शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

वार्तापत्र- संयमित पावसामुळे पिकांसह शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST

अमळनेर : येथे गेल्या चार दिवसांपासून संयमित स्वरूपाचा भिज पाऊस सुरू आहे. अन्यत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथे मोठे नुकसान झाले ...

अमळनेर : येथे गेल्या चार दिवसांपासून संयमित स्वरूपाचा भिज पाऊस सुरू आहे. अन्यत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथे मोठे नुकसान झाले आहे. येथे मात्र समाधानकारक पावसामुळे पिकांसह शेतकरीही पल्लवित झाले आहेत. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहेत. विहिरी तुडुंब भरू लागल्या आहेत. परिणामी पेयजलाची समस्या सुटली आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न जवळपास निकाली निघाल्यात जमा आहे. वातावरणातील दीर्घकालीन असह्य उष्मा कमी होऊन गारवा वाढला आहे.

दरम्यान, खरीप अनेकांच्या हातून गेलेला असला तरी या पावसामुळे काहींचा खरीपही बऱ्यापैकी तरला आहे. विशेष म्हणजे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नदी, नाले, ओढे यांना पूर आल्याने व जमिनीत चांगले पाणी जिरल्याने विहीर, बोअरवेल यांच्या पातळीतही वाढ होणार आहे.

जून, जुलै व ऑगस्ट असे पावसाळ्याचे तीन महिने कोरडे होते. त्यामुळे अनेकांनी दुबार व तिबार पेरणी करूनही त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. त्यामुळे रब्बीच्याही आशा धूसर होत होत्या. शेतकऱ्यांना जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न मुख्यत्वे भेडसावत होता. काही पशुपालकांनी आपले पशुधन विक्रीस काढले होते, तर काहींनी परजिल्ह्यात चराईसाठी पाठविले होते. मात्र गत तीन-चार दिवसांपासून शहरासह तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. शेतीनिर्भर घटकांमध्ये समाधान दिसून येत आहे. पाऊस झाल्यामुळे बैलपोळा सणही शेतकरी बांधवांकडून उत्साहात साजरा केला जाण्याची शक्यता आहे. परिणामी पोळ्यासाठी तथा बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रेत्यांसह एकूणच बाजारपेठेत चहलपहल वाढली आहे.