शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

गट स्थापनेची नाही नूतन सत्ताधाऱ्यांना चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:16 IST

महापौर, उपमहापौर निवडीसाठी बहुमताचा ३९ चा आकडा गाठणे आवश्यक असताना सेनेने भाजपाचे तब्बल २७ नगरसेवक गळाला लावले. तसेच एमआयएमच्या ...

महापौर, उपमहापौर निवडीसाठी बहुमताचा ३९ चा आकडा गाठणे आवश्यक असताना सेनेने भाजपाचे तब्बल २७ नगरसेवक गळाला लावले. तसेच एमआयएमच्या ३ सदस्यांनीही पाठिंबा दिल्याने तब्बल १५ मतांनी सेना उमेदवारांचा विजय झाला. आता सेनेला मतदान करणाऱ्या २७ नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्याचे संकेत भाजपा नेत्यांनी दिले आहेत.

अडीच वर्ष अपात्रता अशक्य

मात्र राज्यात सेनेचा सहभाग असलेले महाविकास आघाडीचे सरकार असून नगरविकास खाते हे शिवसेनेकडेच आहे. त्यामुळे सेनेला मतदान करणाऱ्या २७ नगरसेवकांना सेनेच्या महापौरांचा अडीच वर्षांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत अपात्र होऊ न देण्याची पूर्ण खबरदारी घेतली जाईल, हे उघड आहे. त्यामुळे कारवाईची धास्ती या नगरसेवकांना फारशी नाही.

गटही होणार स्थापन

पक्षांतर बंदी कायद्यानुसार दोन तृतीयांश नगरसेवक फुटणे आवश्यक आहे. तसेच त्यांनी पक्षाचा व्हीप मोडल्यापासून सहा महिन्यात स्वतंत्र गट स्थापन करणे आवश्यक आहे. त्यानुसार भाजपाच्या ५७ पैकी दोन तृतीयांश म्हणजेच ३८ नगरसेवक फुटणे आवश्यक असून त्यांचा स्वतंत्र गट स्थापन होणे गरजेचे आहे. म्हणजेच आणखी ११ नगरसेवक भाजपातून बाहेर पडणे आवश्यक आहे. मात्र हे आता अवघड नसल्याचे नूतन सत्ताधाऱ्यांचे म्हणणे आहे. कारण भाजपाच्या नगरसेवकांच्या वॉर्डातही कामे झालेली नाहीत. त्यांना अडीच वर्षात वॉर्डात कामे करावयाची असतील तर सत्ताधाऱ्यांसोबत जाणे आवश्यक आहे. तसेच अनेक नगरसेवकांच्या वॉर्डात टेंडरचे घोळ आहेत. कामात भ्रष्टाचार आहे. त्या नाड्या आता सत्ताधाऱ्यांच्या हातात असल्यानेही काही नगरसेवक सेनेला पाठिंबा देण्यासाठी स्वत:हून बाहेर पडतील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे सहा महिन्यात आणखी काय घडामोडी होतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

एमआयएमच्या तिघा नगरसेवकांना पक्षाची नोटीस

महापौर, उपमहापौर निवडीत शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्याप्रकरणी तिघा नगरसेवकांना एमआयएमचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष डॉ. ए. गफ्फार कादरी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागविला आहे. याबाबत एमआयएमचे मनपातील गटनेते रियाज बागवान यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, एमआयएमचे औरंगाबादचे खासदार ईम्तियाज जलिल यांनी ९ मार्च रोजी जाहीर वक्तव्य केले होते की, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही कोणालाही पाठिंबा देऊ. त्यामुळे आम्ही मनपात घेतलेली भूमिका योग्यच आहे. आमच्याकडे ही भूमिका तसेच प्रभागांमध्ये कामे होत नव्हती हे कारणही या निर्णयाच्या समर्थनासाठी असल्याचे सांगितले.