शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जळगावात हुडहुडी भरु लागली, रात्रीचा पारा 16.2 अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 12:31 IST

आला थंडीचा महिना : पाच दिवसांपासून तापमानात सातत्याने घट

ठळक मुद्देरात्रीची वर्दळ झाली कमीपाच दिवसांपासून तापमानात घट

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 27 -  गेल्या पाच दिवसांपासून  किमान तापमानात सातत्याने घट होत असल्याने शहरवासीयांना हुडहुडी भरू लागली आहे. गुरुवार, 26 रोजी किमान तापमान 16.2 अंशावर आले. त्ययामुळे आता उबदार कपडेही बाहेर पडू लागले असून रात्री रस्तेही लवकर सामसूम होत आहे. पावसाळा संपल्यानंतर पितृपक्षात अवकाळी पावसाचाच फटका सर्वत्र बसला. त्यानंतर ऑक्टोबर हिटने जळगावकर चांगलेच हैराण झाले होते. त्यामुळे दोन आठवडय़ांपूर्वी उकाडय़ाने त्रस्त असलेल्या जळगावकरांना थंडीचे वेध लागले होते. त्यानंतर आठवडाभरापासूनच किमान तापमान कमी होऊन दिवाळीनंतर थंडी जाणवू लागली.  तीन दिवसांपासून तर गारवा अधिक वाढला आहे. 

पाच दिवसांपासून तापमानात घटदिवाळीची धामधूम संपल्यानंतर तापमानात घट होण्यासही सुरुवात झाली आहे. पाच दिवसांपासून तापमानात दररोज घसरत असल्याचे चित्र आहे. 22 ऑक्टोबर रोजी 23.4 अंश सेल्सियस किमान तापमान होते. त्यानंतर ते 23 रोजी 20 अंश सेल्सियस, 24 रोजी 18.4, 25 रोजी 17 अंश सेल्सियस, 26 रोजी 16.2 अंश सेल्सियस तापमान नोंदले गेले. 

रात्रीची वर्दळ झाली कमीरात्री आठ वाजेपासूनच गारवा जाणवू लागल्याने रस्तेही लवकर सामसूम होत आहे. एरव्ही रात्री साडे अकरा- बारा वाजेर्पयत वर्दळ असलेल्या शहरातील रस्त्यांवर आता दहा ते साडे दहा वाजेदरम्यानच सामसूम दिसून येत आहे. 

उबदार कपडय़ांचा वापर थंडी जाणवू लागल्याने  घरातील उबदार कपडे बाहेर काढले जात असून नवीन उबदार कपडय़ांचीही दुकाने थाटली आहेत. तेथेही खरेदीसाठी गर्दी होत आहे. 

पाच दिवसांतील किमान तापमान22 ऑक्टोबर - 23.423 ऑक्टोबर - 20.024 ऑक्टोबर - 18.425 ऑक्टोबर - 17.026 ऑक्टोबर - 16.2(तापमान अंश सेल्सिअसमध्ये).