शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

एकाही घरात चूल पेटली नाही; नेपाळ दुर्घटनेमुळे वरणगाव शोकसागरात

By ajay.patil | Updated: August 24, 2024 09:11 IST

अपघाताच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला. शोकसागरात बुडालेल्या या गावात सायंकाळी कुठल्याच घरात चूल पेटली नाही. 

जळगाव  :  भुसावळ तालुक्यातील वरणगाव शहरात नेहमीप्रमाणे सकाळची कामे सुरू असतानाच गावातून उत्तरप्रदेश व नेपाळ येथे देवदर्शनाला गेलेल्या भाविकांच्या बसचा अपघात झाल्याची बातमी आली आणि आनंदात असलेले गाव चिंताग्रस्त झाले. वेगवेगळे निरोप येत असल्याने सायंकाळी अवघे गावच सुन्न झाले.

या अपघातात वरणगाव येथील दोन कुटुंबातील चार- चार जणांचा मृत्यू झाला आहे. भाविकांच्या बसला अपघात झाल्याची बातमी वरणगाव येथे दुपारी १२ वाजेच्या सुमारास आली. अपघाताच्या बातमीने सर्वांनाच मोठा धक्का बसला. शोकसागरात बुडालेल्या या गावात सायंकाळी कुठल्याच घरात चूल पेटली नाही. 

१६ ऑगस्टला आपल्या नातेवाइकांना  चैतन्यमय वातावरणात निरोप दिला. त्याच भाविकांवर काळाचा घाला झाला. ज्यांचे नातेवाइक या बसमध्ये होते, त्यांच्या मनाला चटका लागला. ते फोनवर फोन करीत होते. तिकडून येणाऱ्या प्रत्येक बातमीमुळे त्यांच्या काळजाची घालमेल वाढत होती.

त्यात सायंकाळी गावातील एका मुलीसह दहा भाविकांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे स्पष्ट होताच संपूर्ण गाव सुन्न झाले. सायंकाळी एकाही घरात चूल पेटली नाही. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, आमदार एकनाथ खडसे यांच्यासह राजकीय पदाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी वरणगावात भेट दिली.

जावळेवाडा, गणेशनगर सुन्नवरणगावमधील जावळे वाड्यात राहणारे सुधाकर जावळे यांच्यासह त्यांच्या परिवारातील चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला. तर गणेश नगरातील संदीप भारंबे यांच्या कुटुंबातीलही चार जणांचा या अपघातात मृत्यू झाला.या दोन भागांमध्ये अवघ्या वरणगावातील नागरिक एकवटले होते. सुधाकर जावळे हे माजी नगरसेवक होते तर संदीप भारंबे हे देखील गावातील अनेक धार्मिक कार्यक्रमात अग्रेसर राहायचे. त्यामुळे त्यांचा गोतावळा मोठा होता.

तळवेलला चूल पेटली नाहीमुक्ताईनगर (जि. जळगाव) : तळवेल (ता. भुसावळ) या गावात दुपारी १२ च्या सुमारास भीषण  अपघाताचे वृत्त कळताच गावात दुःखाचा डोंगर कोसळला आणि संपूर्ण गाव सुन्न झाले. अपघातग्रस्त बसमध्ये गावातील पाच कुटुंबातील ९ यात्रेकरू असल्याने  अपघाताची विदारकता पाहता गावात एकही घरात शुक्रवारी चूल पेटली नाही.

‘त्यांचे’ दैव बलवत्तर होते म्हणून ते वाचलेपुणे : ‘यात्रेकरुसोबत तीन दिवसांपूर्वी माझे आई- वडील होते. त्यांचा आजार वाढल्याने ते परतले अन्यथा आज माझे आई-वडील घरी आले नसते. हा विचार करूनच छातीत धस्स झाले. पण, आज माझ्याच ओळखीतील अनेक लोकांचा मृत्यू झाला, याचंदेखील दु:ख आहे,’ अशी भावना पिंपरी-चिंचवडमध्ये राहणाऱ्या देवेंद्र इंगळे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव