शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
3
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
4
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
5
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
6
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
7
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
8
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
9
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
10
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
11
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
12
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
13
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
14
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
15
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
16
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
17
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
18
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
19
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
20
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'

एकाही घरात चूल पेटली नाही; नेपाळ दुर्घटनेमुळे वरणगाव शोकसागरात

By ajay.patil | Updated: August 24, 2024 09:11 IST

अपघाताच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला. शोकसागरात बुडालेल्या या गावात सायंकाळी कुठल्याच घरात चूल पेटली नाही. 

जळगाव  :  भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात नेहमीप्रमाणे सकाळची कामे सुरू असतानाच गावातून उत्तरप्रदेश व नेपाळ येथे देवदर्शनाला गेलेल्या भाविकांच्या बसचा अपघात झाल्याची बातमी आली आणि आनंदात असलेले गाव चिंताग्रस्त झाले. वेगवेगळे निरोप येत असल्याने सायंकाळी अवघे गावच सुन्न झाले.

या अपघातात वरणगाव येथील दोन कुटुंबातील चार- चार जणांचा मृत्यू झाला आहे. भाविकांच्या बसला अपघात झाल्याची बातमी वरणगाव येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास आली. अपघाताच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला. शोकसागरात बुडालेल्या या गावात सायंकाळी कुठल्याच घरात चूल पेटली नाही. 

१६ ऑगस्टला आपल्या नातेवाइकांना  चैतन्यमय वातावरणात निरोप दिला. त्याच भाविकांवर काळाचा घाला झाला. ज्यांचे नातेवाइक या बसमध्ये होते, त्यांच्या मनाला चटका लागला. ते फोनवर फोन करीत होते. तिकडून येणाऱ्या प्रत्येक बातमीमुळे त्यांच्या काळजाची घालमेल वाढत होती.

त्यात सायंकाळी गावातील एका मुलीसह दहा भाविकांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच संपूर्ण गाव सुन्न झाले. सायंकाळी एकाही घरात चूल पेटली नाही. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार एकनाथ खडसे यांच्यासह राजकीय पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी वरणगावात भेट दिली.

जावळेवाडा, गणेशनगर सुन्नवरणगावमधील जावळे वाड्यात राहणारे सुधाकर जावळे यांच्यासह त्यांच्या परिवारातील चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला. तर गणेश नगरातील संदीप भारंबे यांच्या कुटुंबातीलही चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला.या दोन भागांमध्ये अवघ्या वरणगावातील नागरिक एकवटले होते. सुधाकर जावळे हे माजी नगरसेवक होते तर संदीप भारंबे हे देखील गावातील अनेक धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर राहायचे. त्यामुळे त्यांचा गोतावळा मोठा होता.

तळवेलला चूल पेटली नाहीमुक्ताईनगर (जि. जळगाव) : तळवेल (ता. भुसावळ) या गावात दुपारी १२ च्या सुमारास भीषण  अपघाताचे वृत्त कळताच गावात दुःखाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण गाव सुन्न झाले. अपघातग्रस्त बसमध्ये गावातील पाच कुटुंबातील ९ यात्रेकरू असल्याने  अपघाताची विदारकता पाहता गावात एकही घरात शुक्रवारी चूल पेटली नाही.

‘त्यांचे’ दैव बलवत्तर होते म्हणून ते वाचलेपुणे : ‘यात्रेकरुसोबत तीन दिवसांपूर्वी माझे आई- वडील होते. त्यांचा आजार वाढल्याने ते परतले अन्यथा आज माझे आई-वडील घरी आले नसते. हा विचार करूनच छातीत धस्स झाले. पण, आज माझ्याच ओळखीतील अनेक लोकांचा मृत्यू झाला, याचंदेखील दु:ख आहे,’ अशी भावना पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या देवेंद्र इंगळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव