शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पावणेतीन वर्ष होऊनही सरकारच्या प्रतिमेत सुधारणा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 19:47 IST

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासकीय यंत्रणेबाबत व्यक्त केली नाराजी: 105 महसूल कर्मचारी, अधिका:यांचा केला गौरव

ठळक मुद्देमुख्यमंत्री पहाटे 3 ला झोपतात गुलामांसाठीचा महसूल कायदा बदलणारशेतक:यांना फिरवू नका, त्यांचा शाप लागतो

लोकमत ऑनलाईन जळगाव, दि.14- राज्य सरकारला पावणे तीन वर्ष झाले. शासन लोकहिताच्या नवनवीन योजना आणत असतानाही सरकारच्या प्रतिमेत सुधारणा झालेली नाही. कारण लोकांचा संपर्क प्रशासकीय यंत्रणेशी, अधिकारी, कर्मचा:यांशी येतो. सरकारच्या योजना जनतेर्पयत पोहोचवणारे ते माध्यम, वाहक आहेत. तेच जर चांगले नसेल तर योजना पोहोचणार नाही. त्यामुळे लोकांचे प्रश्न, समस्या मार्गी लावा, त्यांना फिरवू नका, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील प्रशासकीय यंत्रणेविषयी नाराजीची भावना सोमवारी दुपारी नियोजन भवनात आयोजित महसूल कर्मचारी, अधिकारी गुणगौरव सन्मान सोहळ्यात बोलताना व्यक्त केली. यावेळी व्यासपीठावर खासदार ए.टी.पाटील, आमदार संजय सावकारे, आमदार उन्मेश पाटील, आमदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर उपस्थित होते. इन्फो- मुख्यमंत्री पहाटे 3 ला झोपतात पालकमंत्र्यांच्या हस्ते महसूल विभागातील जिलतील उत्कृष्ट काम करणा:या 105 अधिकारी, कर्मचा:यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. त्यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले की, गेल्या पावणेतीन वर्षात एकही दिवस मुख्यमंत्री फडणवीस हे पहाटे तीन वाजेपूर्वी झोपल्याचे आठवत नाही. जनतेसाठी नवनवीन योजना आणण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यामुळे अधिकारी, कर्मचा:यांनीही या योजना जनतेर्पयत पोहोचविण्यासाठी परिश्रम घ्यावेत. इन्फो- शेतक:यांना फिरवू नका, त्यांचा शाप लागतो शेतक:याला फिरवू नका. त्याचा शाप लागतो. कारण तो प्रामाणिक असतो. कर्मचारी, अधिका:यांना पगार चांगले आहेत. अजून काही मागण्या असतील तर सांगा. त्यादृष्टीने प्रय} करू. मात्र हे करत असताना तुमच्याकडूनही चांगल्या कामाची अपेक्षा असल्याचे चंद्रकांतपाटीलम्हणाले. इन्फो- दिवाळीर्पयत 43 हजार गावात दोषमुक्त ऑनलाईन सातबारा जळगाव जिलतील30 गावे पूर्णपणे दोषमुक्त ऑनलाईन सातबारा उपलब्ध असलेली झाली असल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी यावेळी केली. जिलचे 99.99 टक्के सातबारा ऑनलाईन करण्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच उर्वरीत गावे देखील 2 महिन्यात दोषमुक्त ऑनलाईन सातबारा असलेली होतील, असे आश्वासन जिल्हाधिका:यांनी दिले आहे. राज्यातील सर्व 43 हजार गावे दिवाळीर्पयत दोषमुक्त ऑनलाईन सातबारा असलेली घोषीत होतील, अशी अपेक्षाही पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. अशा गावांमध्ये तलाठय़ाकडे जाण्याची गरज भासणार नाही. किऑस्क मशिनवरून केवळ 20 रूपये भरून नायब तहसीलदारांची डिजीटल सही असलेला सातबारा मिळू शकेल. नागपुरात ही सुविधा सुरू झाली आहे. महिन्याला 9500 लोक त्याचा लाभ घेत असल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगितले. गुलामांसाठीचा महसूल कायदा बदलणार पालकमंत्री म्हणाले की, ब्रिटीशांना देशावर राज्य करण्यासाठी गुलामांसाठी महसूल कायदा केला होता. तो तेव्हापासून तसाच लागू आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जीवन सुकर कसे होईल? यादृष्टीने त्यात बदल करण्यात येईल. ते म्हणाले की, महसूलमंत्रीपदाचा पदभार घेतला तेव्हा त्यांच्याकडे सुनावणीसाठी 5 हजार केसेस प्रलंबित होत्या. त्या मार्गी लावण्यासाठी सल्लागार एजन्सी नेमली. आता आठवडय़ाला 100 कसेसेचा निपटारा करीत असल्याचे सांगितले. जिल्ह्यात किती केसेस प्रलंबित आहेत? याची विचारणा केली असता अपर जिल्हाधिकारी राहुल मुंडके यांनी 350 केसेस असल्याचे सांगितले. त्यावर समाधान व्यक्त करीत या केसेस देखील लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी गरज भासल्यास खाजगी एजन्सीची मदत घ्या, असे सांगितले. तसेच गुलामांसाठी असलेला महसूल कायदा बदलासाठी प्रय} सुरू केले असून या कायद्यात परिवर्तन करण्याची इच्छा असलेल्या सेवानिवृत्त अधिका:यांची टीम त्यासाठी विनावेतन काम करीत आहे. दर अधिवेशनाला ते किमान 10-12 कायदे सुधारणेसाठी देतात. त्यानुसार आपण सुधारणा करीत आहोत, असे सांगितले. यापुढे प्रत्येक प्राताधिका:यांना महसूल कायद्याचे एक कलम (क्लॉज) देऊन त्याचा अभ्यास करायला लावणार. त्यात जनहिताच्या दृष्टीने काय बदल अपेक्षित आहे? याबाबत मत मागविणार. त्यादृष्टीने आव श्यक ते बदल केले जाणार असल्याचे सांगितले. पालकमंत्र्यांनी सावरली बाजू भाषणाच्या सुरूवातीलाच पालकमंत्र्यांनी पावणेतीन वर्ष झाले तरी राज्य सरकारची प्रतिमा सुधारत नसल्याचे विधान केले होते. मात्र नंतर बोलताना त्यांनी मोदी, फडणवीस यांची प्रतिमा मोठी आहे. लोक धबाधब मते देतात. त्यामुळे सरकारच्या प्रतिमेची चिंता करू नका. मात्र तुमची प्रतिमा कशी चांगली होईल? याचा विचार करा असे सांगत बाजू सावरली.