शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

वार्तापत्र- संयमित पावसामुळे पिकांसह शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST

अमळनेर : येथे गेल्या चार दिवसांपासून संयमित स्वरूपाचा भिज पाऊस सुरू आहे. अन्यत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथे मोठे नुकसान झाले ...

अमळनेर : येथे गेल्या चार दिवसांपासून संयमित स्वरूपाचा भिज पाऊस सुरू आहे. अन्यत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथे मोठे नुकसान झाले आहे. येथे मात्र समाधानकारक पावसामुळे पिकांसह शेतकरीही पल्लवित झाले आहेत. या पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आले आहेत. विहिरी तुडुंब भरू लागल्या आहेत. परिणामी पेयजलाची समस्या सुटली आहे. जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न जवळपास निकाली निघाल्यात जमा आहे. वातावरणातील दीर्घकालीन असह्य उष्मा कमी होऊन गारवा वाढला आहे.

दरम्यान, खरीप अनेकांच्या हातून गेलेला असला तरी या पावसामुळे काहींचा खरीपही बऱ्यापैकी तरला आहे. विशेष म्हणजे रब्बी हंगामाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. नदी, नाले, ओढे यांना पूर आल्याने व जमिनीत चांगले पाणी जिरल्याने विहीर, बोअरवेल यांच्या पातळीतही वाढ होणार आहे.

जून, जुलै व ऑगस्ट असे पावसाळ्याचे तीन महिने कोरडे होते. त्यामुळे अनेकांनी दुबार व तिबार पेरणी करूनही त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही. त्यामुळे रब्बीच्याही आशा धूसर होत होत्या. शेतकऱ्यांना जनावरांच्या चारा व पाण्याचा प्रश्न मुख्यत्वे भेडसावत होता. काही पशुपालकांनी आपले पशुधन विक्रीस काढले होते, तर काहींनी परजिल्ह्यात चराईसाठी पाठविले होते. मात्र गत तीन-चार दिवसांपासून शहरासह तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे. शेतीनिर्भर घटकांमध्ये समाधान दिसून येत आहे. पाऊस झाल्यामुळे बैलपोळा सणही शेतकरी बांधवांकडून उत्साहात साजरा केला जाण्याची शक्यता आहे. परिणामी पोळ्यासाठी तथा बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रेत्यांसह एकूणच बाजारपेठेत चहलपहल वाढली आहे.