शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वे ठप्प; मेट्रो सेवा सुरळीत, प्रवाशांना अल्प दिलासा
2
ऑटो कंपन्यांवरील अरिष्ट टळले...! चीनने दरवाजे उघडले; रेअर अर्थ मेटलसह दोन वस्तूंवरील निर्बंध हटविले
3
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधू बाजी मारणार की महायुती मात देणार? निकालाची उत्सुकता शिगेला
4
"साहेब माझी आई हरवली"; तक्रार नोंदवण्यासाठी मुलगा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला, तपास सुरू होताच सगळ्यांना धक्का बसला!
5
१९४६ च्या कलकत्ता दंगलीत हजारो हिंदूंचे प्राण वाचवणारे गोपाल पाठा कोण होते? कोण मानतं हिरो, तर कुणी म्हणतं व्हिलन  
6
पापा की परी... सावधान! स्कुटरच्या हँडलमधून साप निघाला साप, तरुणीने उडीच मारली...
7
इंडियन ऑइलने अमेरिकेला दाखवला 'ठेंगा', रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरुच राहणार...
8
VIDEO : किन्नरच्या सौंदर्यावर नेटकरी 'फिदा'! व्हिडिओ पाहून युजर्स म्हणतायत...; तुम्हीही थक्क व्हाल!
9
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
10
Mangalagauri 2025: मंगळगौरीचे पावित्र्य आणि माधुर्य दर्शवणारे दीनानाथ दलाल यांचे चित्र; पहा बारकावे!
11
ऋतुराजनं बॉलिंगमध्ये आजमावला हात; सिक्सर मारल्यावर विकेट्स घेत हिशोब केला चुकता (VIDEO)
12
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
13
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
14
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
15
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
16
Indian Railway: आता रेल्वेतही विमानासारखा नियम; ‘जादा' सामान बाळगल्यास दंड!
17
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
18
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
19
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
20
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...

जिल्हा बँकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्तेसाठी संघटन आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:25 IST

जळगाव : येत्या वर्षभरात ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेपासून जिल्हा बॅकेपर्यंत विविध स्थानिक निवडणुका येत्या वर्षात आहेत. या संस्थांवर शिवसेनेची सत्ता ...

जळगाव : येत्या वर्षभरात ग्रामपंचायत, जिल्हा परिषदेपासून जिल्हा बॅकेपर्यंत विविध स्थानिक निवडणुका येत्या वर्षात आहेत. या संस्थांवर शिवसेनेची सत्ता आणायची असेल तर पक्ष संघटन मजबूत करावे लागेल, सत्ता ही संघटनेवर अवलंबून असल्याने जिल्हाभरात शिवसेनेचे ४ लाख सदस्य नोंदविण्याचे उद्दिष्ट पूर्ण करा, असे आवाहन पालकमंत्री तथा शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी केले.

शुक्रवारी अजिंठा विश्रामगृहावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेची संघटनात्मक जिल्हा बैठक झाली. यावेळी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, महानगर प्रमुख शरद तायडे, माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपा विरोधी पक्षनेते सुनिल महाजन, जिल्हा परिषद सदस्य नाना महाजन, गोपाळ चौधरी,रावसाहेब पाटील, पद्मसिंग पाटील, सभापती मुकुंद नन्नवरे, नंदलाल पाटील, युवासेना जिल्हाप्रमुख शिवराज पाटील यांच्यासह शिवसेना तालुकाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख आणि प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

आमदार नाही, त्या ठिकाणीही विजयाचे उद्दिष्ट ठेवा

गुलाबराव पाटील म्हणाले की, जिल्हा परिषदेत आपली सदस्य संख्या १५ पेक्षा अधिक नाही. ज्या ठिकाणी आमदार आहेत, तेथेच हे सदस्य निवडून येतात. त्यामुळे यापुढच्या निवडणुकीत ज्या मतदारसंघात आपले आमदार नाहीत, अशी ठिकाणी उद्दीष्ट ठेवून काम करावे लागणार आहे.

विधान परिषद निवडणुकीत विजयामुळे महाविकास आघाडीची ताकत दिसून आली आहे. भाजपला थोपविण्यासाठी स्थानिक निवडणुकीत देखील हे प्रयोग केले जाणार आहेत. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी शेतकऱ्यां‍च्या डीपी दुरूस्तीसाठी निधी देण्याची मागणी केली. आमदार चिमणराव पाटील यांनी महाविकास आघाडीच्या पॅटर्नमुळे येत्या लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी किमान ४० जागा आपण जिंकू शकतो असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी प्रास्ताविकात पक्षसंघटनेची स्थिती आणि आगामी निवडणुकीतील संधी याबाबत सांगत सभासद नोंदणीचा कार्यक्रम नियोजन सांगितले

शेतकऱ्यांसाठी ट्रान्सफार्मर येण्यास उशीर होत आहे. त्यामुळे ट्रान्सफार्म दुरूस्ती आणि ऑईलसाठी जिल्हा नियोजन समितीतून नावीण्यपूर्ण योजनेतून लागणारा ६० लाखाचा निधी देण्याची घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. सूत्रसंचलन व प्रास्ताविक विधानसभा क्षेत्रप्रमुख संजय पाटील यांनी केले. तर महानगर प्रमुख शरद तायडे यांनी आभार मानले.