शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

बंदिस्त नाट्यगृहाचे त्रांगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 22:27 IST

विश्लेषण

ठळक मुद्देउद्घाटनाविनाच खुले करण्याची नामुष्की पालकमंत्र्यांच्या घोषणेमुळे प्रशासनाची धावपळ

सुशील देवकरजळगाव: शहरातील सांस्कृतिक क्षेत्राची अनेक वर्षांची मागणी असलेले बंदिस्त नाट्यगृह बांधून तयार असतानाही त्याच्या उद्घाटनास विलंबामुळे, कधी तळघराला गळती लागल्यामुळे तर कधी उद्घाटनाविनाच घाईगर्दीत सुरू केल्याची घोषणा केल्याने चर्चेत राहिले आहे.आता हे बंदिस्त नाट्यगृह चालविण्याची जबाबदारी देखील जिल्हाधिकाऱ्यांवर तर देखभाल दुरूस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर येऊन पडली आहे. मात्र या देखभाल दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे निधी खर्च करण्याची तरतूदच नसल्याने मिळेल त्या निधीतूनच काम करावे लागणार आहे. तर जिल्हाधिकाºयांना स्वत: यात लक्ष घालून नियमावली तयार करून घेण्यापासून ते डोअरकिपर ते व्यवस्थापकापर्यंत कर्मचारी वर्ग नेमण्याची प्रक्रियाही पार पाडण्याची वेळ आली आहे. हे नाट्यगृह चालविण्यासाठी मक्तेदारच न मिळाल्याने नाट्यगृहाचे लोढणे जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गळ्यात पडले आहे.तर मनपाने आधीच हात वर केले आहेत.उद्घाटनाविनाच खुले करण्याची नामुष्कीलोकांसाठी केलेल्या सुविधेचे उद्घाटन वारंवार लांबणीवर पडल्याने लोकांमध्ये नाराजी निर्माण झाल्याने ती सुविधा उद्घाटनाविनाच खुली करण्याची वेळ दुसºयांदा आली आहे. यापूर्वी लांडोरखोरी वनोद्यानाचे काम पूर्ण होऊनही वनमंत्र्यांना वारंवार विनंती करूनही उद्घाटनाला यायला वेळ न मिळाल्याने लोकांना त्या सुविधेपासून वंचित रहावे लागत होते. त्यामुळे नाराजी व्यक्त होत होती. अखेर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच ऐनवेळी जाऊन या लांडोरखोरी उद्यानाचे उद्घाटन केले. आता पुन्हा तीच वेळ बंदिस्त नाट्यगृहाच्या उद्घाटनाअभावी ओढावली. पालकमंत्र्यांनीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या नाट्यगृहाचे उद्घाटन करण्याची घोषणा केली होती. मात्र शिक्षक मतदारसंघ, मनपा निवडणुक आचारसंहितेमुळे तसेच नंतर मराठा आंदोलनामुळे मुख्यमंत्र्यांचे दौरे रद्द झाले. मराठा आरक्षण आंदोलनानंतर तर मुख्यमंत्री मुंबईबाहेर पडलेलेच नाहीत. त्यामुळे त्यांची उद्घाटनासाठी वेळ मिळणे अवघड बनले आहे. अशा परिस्थितीत किती दिवस हे नाट्यगृह बंद ठेवणार? असा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर पालकमंत्र्यांनी रविवार, २ सप्टेंबर रोजी अचानकपणे अधिकाºयांच्या बैठकीत दुसºया दिवसापासून बंदिस्त नाट्यगृह लोकांसाठी खुले करण्यात येत असल्याची घोषणा करून टाकली.प्रशासनाची धावपळपालकमंत्र्यांनी अचानक घोषणा करून टाकली मात्र बंदिस्त नाट्यगृहाची नियमावली देखील अंतीम झालेली नाही. तसेच त्याची देखभाल तसेच चालविण्याची जबाबदारी कोणावर द्यायची? याचा तसेच भाडे आकारणी किती करायची याचाही निर्णय झालेला नसतानाच दुसºया दिवसापासून नाट्यगृह खुले करण्याची घोषणा केल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. स्वत: जिल्हाधिकारी हे नाट्यगृह चालविण्यास देण्यासाठी कर्मचारी नियुक्ती तसेच तिकिट आॅनलाईन विक्रीसाठी बँक प्रतिनिधींशी चर्चा आदी कामांमध्ये गुंतले असल्याचे दिसून आले. जिल्हाधिकाºयांनी यापूर्वीही अशाप्रकारचे आव्हान पेललेले असल्याने ते निश्चितपणे हे नाट्यगृह यशस्वी करून दाखवतील. मात्र त्यांच्याजागी बदलून येणाºया जिल्हाधिकाºयांनी हे त्यांचे काम नसल्याचे सांगत जबाबदारी झटकली तर काय? असा सवाल निर्माण होत आहे.आर्थिक गणित सोडविण्याची कसरतया अवाढव्य वातानुकुलीत नाट्यगृहाचा वर्षभराचा देखभाल दुरूस्तीचा खर्चच ३० लाखांच्या आसपास असणार आहे. त्यादृष्टीने या नाट्यगृहातून उत्पन्न मिळणे आवश्यक आहे. या नाट्यगृहाचे भाडे जास्त असणार हे जाहीर असल्याने किती कार्यक्रम होतील? हे सांगणे कठीण आहे. अशा परिस्थितीत या ठिकाणी पार्र्कींगचा ठेका, कॅफेटेरिया, स्टॉल लावणे यासारख्या बाबींमधून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.