शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
2
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
3
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
4
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
5
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
6
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
7
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
8
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
9
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
10
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
11
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
12
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
13
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
14
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
15
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
16
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
17
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
18
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
19
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
20
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !

आज गांधीची गरज, मात्र ‘गांधी’ तयार होणे कठीण - डॉ.भालचंद्र नेमाडेंनी व्यक्त केली खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:40 IST

नाणार मलबार हिलवर करा

जळगाव : सध्याचा काळात मानवी मुल्य हरवत जात आहेत. मानवी मेंदूची उत्क्रांती थांबत जात असल्याने जगात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होत आहे. अशा काळात महात्मा गांधीची यांची गरज आहे. मात्र, मूल्य हरवत जाणाऱ्या समाजात गांधी निर्माण होणे कठीण असल्याची खंत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी बुधवारी डॉ.जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली.लेवा एज्युकेशन युनियनच्या शताब्दी महोत्सव समारोप समारंभ निमित्त डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयाच्या प्रागंणात आयोजित कार्यक्रमात डॉ. नेमाडे हे बोलत होते. अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एन.के.ठाकरे हे होते. लेवा एज्युकेशन युनियनचे अध्यक्ष डॉ. सुभाष चौधरी, उपाध्यक्ष अरुण नारखेडे, सचिव एन.एस.पाटील, सहसचिव डॉ.डी.के.टोके, संचालक किरण बेंडाळे, व.पु.होले, डॉ.अरुणा पाटील, जी.ई.पाटील, प्रा.एल.व्ही.बोरोले, प्राचार्य डॉ.एस.एस. राणे उपस्थित होते. संस्थेच्या १०० वर्षाच्या ‘फोटो बायोग्राफी’चे प्रकाशन झाले.मुंबईपासून दिल्ली, लंडन सडत जात आहेनेमाडे म्हणाले की, मेंदूची उत्क्रांती थांबल्यामुळे प्रगती थांबली आहे. खानपानातील बदल, उलटा विचार करणाऱ्यांची वाढत जाणारी संख्या, यामुळे स्त्रियांवरील अत्याचारांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळेच सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील नागरिक हे सारखेच असतात, सर्व देशांमधील नागरिक हे प्रेमळ असतात. मात्र, राजकारण्याकडून राष्ट्र संकल्पना स्वार्थासाठी वापरली जात असून, राष्टÑ संकल्पना चुकीच्या पध्दतीने लोकांसमोर मांडली जात आहे. यामुळे मुंबईपासून, दिल्ली, लंडन हे सडत जात असल्याचेही नेमाडे यांनी सांगितले.निसर्गरम्य कोकणात रिफायनरी करण्यापेक्षा मलबार हिल वर करासध्या आपण मूल्य ठरविताना कोणताही विचार करत नाहीत. जे आवश्यक आहेत त्या मुल्यांना सोडून इतर मुल्य स्विकारण्याची धडपड सध्या सुरु आहे. निसर्गरम्य कोकणात रिफायनरी तयार करून त्या ठिकाणचा निसर्ग का नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे ? हे एक कोडं आहे. रिफायनरी तयार करायची असेल तर ती मलबार हिलवर तयार करा असा सल्ला नेमाडे यांनी दिला. निसर्गातील प्राणी, पक्षी, वृक्ष हे आज तर शिल्लक असतील किंवा त्यांचा बचाव होत असेल तर तो केवळ अडाणी समजल्या जाणाºया लोकांकडूनच होत आहे. तरे सुशिक्षित लोकांमुळे कोणतेही प्रयत्न निसर्ग वाचविण्यासाठी केला जात नसल्याचे दिसून येते.बेबीसीटर चालते मग सासू का नाहीनागरिकांनी आधुनिकतेतून काय घ्यावे आणि जुन्या पध्दतीतुन काय सोडावे यावर लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या परंपरेत सर्व काही टाकण्यासारखे नाही असे मत नेमाडे यांनी व्यक्त केले. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचे खुळ वाढत चालले आहे. मातृभाषा जगवायला हवी. इंग्रजी ही विश्वभाषा नाही असे सांगून नेमाडे यांनी भाषेच्या विविध गमतीजमती सांगितल्या.स्व:तचे विचार बळकट करासध्या देशात राम मंदिर, नागरिकत्व कायदा अशा गोष्टींमुळे विचार करणाºयाला कळत नाही की आपण काय विचार करतो. आता वेळ आली आहे की, प्रत्येकाने आपल्या विचारपध्दतीत बदल करण्याचीत्न े. डॉ.एन.के.ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.मनीषा पाटील यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील, संघपती दलुभाऊ जैन आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव