शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
3
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
4
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
5
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
6
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
7
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
8
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
9
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
10
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
11
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
12
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
13
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
14
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
15
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
16
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
17
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
18
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
19
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
20
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल

गट स्थापनेची नाही नूतन सत्ताधाऱ्यांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:16 IST

महापौर, उपमहापौर निवडीसाठी बहुमताचा ३९ चा आकडा गाठणे आवश्यक असताना सेनेने भाजपाचे तब्बल २७ नगरसेवक गळाला लावले. तसेच एमआयएमच्या ...

महापौर, उपमहापौर निवडीसाठी बहुमताचा ३९ चा आकडा गाठणे आवश्यक असताना सेनेने भाजपाचे तब्बल २७ नगरसेवक गळाला लावले. तसेच एमआयएमच्या ३ सदस्यांनीही पाठिंबा दिल्याने तब्बल १५ मतांनी सेना उमेदवारांचा विजय झाला. आता सेनेला मतदान करणाऱ्या २७ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे संकेत भाजपा नेत्यांनी दिले आहेत.

अडीच वर्ष अपात्रता अशक्य

मात्र राज्यात सेनेचा सहभाग असलेले महाविकास आघाडीचे सरकार असून नगरविकास खाते हे शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे सेनेला मतदान करणाऱ्या २७ नगरसेवकांना सेनेच्या महापौरांचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत अपात्र होऊ न देण्याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, हे उघड आहे. त्यामुळे कारवाईची धास्ती या नगरसेवकांना फारशी नाही.

गटही होणार स्थापन

पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश नगरसेवक फुटणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी पक्षाचा व्हीप मोडल्यापासून सहा महिन्यात स्वतंत्र गट स्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार भाजपाच्या ५७ पैकी दोन तृतीयांश म्हणजेच ३८ नगरसेवक फुटणे आवश्यक असून त्यांचा स्वतंत्र गट स्थापन होणे गरजेचे आहे. म्हणजेच आणखी ११ नगरसेवक भाजपातून बाहेर पडणे आवश्यक आहे. मात्र हे आता अवघड नसल्याचे नूतन सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण भाजपाच्या नगरसेवकांच्या वॉर्डातही कामे झालेली नाहीत. त्यांना अडीच वर्षात वॉर्डात कामे करावयाची असतील तर सत्ताधाऱ्यांसोबत जाणे आवश्यक आहे. तसेच अनेक नगरसेवकांच्या वॉर्डात टेंडरचे घोळ आहेत. कामात भ्रष्टाचार आहे. त्या नाड्या आता सत्ताधाऱ्यांच्या हातात असल्यानेही काही नगरसेवक सेनेला पाठिंबा देण्यासाठी स्वत:हून बाहेर पडतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे सहा महिन्यात आणखी काय घडामोडी होतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

एमआयएमच्या तिघा नगरसेवकांना पक्षाची नोटीस

महापौर, उपमहापौर निवडीत शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याप्रकरणी तिघा नगरसेवकांना एमआयएमचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. ए. गफ्फार कादरी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. याबाबत एमआयएमचे मनपातील गटनेते रियाज बागवान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एमआयएमचे औरंगाबादचे खासदार ईम्तियाज जलिल यांनी ९ मार्च रोजी जाहीर वक्तव्य केले होते की, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही कोणालाही पाठिंबा देऊ. त्यामुळे आम्ही मनपात घेतलेली भूमिका योग्यच आहे. आमच्याकडे ही भूमिका तसेच प्रभागांमध्ये कामे होत नव्हती हे कारणही या निर्णयाच्या समर्थनासाठी असल्याचे सांगितले.