शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

दरवर्षी हिवाळ्यात स्थलांतर करून येणाºया देशी-विदेशी पक्ष्यांची मेहरूण तलावाकडे पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 16:30 IST

अधिवास नष्ट केल्याचा परिणाम: तलावात मानवी हस्तक्षेप, वावर कारणीभूत

ठळक मुद्दे ९५ प्रकारचे पक्षी यायचे पक्ष्यांचा अधिवास केला नष्टमानवी हस्तक्षेप वाढला

जळगाव: मेहरूण तलावाच्या खोलीकरण व सुशोभिकरणाच्या नावाखाली केलेले खोदकाम व भराव तसेच तलावात वाढलेला मानवी वावर यामुळे दरवर्षी हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करून येणाºया देशी व विदेशी पक्ष्यांनी तलावाकडे यंदा पाठ फिरविली आहे. परिसरातही केवळ स्थानिक पॉण्ड हेरॉन, पाणकावळा आदी ४-५ प्रकारचेच पक्षी तेही अगदी तुरळकपणे दिसून येत असल्याची माहिती पक्षी अभ्यासक प्रा.राजेंद्र गाडगीळ यांनी ‘लोकमत’ला दिली.मेहरूण तलाव परिसरात इतर पाणवठे नसल्याने व जे आहेत ते प्रदूषित असल्याने शिरसोली रस्त्यावरील छोट्या तलावाकाठी मोरश्ेराटी, ब्राह्मीबदक आदी चारपाच  प्रकारचे पक्षी आलेले आहेत. मात्र त्यांची संख्याही फार नाही.९५ प्रकारचे पक्षी यायचेपूर्वी मेहरूण तलाव हे पक्ष्याचा मोठा अधिवास क्षेत्र होते. हिवाळा सुरू झाला की पूर्व युरोप, सैबेरिया, आफ्रिका आदी देशांमधून तसेच हिमालयातूनही सुमारे ९५ प्रकारचे पक्षी मोठ्या संख्येने स्थलांतर करून यायचे. त्यात ३०-४० प्रकारचे स्थानिक पक्षीही असायचे. मोठमोठ्या थव्याने हे पक्षी मेहरूण तलावाच्या परिसरात काही दिवस आश्रय घेत. तलावातील पाणवनस्पतींवर बसून पाण्यातील किडे, मासे यांची शिकार करीत.पक्ष्यांचा अधिवास केला नष्टमेहरूण तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू झाल्याने गेल्या दोन-तीन वर्षांपासून तलावावर स्थलांतर करून येणाºया पक्ष्यांच्या संख्येत घट होत होती. हीबाब निदर्शनास आणून देऊनही मनपाने त्याकडे दूर्लक्ष करीत तलावात मानवी हस्तक्षेप सुरूच ठेवल्यामुळे  पक्ष्याच्या अधिवास नष्ट झाला आहे. पक्ष्यांना बसण्यासाठी पाण्यात असलेले उंचवटे नष्ट झाले आहेत. तसेच पक्ष्यांना बसण्यासाठी अंडी घालण्यासाठी आवश्यक झाडोरा (पाण्यातील झुडपे) नष्ट झाली आहेत. त्यामुळे यंदा मेहरूण तलाव परिसरात स्थलांतर करून पक्षी आलेच नाहीत.मानवी हस्तक्षेप वाढला तलावाच्या हद्दीत भराव घालून रस्ता करण्यात आला आहे. आता हा रस्ता आणखी रूंद करण्याचा घाट घातला जात आहे. तलावाच्या लगतच्या रहिवाशांनी अनेक वर्षांपासून सांडपाणी तलावातच सोडले आहे. ही बाब निदर्शनास आणूनही मनपाकडून तलावात येणारे सांडपाणी बंद झालेले नाही. गाडगीळ यांनी सांगितले की, काही लोकांनी तर लपून-छपून सांडपाणी तलावात सोडले आहे. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार करूनही काहीही उपयोग झालेला नाही.