शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

आज गांधीची गरज, मात्र ‘गांधी’ तयार होणे कठीण - डॉ.भालचंद्र नेमाडेंनी व्यक्त केली खंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:40 IST

नाणार मलबार हिलवर करा

जळगाव : सध्याचा काळात मानवी मुल्य हरवत जात आहेत. मानवी मेंदूची उत्क्रांती थांबत जात असल्याने जगात अस्थिरतेची परिस्थिती निर्माण होत आहे. अशा काळात महात्मा गांधीची यांची गरज आहे. मात्र, मूल्य हरवत जाणाऱ्या समाजात गांधी निर्माण होणे कठीण असल्याची खंत ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी बुधवारी डॉ.जी.डी.बेंडाळे महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली.लेवा एज्युकेशन युनियनच्या शताब्दी महोत्सव समारोप समारंभ निमित्त डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महाविद्यालयाच्या प्रागंणात आयोजित कार्यक्रमात डॉ. नेमाडे हे बोलत होते. अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.एन.के.ठाकरे हे होते. लेवा एज्युकेशन युनियनचे अध्यक्ष डॉ. सुभाष चौधरी, उपाध्यक्ष अरुण नारखेडे, सचिव एन.एस.पाटील, सहसचिव डॉ.डी.के.टोके, संचालक किरण बेंडाळे, व.पु.होले, डॉ.अरुणा पाटील, जी.ई.पाटील, प्रा.एल.व्ही.बोरोले, प्राचार्य डॉ.एस.एस. राणे उपस्थित होते. संस्थेच्या १०० वर्षाच्या ‘फोटो बायोग्राफी’चे प्रकाशन झाले.मुंबईपासून दिल्ली, लंडन सडत जात आहेनेमाडे म्हणाले की, मेंदूची उत्क्रांती थांबल्यामुळे प्रगती थांबली आहे. खानपानातील बदल, उलटा विचार करणाऱ्यांची वाढत जाणारी संख्या, यामुळे स्त्रियांवरील अत्याचारांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळेच सध्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. जगभरातील नागरिक हे सारखेच असतात, सर्व देशांमधील नागरिक हे प्रेमळ असतात. मात्र, राजकारण्याकडून राष्ट्र संकल्पना स्वार्थासाठी वापरली जात असून, राष्टÑ संकल्पना चुकीच्या पध्दतीने लोकांसमोर मांडली जात आहे. यामुळे मुंबईपासून, दिल्ली, लंडन हे सडत जात असल्याचेही नेमाडे यांनी सांगितले.निसर्गरम्य कोकणात रिफायनरी करण्यापेक्षा मलबार हिल वर करासध्या आपण मूल्य ठरविताना कोणताही विचार करत नाहीत. जे आवश्यक आहेत त्या मुल्यांना सोडून इतर मुल्य स्विकारण्याची धडपड सध्या सुरु आहे. निसर्गरम्य कोकणात रिफायनरी तयार करून त्या ठिकाणचा निसर्ग का नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे ? हे एक कोडं आहे. रिफायनरी तयार करायची असेल तर ती मलबार हिलवर तयार करा असा सल्ला नेमाडे यांनी दिला. निसर्गातील प्राणी, पक्षी, वृक्ष हे आज तर शिल्लक असतील किंवा त्यांचा बचाव होत असेल तर तो केवळ अडाणी समजल्या जाणाºया लोकांकडूनच होत आहे. तरे सुशिक्षित लोकांमुळे कोणतेही प्रयत्न निसर्ग वाचविण्यासाठी केला जात नसल्याचे दिसून येते.बेबीसीटर चालते मग सासू का नाहीनागरिकांनी आधुनिकतेतून काय घ्यावे आणि जुन्या पध्दतीतुन काय सोडावे यावर लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या परंपरेत सर्व काही टाकण्यासारखे नाही असे मत नेमाडे यांनी व्यक्त केले. इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाचे खुळ वाढत चालले आहे. मातृभाषा जगवायला हवी. इंग्रजी ही विश्वभाषा नाही असे सांगून नेमाडे यांनी भाषेच्या विविध गमतीजमती सांगितल्या.स्व:तचे विचार बळकट करासध्या देशात राम मंदिर, नागरिकत्व कायदा अशा गोष्टींमुळे विचार करणाºयाला कळत नाही की आपण काय विचार करतो. आता वेळ आली आहे की, प्रत्येकाने आपल्या विचारपध्दतीत बदल करण्याचीत्न े. डॉ.एन.के.ठाकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ.मनीषा पाटील यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी कुलगुरु डॉ.के.बी.पाटील, संघपती दलुभाऊ जैन आदी उपस्थित होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव