शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वार्तापत्र क्राईम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:15 IST

सुनील पाटील अंतर्गत राजकारणाने खाकी कलंकित राजकारण हे राजकीय लोकांपुरता मर्यादित राहिलेले नाही, ते आता सरकारी कार्यालयांमध्येही दिसून येत ...

सुनील पाटील

अंतर्गत राजकारणाने खाकी कलंकित

राजकारण हे राजकीय लोकांपुरता मर्यादित राहिलेले नाही, ते आता सरकारी कार्यालयांमध्येही दिसून येत आहे. शिस्तीचे खाते समजल्या जाणाऱ्या पोलीस, राज्य उत्पादन शुल्क व आरटीओ या तीनही खाकीतील विभागात अंतर्गत राजकारण इतके वाढले आहे की, त्यामुळे खाकीच कलंकित होऊ लागली आहे. एकंदरीत बहुतांश राजकारणात अर्थकारण हेच समोर आलेले आहे. या अंतर्गत राजकारणाने लाचलुचपत विभागामार्फत अनेकांचा काटा काढल्याचे उदाहरणे मावळत्या वर्षात बघायला मिळाले तर काही जणांवर गुन्हे दाखल झाले. आपसातील राजकारण हे काही जणांनी थेट परिवारापर्यंतही नेल्याच्या घटना घडत आहेत. लाच घेणे आणि देणे हा गुन्हाच आहे. आपण धुतल्या तांदळाचे आहोत, असे ठामपणे सांगायला पोलीस खात्यात अपवादवगळता कोणीच पुढे येणार नाही. ज्या ज्या प्रकरणात पोलीस कर्मचारी असो की अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकलेला आहे, तेथे नक्कीच टोकाचे राजकारण झाल्याचे नंतर समोर आले आहे. महसूल विभागदेखील त्यात मागे नाही, एका बड्या अधिकाऱ्याच्या प्रकरणात दुसऱ्याच अधिकाऱ्याने हस्तकामार्फत लाचकांड घडवून आणल्याची नंतर चर्चा झाली होती. आरटीओ कार्यालयातदेखील सध्या असेच राजकारण सुरू झाले आहे. गुन्हे दाखल होऊन किंवा पोलिसात तक्रारी होत असल्याने दोष नसलेल्या कुटुंबाला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. यातून शेवट हा नुकसानीचाच होत आहे. हे असले राजकारण कुठे तरी थांबले पाहिजे, असे काहींना वाटत असले तरी काही जण त्यात आणखी मिठाचा खडा टाकण्याचा उपद् व्याप करीत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे जनमानसात विभागाची प्रतिमा मलिन होत चालली आहे. अंतर्गत माहिती बाहेर पोहोचवली जात आहे. पोलीस खात्यातील अंतर्गत राजकारणाने तर अनेकांची वर्दीच उतरविली आहे, असे असले तरी त्यात संबंधितांच्याही चुका झालेल्याच आहेत, त्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. आजही अर्थकारणावरून पोलीस दलातील काही विभागात अंतर्गत कलह सुरूच आहे. ‘ज्याचा हात मोडतो, त्याच्या गळ्यात पडतो’ असे आपल्याकडे बोलले जाते. पण अशी वेळच येऊ नये यासाठी खबरदारी घेतली गेली तर बऱ्याच बाबींना आळा बसू शकतो. एकोप्याने व सर्वांना विश्वासात घेऊन कार्य केले तर विभागात वातावरण चांगले राहण्यासह काम करण्याचे बळ मिळते व जनमानसात खाकीची प्रतिमा अधिक उंचावू शकते. नव्या वर्षात तसा संकल्प करावा हीच अपेक्षा !