शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

वार्तापत्र क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:15 IST

सुनील पाटील अंतर्गत राजकारणाने खाकी कलंकित राजकारण हे राजकीय लोकांपुरता मर्यादित राहिलेले नाही, ते आता सरकारी कार्यालयांमध्येही दिसून येत ...

सुनील पाटील

अंतर्गत राजकारणाने खाकी कलंकित

राजकारण हे राजकीय लोकांपुरता मर्यादित राहिलेले नाही, ते आता सरकारी कार्यालयांमध्येही दिसून येत आहे. शिस्तीचे खाते समजल्या जाणाऱ्या पोलीस, राज्य उत्पादन शुल्क व आरटीओ या तीनही खाकीतील विभागात अंतर्गत राजकारण इतके वाढले आहे की, त्यामुळे खाकीच कलंकित होऊ लागली आहे. एकंदरीत बहुतांश राजकारणात अर्थकारण हेच समोर आलेले आहे. या अंतर्गत राजकारणाने लाचलुचपत विभागामार्फत अनेकांचा काटा काढल्याचे उदाहरणे मावळत्या वर्षात बघायला मिळाले तर काही जणांवर गुन्हे दाखल झाले. आपसातील राजकारण हे काही जणांनी थेट परिवारापर्यंतही नेल्याच्या घटना घडत आहेत. लाच घेणे आणि देणे हा गुन्हाच आहे. आपण धुतल्या तांदळाचे आहोत, असे ठामपणे सांगायला पोलीस खात्यात अपवादवगळता कोणीच पुढे येणार नाही. ज्या ज्या प्रकरणात पोलीस कर्मचारी असो की अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेला आहे, तेथे नक्कीच टोकाचे राजकारण झाल्याचे नंतर समोर आले आहे. महसूल विभागदेखील त्यात मागे नाही, एका बड्या अधिकाऱ्याच्या प्रकरणात दुसऱ्याच अधिकाऱ्याने हस्तकामार्फत लाचकांड घडवून आणल्याची नंतर चर्चा झाली होती. आरटीओ कार्यालयातदेखील सध्या असेच राजकारण सुरू झाले आहे. गुन्हे दाखल होऊन किंवा पोलिसात तक्रारी होत असल्याने दोष नसलेल्या कुटुंबाला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यातून शेवट हा नुकसानीचाच होत आहे. हे असले राजकारण कुठे तरी थांबले पाहिजे, असे काहींना वाटत असले तरी काही जण त्यात आणखी मिठाचा खडा टाकण्याचा उपद् व्याप करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जनमानसात विभागाची प्रतिमा मलिन होत चालली आहे. अंतर्गत माहिती बाहेर पोहोचवली जात आहे. पोलीस खात्यातील अंतर्गत राजकारणाने तर अनेकांची वर्दीच उतरविली आहे, असे असले तरी त्यात संबंधितांच्याही चुका झालेल्याच आहेत, त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आजही अर्थकारणावरून पोलीस दलातील काही विभागात अंतर्गत कलह सुरूच आहे. ‘ज्याचा हात मोडतो, त्याच्या गळ्यात पडतो’ असे आपल्याकडे बोलले जाते. पण अशी वेळच येऊ नये यासाठी खबरदारी घेतली गेली तर बऱ्याच बाबींना आळा बसू शकतो. एकोप्याने व सर्वांना विश्वासात घेऊन कार्य केले तर विभागात वातावरण चांगले राहण्यासह काम करण्याचे बळ मिळते व जनमानसात खाकीची प्रतिमा अधिक उंचावू शकते. नव्या वर्षात तसा संकल्प करावा हीच अपेक्षा !