शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

प्रशासनाचे वरातीमागून घोडे, जळगावात कजर्माफीच्या याद्यांमधील त्रुटी दूर करण्यासाठी रात्रीचा दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 12:43 IST

गटसचिवांना दिले प्रशिक्षण व नंतर त्रुटी दूर करण्याचे काम झाले सुरु

ठळक मुद्देअडीच लाख शेतक-यांचे अर्ज दोन दिवसात पूर्ण करण्याचा आटापिटाउशिरा आली जाग

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 3 - मोठा गाजावाजा करीत श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 योजनेंतर्गत दिवाळीपूर्वी शेतक:यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळवून देण्यात येईल, असे सरकारने जाहीर केले, मात्र अजूनही पात्र शेतक:यांच्या यादीबाबत गोंधळ कायम असल्याचे चित्र आहे. याद्या कशा भरल्या जाव्यात, यासाठी आता सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जळगावात गुरुवारी गटसचिवांना प्रशिक्षण दिले. त्यानंतर  लाखो शेतक:यांच्या याद्यांमधील सर्व त्रुटी दूर करण्याचे काम सुरु झाले. शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेर्पयत सर्व सुधारीत याद्या सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातून 2 लाख 46 हजार 53 जणांचे (कुटुंब व्याख्येनुसार) कजर्माफीसाठी ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आले होते. यासाठी एकूण 876 याद्या अपलोड करण्यात आल्या.  त्या अपलोड करण्यापूर्वी गटसचिवांकडून अर्जातील 1 ते 66 कॉलम भरून घेण्यात आले. यामध्ये संबंधित कॉलमची माहिती नसल्यास तेथे शून्य भरण्यात आला. याच प्रकारे जन्मतारीख, पॅन कार्ड क्रमांक, आधार कार्ड क्रमांक व इतर माहिती भरण्यात आली. 

प्रक्रियेनंतर जागगटसचिवांनी ही माहिती सीडीमध्ये सहकार विभागाकडे सादर केली. त्यानंतर ती आयटी तज्ज्ञांनी अपलोड केली. संपूर्ण माहिती अपलोड झाली, चार रंगाच्या याद्या तयार झाल्या, प्रातिनिधीक स्वरुपात 30 शेतक:यांना बेबाकी प्रमाणपत्र देण्यात आले. मात्र उर्वरित शेतक:यांची प्रतीक्षा दिवाळीच्या 15 दिवसांनंतरही संपलेली नाही. ही प्रक्रिया झाल्यानंतर आता गटसचिवांना प्रशिक्षणांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्या कॉलममध्ये शून्य भरायचा सांगितला होता, तेथे ‘एनए’ (नॉट अव्हेलेबल) असा उल्लेख असायला हवा होता, असे सांगण्यात येऊन  वेगवेगळ्य़ा कॉलममध्ये काय असावे या बाबत गटसचिवांना माहिती भरण्यास सांगितले जात आहे. 

उशिरा आली जागअर्ज भरताना त्यात काय अपेक्षित आहे, या बाबत अर्ज भरण्यापूर्वी गटसचिवांना प्रशिक्षण दिले गेले नाही. केवळ अर्ज भरण्याची घाई करण्यात आली. यात गटसचिवांनी अर्ज भरून ते जवळपास महिन्यापूर्वीच सादर केले. एवढा काळ गेला आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण देण्यासाठी सहकार विभागास एवढय़ा उशिरा जाग आली का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 

गणेश कॉलनीत सर्व लवाजमागटससचिवांना प्रशिक्षण देण्याची सोय गणेश कॉलनीतील जिल्हा बँकेच्या शाखेच्यावर करण्यात आली असून तेथे जिल्हाभरातील सर्व गटसचिवांना बोलविण्यात आले आहे. येथे प्रत्येक तालुक्यासाठी एक असे 15 संगणक संच बसविण्यात आले असून आयटी तज्ज्ञ प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर यांच्यासह तालुका उपनिबंधक, विशेष लेखापरीक्षक, जिल्हा बँकांचा अधिकारी हजर होते. संपूर्ण सभागृहात गाद्या अच्छादीत करण्यात आल्या असून प्रशिक्षणाची जोरदार लगबग सुरू आहे. 

अडीच लाख शेतक-यांचे अर्ज दोन दिवसात पूर्ण करण्याचा आटापिटाजिल्हाभरातील 2 लाख 46 हजार 53 (कुटुंब व्याख्येनुसार) शेतक:यांच्या अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशिक्षण देणे व त्रुटी दूर करणे दोन दिवसात शक्य आहे का, यापूर्वी मोठा काळ हाती असताना त्रुटी राहिल्या, दोन दिवसातील घाईघाईत आणखी त्रुटी राहू शकणार नाही का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. 

रात्रीचा दिवसशुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेर्पयत याद्यांमधील त्रुटी दूर करून त्या सादर करायच्या आहे. त्यानंतर त्या स्वीकारल्या जाणार नसल्याने हे काम पूर्ण करण्यासाठी गुरुवारी रात्रीही कामकाज सुरू होते. यामुळे अनेक गटसचिवांनी घरी संपर्क साधून रात्री घरी येणार नसल्याचे कळविले.