शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वार्तापत्र क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:15 IST

सुनील पाटील अंतर्गत राजकारणाने खाकी कलंकित राजकारण हे राजकीय लोकांपुरता मर्यादित राहिलेले नाही, ते आता सरकारी कार्यालयांमध्येही दिसून येत ...

सुनील पाटील

अंतर्गत राजकारणाने खाकी कलंकित

राजकारण हे राजकीय लोकांपुरता मर्यादित राहिलेले नाही, ते आता सरकारी कार्यालयांमध्येही दिसून येत आहे. शिस्तीचे खाते समजल्या जाणाऱ्या पोलीस, राज्य उत्पादन शुल्क व आरटीओ या तीनही खाकीतील विभागात अंतर्गत राजकारण इतके वाढले आहे की, त्यामुळे खाकीच कलंकित होऊ लागली आहे. एकंदरीत बहुतांश राजकारणात अर्थकारण हेच समोर आलेले आहे. या अंतर्गत राजकारणाने लाचलुचपत विभागामार्फत अनेकांचा काटा काढल्याचे उदाहरणे मावळत्या वर्षात बघायला मिळाले तर काही जणांवर गुन्हे दाखल झाले. आपसातील राजकारण हे काही जणांनी थेट परिवारापर्यंतही नेल्याच्या घटना घडत आहेत. लाच घेणे आणि देणे हा गुन्हाच आहे. आपण धुतल्या तांदळाचे आहोत, असे ठामपणे सांगायला पोलीस खात्यात अपवादवगळता कोणीच पुढे येणार नाही. ज्या ज्या प्रकरणात पोलीस कर्मचारी असो की अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेला आहे, तेथे नक्कीच टोकाचे राजकारण झाल्याचे नंतर समोर आले आहे. महसूल विभागदेखील त्यात मागे नाही, एका बड्या अधिकाऱ्याच्या प्रकरणात दुसऱ्याच अधिकाऱ्याने हस्तकामार्फत लाचकांड घडवून आणल्याची नंतर चर्चा झाली होती. आरटीओ कार्यालयातदेखील सध्या असेच राजकारण सुरू झाले आहे. गुन्हे दाखल होऊन किंवा पोलिसात तक्रारी होत असल्याने दोष नसलेल्या कुटुंबाला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यातून शेवट हा नुकसानीचाच होत आहे. हे असले राजकारण कुठे तरी थांबले पाहिजे, असे काहींना वाटत असले तरी काही जण त्यात आणखी मिठाचा खडा टाकण्याचा उपद् व्याप करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जनमानसात विभागाची प्रतिमा मलिन होत चालली आहे. अंतर्गत माहिती बाहेर पोहोचवली जात आहे. पोलीस खात्यातील अंतर्गत राजकारणाने तर अनेकांची वर्दीच उतरविली आहे, असे असले तरी त्यात संबंधितांच्याही चुका झालेल्याच आहेत, त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आजही अर्थकारणावरून पोलीस दलातील काही विभागात अंतर्गत कलह सुरूच आहे. ‘ज्याचा हात मोडतो, त्याच्या गळ्यात पडतो’ असे आपल्याकडे बोलले जाते. पण अशी वेळच येऊ नये यासाठी खबरदारी घेतली गेली तर बऱ्याच बाबींना आळा बसू शकतो. एकोप्याने व सर्वांना विश्वासात घेऊन कार्य केले तर विभागात वातावरण चांगले राहण्यासह काम करण्याचे बळ मिळते व जनमानसात खाकीची प्रतिमा अधिक उंचावू शकते. नव्या वर्षात तसा संकल्प करावा हीच अपेक्षा !