शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
4
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
5
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
6
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
7
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
8
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
9
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
10
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
11
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
12
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
13
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
14
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
15
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
16
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
17
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
18
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
19
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
20
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा

वार्तापत्र क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:42 IST

सुनील पाटील गुन्हे दाखल झाले, ठेवीदारांना न्याय मिळेल का? भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अर्थात बीएचआरमध्ये ठेवीदारांची फसवणूक, ...

सुनील पाटील

गुन्हे दाखल झाले, ठेवीदारांना न्याय मिळेल का?

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट क्रेडीट सोसायटी अर्थात बीएचआरमध्ये ठेवीदारांची फसवणूक, अपहार झाल्याप्रकरणी पुण्याच्या डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आर्थिक गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीण पोलिसांचे १३५ जणांचे पथक जळगावात पोहचले. या प्रकरणातील बडा मासा जितेंद्र कंडारे व सुनील झंवर या दोघांसह इतरांच्या घरी तसेच कार्यालयांवर छापे घातले. पाच जणांना अटक झाली. ट्रकभरुन पुरावे पोलिसांनी गोळा केले गेले. आणखी तपास सुरु आहे, पुढे काय निष्पन्न होते तो तपासाचा भाग आहे. मात्र, प्रश्न निर्माण होतो, ज्या ठेवीदारांची रक्कम अजूनही अडकली आहे त्यांना ही रक्कम मिळेल का?, त्याशिवाय २५ ते ३० टक्के रक्कम देऊन शंभर टक्के रक्कम मिळाल्याचे शपथपत्र लिहून देणाऱ्या ठेवीदारांनाही त्यांची उर्वरित रक्कम मिळेल का?. ज्यांनी कष्ट करुन पैसा गुंतवला, त्यांना खरे तर व्याजासह रक्कम मिळणे अपेक्षित होती, ती तर सोडाच उलट ३० टक्के रक्कम देऊन शंभर टक्के मिळाल्याचे शपथपत्र घेऊन ठेवीदारांना हाकलून लावले. ज्यांनी हे पाप केले, त्याचे फळ त्यांना मिळेल, काहींना मिळतेय..पण या ठेवीच्या भरवशावर अनेक ठेवीदारांनी मुलांचे लग्न, शिक्षण, नोकरी,घर, जागा विकत घेणे यासह अनेक स्वप्न पाहिली होती, मात्र या चोरांमुळे गरीबांच्या स्वप्नांचा चुराडा व अपेक्षा भंग झाला. आधीच संस्थापक, संचालकांनी ठेवीदारांना धुतले, त्यानंतर ज्यांच्यावर विश्वास ठेवून शासनाने अवसायक म्हणून नेमले त्याने धुण्यावर धुणे धुतले. सेवानिवृत्तीनंतरही कंडारेला तेथेच मुदतवाढ देण्यात आली. अर्थात या साऱ्या कामात राजकीय व काही सरकारी बाबुंचे सहकार्य असणारच, त्यात शंका नाही. त्याशिवाय हे शक्यच नाही. आता देखील राजकीय वादातूनच प्रकरण बाहेर आल्याचे बोलले जात आहे. कारण गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी १३५ जणांचे पथक जळगावात धडकते. इतकी तत्परता कधीच कोणत्या गुन्ह्यात दिसली नाही. याचाच अर्थ गुन्हा दाखल करण्यापासून तर पथक तयार करणे, त्यांना वाहने उपलब्ध करुन देणे, प‌थकात कोणाला घेणे हे सर्व नियोजितच होते. या प्रकरणात रस असणारे राजकीय नेते असो की तपास यंत्रणा यांनी अशीच तत्परता ठेवीदारांच्या ठेवी काढण्यासाठी दाखवावी, म्हणजे गरीबांसाठी खरोखर कोणाची किती तळमळ आहे हेही लक्षात येईल.