दुसरीकडे वरिष्ठ महाविद्यालय कधी सुरू होणार, याची सुध्दा उत्सुकता लागली असून जानेवारी महिन्यात वरिष्ठ महाविद्यालयांना सुरूवात व्हावी, असा सूरही प्राचार्य व प्राध्यापक वर्गातून होत आहे. महाविद्यालय सुरू करताना सुध्दा विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध होणेही गरजेचे आहे. त्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी झाली असली तरी दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यामुळे पालक वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे बहुतांश पालकांनी आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्यास नकार दिला आहे. यंदा काही विद्यार्थ्यांची इअर ड्रॉप केले आहेत. ऑनलाईन शिक्षणामुळे हवा जसा अभ्यास न झाल्यामुळे हा पाऊल विद्यार्थ्यांनी उचलला असल्याची तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. यंदा कोरोनामुळे दहावी, बारावीच्या निकालावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे़ विद्यापीठाच्या परीक्षाही आटोपण्यात आहेत, निकाल सुध्दा जाहीर होत आहेत. मात्र, निकालात सुध्दा गोंधळ होत असल्याचे प्रकार समोर येत आहे. काहींना तर प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये गुणच दिलेले नाहीत. हा प्रकार लक्षात आणून दिल्यानंतर निकालात बदल होत आहे.
वार्तापत्र - दुस-या लाटेच्या संभावनेकडे कानाडोळा नको!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST