शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

महापालिकेकडून यंदा पाच हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:21 IST

जळगाव : यावर्षी मनपाने शहरात पाच हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या काही वर्षात शासनाने वृक्ष लागवडीसाठी ...

जळगाव : यावर्षी मनपाने शहरात पाच हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या काही वर्षात शासनाने वृक्ष लागवडीसाठी विशेष मोहीम हाती घेतल्याने त्यात वाढ झालेली आहे. यावर्षी मनपाने वृक्ष लागवडीची संख्या कमी केली असली तरी कमी लागवड करून, ते वृक्ष जगतील कसे यावर मनपाने अधिक भर दिला आहे. तसेच यंदा वृक्षप्रेमी नागरिकांनी वृक्ष जगविण्याची हमी दिल्यास त्यांना मोफत रोप देण्याची तयारी मनपाने सुरू केली आहे.

मनपाकडून दरवर्षी शहरात वेगवेगळ्या भागात वृक्षारोपण करण्यात येत असते. यात सेवाभावी संस्था, पर्यावरणप्रेमी नागरिकांचाही समावेश केला जातो. मनपाकडून यंदा ज्या उद्यानांना व खुल्या जागांना संरक्षण कुंपन आहे. अशा ठिकाणी खड्डे खोदण्याच्या सूचना अभियंत्यांना देण्यात आल्या आहेत. यंदा पाच हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. यासाठी ७५ रुपयांचे एक रोप याप्रमाणे ३ लाख ७५ हजार रुपयांचा खर्च येणार आहे. पर्यावरण विभागाकडून यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून तो मुख्य लेखापरीक्षक संतोष वाहुळे यांच्याकडे सादर करण्यात आला आहे. वाहुळेंची स्वाक्षरी झाल्यानंतर धनादेश सामाजिक वनीकरण विभागाकडे सादर केला जाणार आहे. त्यानंतर पुढच्या शनिवारपर्यंत मनपाच्या ताब्यात विविध प्रकारच्या रोपांचा पुरवठा केला जाणार आहे.

वृक्ष देताना भरून घेतले जाईल हमीपत्र

मनपाच्या माध्यमातून वृक्षारोपण करताना शहरातील विविध संस्था, पर्यावरण प्रेमी संघटना, नागरिकांसह शाळांना रोप दिली जाणार आहेत. जे नागरीक वृक्ष लागवडीसह त्यांच्या वाढीसाठी जबाबदारी घेतील अशा नागरिकांकडून हमीपत्र भरून घेतले जाणार आहेत. वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात नागरिकांना सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता चंद्रकांत सोनगिरे यांनी सांगितले.

दोन वर्षांपूर्वी केलेली लागवड गेली वाया

मनपा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी व गेल्या वर्षी देखील शहरातील काही भागात लाखो रुपये खर्च करून वृक्षांची लागवड केली होती. विशेष कार्यक्रम घेऊन, फोटोसेशन करून कार्यक्रम केला. मात्र, लागवड करण्यात आलेले वृक्ष काही दिवसातच निगा न ठेवल्याने सुकल्याने काेरडी पडली. यामुळे यावर्षी तरी मनपा प्रशासनाने वृक्ष लागवडीसोबतच वृक्ष कसे जगतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हा कार्यक्रम केवळ फोटोसेशन पुरता होऊ नये, असे मत पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.