शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

आधी शून्य आता ५१ गुण : नापास २३५२ विद्यार्थ्यांपैकी १०६८ जण फेरतपासणीत पास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 13:22 IST

पेपर तपासणीत हलगर्जीपणाचा आरोप

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. अनुत्तीर्ण २ हजार ३५२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची पुनर्मुल्यांकन तपासणी केली असता त्यात १ हजार ६८ विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्याची बाब उघड झाली आहे़या प्रकाराबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने कुलगुरूंकडे तक्रार केली असून सात दिवसांच्या आत हलगर्जीपणा करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा देण्यात आला आहे़नोव्हेबर-२०१८ च्या पुनर्मुल्यांकन (रिचेकिंग) परीक्षेचा निकाल हा २५ व २७ फेब्रुवारी तसेच ५, १३ त्यानंतर १५ मार्च व १० एप्रिल २०१९ ला कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला़ यामध्ये विविध विषयात पन्नास टक्केपर्यंत विद्यार्थ्यांच्या निकालात बदल होऊन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत़ यामध्ये बीएससी़ एस़वाय, बीएससी़टी़वाय, बीसीए, बीकॉम़टी़वाय, बीकॉम़ एस़वाय, बीबीएम, बीएमसी च्या सुमारे २ हजार ३५२ अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मुल्यांकनासाठी विद्यापीठाकडे अर्ज केले होते़ त्यापैकी १ हजार ६८ विद्यार्थी जाहीर झालेल्या निकालात उर्त्तीण झाल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणत पुनर्मुल्यांकन निकालात झालेल्या बदलामुळे पेपर तपासणी कशा प्रकारे झाली असेल? असा प्रश्न निर्माण होत आहेत.कुलगुरूंची घेतली भेटअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे १८ मार्चला विद्यापीठाचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालनक बी़पी़ पाटील यांना निवदेन देण्यात आले होते़ सोबतच पेपर तपासणीत निष्काळजी करणाºया प्राध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, या प्रकरणाला गांभीर्याने घेतले गेले नसल्यामुळे सोमवारी अभाविपच्या शिष्टमंडळाने कुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांनी भेट घेतली व या संपूर्ण प्रकरणाची माहिती दिली़ तसेच प्राध्यापकांवर कारवाई करावी व पुनर्मुल्यांकनमध्ये गुण वाढणाºया विद्यार्थ्यांना ५० टक्के पुनर्मुल्यांकन शुल्क कोणत्याही प्रकारचे अर्ज न करता परत मिळावे, अशी मागणी करण्यात आली.शून्य गुण अन् तपासणीनंतर मिळाले ५१ गुणविशेष म्हणजे, शून्य प्राप्त असणाºया बैठक क्रमांक ३५१०६५ असलेल्या विद्यार्थ्यांला तपासणीनंतर ४० गुण मिळाले आहे़ त्यानंतर बैठक क्र.३३१२७२ या शुन्य गुण असलेल्या विद्यार्थ्याला सुध्दा पुनर्मुल्यांकन तपासणीनंतर ५१ गुण मिळाले आहेत. बैठक क्र.३४७९३४ असलेल्या विद्यार्थ्याचे १८ चे ४० गुण झालेले आहेत़ त्यामुळे प्राध्यापकांकडून पेपर तपासणी होती की नाही, असा प्रश्न अभाविपकडून उपस्थित केला जात आहे. विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असल्याचाही आरोप केला आहे़ यापूर्वी देखील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या पुनर्मुल्यांकन तपासणीत झालेल्या गुण वाढी संदर्भात निवेदन देण्यात आले होते. परंतु विद्यापीठाने कोणत्याही प्रकारची पेपर तपासणीत खबरदारी घेतली नसल्याचे दिसून येते व यामुळे पुनर्मुल्यांकन तपासणीत शैक्षणिक, आर्थिक व मानसिक पिळवणूक होत आहे, असे म्हटले आहे़पुनर्मुल्यांकन तपासणीसंदर्भात अभाविपच्या विद्यार्थ्यांनी भेट घेऊन चर्चा केली आहे़ या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांना सूचना केल्या आहेत. -पी़पी़पाटील, प्रा़, कुलगुरू, विद्यापीठ़

टॅग्स :Jalgaonजळगाव