शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

गरज आहे ‘पालक-पाल्य’ संवादाची !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:34 IST

सर्वांनीच स्वयंचलित यंत्रांशी, मोबाईलसह लॅपटॉप वा टिव्हीशी छान जुळवून घेतलेय, त्यांच्याशी खास दोस्ती करत आम्ही दिवसातील ३ ते ४ ...

सर्वांनीच स्वयंचलित यंत्रांशी, मोबाईलसह लॅपटॉप वा टिव्हीशी छान जुळवून घेतलेय, त्यांच्याशी खास दोस्ती करत आम्ही दिवसातील ३ ते ४ तासही घालवतोय. वेळ नाही ‘म्हणत इतर गोष्टींवर खूपसा वेळही खर्ची करतोय. पण घरीदारी ‘संवाद’ साधायचंच विसरत चाललोय. विज्ञानाने जग खूप खूप जवळ आलेय. पण माणसा-माणसातील संवाद कमी होत चाललाय. आणि ‘संवाद’ हा तर मानवतेचा मुख्य आधार आहे. या आधारवडाला प्रेम, सहकार्य, त्याग इत्यादी भावनांच्या पारंब्या फुटून मानवता विस्तारत गेली, फुलत आणि फळतही गेली. याच आधारवडाच्या आधाराने विज्ञान आणि तंत्रज्ञान विस्तारत गेले. परंतु आज त्याच विज्ञानानेच आता भाषेची गरज खुंटवीत आणली आहे. घरी दूरदर्शन,मोबाईल वा इतर स्वयंचलित यंत्रांमुळे एका माणसाला दुसऱ्या माणसाशी बोलण्याची गरज कमी झालीयं, सहकार्याची भावना झपाट्याने ओसरत आहे. त्याच बरोबर प्रेम, करूणा, त्याग, सेवावृत्ती, संघप्रवृत्ती वगैरे मानवतेच्या खुणाही (हळूहळू) नष्ट होत चालल्याय. घराघरातील मुलांच्या अंगी अनेक सुप्तगुणांचा खरच खजिना असतो. त्याचप्रमाणे काही अवगुण असतात. काही कमतरताही असतात. पण या सर्वांची उकल केव्हा होते हो ? जेव्हा आपण मुलांशी संवाद साधतो तेव्हा ! अहो, मुलांना बोलायचं असतं, काहीतरी सांगायचं असतं. त्यांना आपल्या भावना, आपले विचार, आपल्या आठवणी सांगावच्या असतात. प्रश्न विचारत उत्तरं हवी असतात. तेव्हा मुलांशी बोला, संवाद साधा, त्यांचे प्रश्न (त्यांच्या वयोगटानुसार) समजून घ्या. त्यांना न कंटाळता उत्तर द्या. त्यांच्यासाठी वेळ द्या.. असे वाटते.- चंद्रकांत भंडारी

टॅग्स :Jalgaonजळगाव