सांडपाणी तलावातच सोडले आहे. ही बाब निदर्शनास आणूनही मनपाकडून तलावात येणारे सांडपाणी बंद झालेले नाही. गाडगीळ यांनी सांगितले की, काही लोकांनी तर लपून-छपून सांडपाणी तलावात सोडले आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करूनही काहीही उपयोग झालेला नाही.