शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

गट स्थापनेची नाही नूतन सत्ताधाऱ्यांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:16 IST

महापौर, उपमहापौर निवडीसाठी बहुमताचा ३९ चा आकडा गाठणे आवश्यक असताना सेनेने भाजपाचे तब्बल २७ नगरसेवक गळाला लावले. तसेच एमआयएमच्या ...

महापौर, उपमहापौर निवडीसाठी बहुमताचा ३९ चा आकडा गाठणे आवश्यक असताना सेनेने भाजपाचे तब्बल २७ नगरसेवक गळाला लावले. तसेच एमआयएमच्या ३ सदस्यांनीही पाठिंबा दिल्याने तब्बल १५ मतांनी सेना उमेदवारांचा विजय झाला. आता सेनेला मतदान करणाऱ्या २७ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे संकेत भाजपा नेत्यांनी दिले आहेत.

अडीच वर्ष अपात्रता अशक्य

मात्र राज्यात सेनेचा सहभाग असलेले महाविकास आघाडीचे सरकार असून नगरविकास खाते हे शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे सेनेला मतदान करणाऱ्या २७ नगरसेवकांना सेनेच्या महापौरांचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत अपात्र होऊ न देण्याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, हे उघड आहे. त्यामुळे कारवाईची धास्ती या नगरसेवकांना फारशी नाही.

गटही होणार स्थापन

पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश नगरसेवक फुटणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी पक्षाचा व्हीप मोडल्यापासून सहा महिन्यात स्वतंत्र गट स्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार भाजपाच्या ५७ पैकी दोन तृतीयांश म्हणजेच ३८ नगरसेवक फुटणे आवश्यक असून त्यांचा स्वतंत्र गट स्थापन होणे गरजेचे आहे. म्हणजेच आणखी ११ नगरसेवक भाजपातून बाहेर पडणे आवश्यक आहे. मात्र हे आता अवघड नसल्याचे नूतन सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण भाजपाच्या नगरसेवकांच्या वॉर्डातही कामे झालेली नाहीत. त्यांना अडीच वर्षात वॉर्डात कामे करावयाची असतील तर सत्ताधाऱ्यांसोबत जाणे आवश्यक आहे. तसेच अनेक नगरसेवकांच्या वॉर्डात टेंडरचे घोळ आहेत. कामात भ्रष्टाचार आहे. त्या नाड्या आता सत्ताधाऱ्यांच्या हातात असल्यानेही काही नगरसेवक सेनेला पाठिंबा देण्यासाठी स्वत:हून बाहेर पडतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे सहा महिन्यात आणखी काय घडामोडी होतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

एमआयएमच्या तिघा नगरसेवकांना पक्षाची नोटीस

महापौर, उपमहापौर निवडीत शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याप्रकरणी तिघा नगरसेवकांना एमआयएमचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. ए. गफ्फार कादरी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. याबाबत एमआयएमचे मनपातील गटनेते रियाज बागवान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एमआयएमचे औरंगाबादचे खासदार ईम्तियाज जलिल यांनी ९ मार्च रोजी जाहीर वक्तव्य केले होते की, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही कोणालाही पाठिंबा देऊ. त्यामुळे आम्ही मनपात घेतलेली भूमिका योग्यच आहे. आमच्याकडे ही भूमिका तसेच प्रभागांमध्ये कामे होत नव्हती हे कारणही या निर्णयाच्या समर्थनासाठी असल्याचे सांगितले.