शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पिकांवरील संकटांबाबत वेळीच उपाययोजना आवश्यक- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 14:09 IST

नगदी पिकांवरील या संकटांबाबत वेळीच उपाययोजना आवश्यक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत.

जळगाव - शेती व्यवसाय सध्या अडचणींचा होतोय. विदर्भ, खांदेशात गेल्या 2-3 वर्षात बोण्डअळीच्या संकटाने हाती आलेले सर्व पीक उद्ध्वस्त होतंय. उत्पादकता कमी होतेय. आज शेतकरी संकटात आहे. केळीच्या पिकावरही बाहेरील रोग उभा राहतोय. त्यामुळे नगदी पिकांवरील या संकटांबाबत वेळीच उपाययोजना आवश्यक आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले आहेत. पंजाबातही गव्हावर तांबेरा रोगाचे थैमान सुरू झाले असल्याचेही ते म्हणाले. जळगाव येथे जैन व्हॅली येथे  पद्मश्री. डॉ. आप्पासाहेब पवार कृषी पुरस्कारांच्या वितरण प्रसंगी ते बोलत होते.पवार पुढे म्हणाले की, दिल्लीत एका सत्ताधारी मंत्र्याने मला विचारले, पवार साहब आप हमेशा पैदा करनेवालेकी बात करते हो लेकीन लाखो खानेवाले है...  त्याला पवार म्हणाले, बराबर है, लेकीन पैदा करनेवाला उद्ध्वस्त हुआ तो खानेवाला क्या खायेगा? शेतकरी जगला तरच आपण सारे जगू, असे सूचविल्याचे ते म्हणाले.शेतीमालाला हमीभाव मिळालाच पाहिजे, त्याशिवाय इतर सर्व तत्वज्ञान व्यर्थ आहे. त्यामुळे शेतीमालाला योग्य भाव मिळेल, याची काळजी राज्यकर्त्यांनी घ्यायला हवी, आशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली. जर शेतीच्या प्रश्नांकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही तर पुन्हा निकृष्ट, परदेशी मिलो खाण्याची वेळ आपल्यावर आल्याशिवाय राहणार नाही, अशी भीतीही पवार यांनी व्यक्त केली.फूड इन्फलेशन ... शेतमालाचे भाव वाढले तर महागाई वाढते. खतांच्या किंमती वाढल्या तर महागाई कमी होते, ही राजधानीतील तज्ञ मंडळींची विचारधारा व मानसिकता बदलण्याची गरज आहे. दिल्लीत काहीही उगविले, पिकविले जात नाही मात्र, दिल्लीकरांना सर्व स्वस्तात हवे असते. शेतीप्रश्नांची, बळीराजाच्या समस्यांची राजधानीतील नागरिकांना जाणीव नसल्याचे पवार यांनी नमूद केले.चांदवडसारख्या दुष्काळी तालुक्यातून शेतीत उत्तम काम करणाऱ्या शेतकऱ्याचा सन्मान होतोय, ही आनंदाची बाब आहे. आप्पासाहेब पवार व भंवरलालजी यांना हेच अपेक्षित होते. जैन समूहाने ही आधुनिक पीक क्रान्ती गावोगावी न्यावी, असेही पवार यांनी सूचविले.जळगावात जैन हिल्स वर येऊन गेल्या अनेक वर्षांतील स्नेही भंवरलालजी यांच्याशी आता संवाद होऊ शकत नाही, याचे मोठे दुःख असल्याचेही पवार म्हणाले.