शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन बैठकीत ‘ईव्हीएम’वरच खापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 12:31 IST

पुढील निवडणुका मतपत्रिकेवरच घ्या अथवा निवडणुकाच न घेण्याची मागणी करणारा ठराव

जळगाव : जळगाव मतदारसंघात गुलाबराव देवकर यांचा झालेला पराभव हा इव्हीएमचा घोळ असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या चिंतन बैठकीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केला़ गिरीश महाजन हे छातीठोकपणे विजयाचे आकडे कसे सांगू शकतात? असा सवाल उपस्थित करून आगामी निवडणुका या मतपत्रिकेवरच घ्या, अन्यथा निवडणुकाच घेऊ नका, अशा मागणीचा ठराव या बैठकीत करण्यात आला़ अनेक पदाधिकाऱ्यांनी नेत्यांवरही नाराजी व्यक्त केली़लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची जिल्हा बैठक कार्यालयात दुपारी साडेतीन वाजता झाली़ जिल्हाध्यक्ष अ‍ॅड़ रवींद्र पाटील यांनी मार्गदर्शन केले़ अनेक ठिकाहून ईव्हीएमच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत़ आम्ही जेव्हा स्थानिक पातळीवर फिरतो तेव्हा शेतकरी वर्ग सांगतो आम्ही मतदान केलेले नाही, लोक सांगतात आम्ही मतदान केलेले नाही़ पहिल्या फेरीपासून गुलाबराव देवकर यांंना २५ ते २७ टक्के तर उन्मेश पाटील यांना ६४ ते ६६ टक्के हाच आकडा शेवटपर्यंत कायम कसा? किमान देवकरांच्या मतदारसंघात तरी फरक जाणवला असता़ त्यामुळे हा पराभव पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मान्य नाही. मात्र आपल्याकडे पुरावा नसल्याने आपण काही करू शकत नाही, त्यामुळे हे सर्व विसरून आता विधानसभेच्या कामाला लागावे, कार्यकर्त्यांनी निराश न होता, संघटना बळकटीकरणावर भर द्यावा, असे आवाहन रवींद्र पाटील यांनी केले़ कामे न करणाऱ्यांना पदे खाली करावी लागतील तसेच निवडणुकीसाठी नवीन कार्यकारिणी असेल, असे त्यांनी सांगितले़ दरम्यान, यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख नाना पाटील यांनी इव्हीएमला विरोध करणारा ठराव मांडला़राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांचा गिरीश महाजनांपेक्षा नक्कीच अभ्यास जास्त आहे, मात्र, आजपर्यंत त्यांनी कधीच जागांच्या बाबतीत सांगितले नाही, मतमोजणीच्या काही तासांपूर्वी गिरीश महाजन यांनी अगदी छातीठोकपणे थोडावेळ थांबा भाजपच्या ४२ तर राष्ट्रवादीच्या ५ ते ६ जागा येतील, असे सांगितले होते़ते अस कस काय सांगू शकतात़, त्यामुळे निवडणुका बॅलेटपेपरवरच घ्याव्यात, अशी मागणी पदाधिकाºयांमधून झाली़ अध्यक्षस्थानी अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष गफफार मलिक हे होते़ माजी आमदार दिलीप सोनवणे, वाल्मिक पाटील, ज्ञानेश्वर महाजन, शीतल साळी, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, महिला महानगराध्यक्षा निला चौधरी, माधुरी पाटील, उज्ज्वल पाटील, अरविंद मानकरी, रिझवान खाटीक, नईम खाटीक, अक्षय चौधरी आदींसह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची यावेळी उपस्थिती होती़भाजपच्या एका बड्या नेत्याचा फोन आला़ आम्ही आमच्या गाड्या जळगाव मतदारसंघात फिरवतो, तुम्ही फक्त रावेरमध्ये आम्हाला मदत करा़, असे असताना जळगाव मतदारसंघात उलटा निकाल कसा लागला? हे दुसर काही नसून हा ‘इव्हीएम’चाच घोळ आहे, असा गौप्यस्फोट एका पदाधिकाºयांनी या सभेत केला़ त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या़जळगावच्या मास्टरमार्इंंडची चौकशी व्हावीनिवडणूक आयोगाने इव्हीएम विरोधातील तक्रारींची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, यात जळगावचा मास्टरमार्इंड असून त्याच्याकडेही लक्ष देऊन चौकशी करावी, असाही सूर या बैठकीत पदाधिकाºयांकडून उमटला़ दरम्यान, ईव्हीएमला विरोध करण एकाबाजूने ठिक असले तरी आपण संघटनेकडे लक्ष देणे अधिक गरजेचे असल्याचे अभिषेक पाटील म्हणाले़ २१ पक्ष या विरोधात न्यायालयात गेले होते़ संघटनेत कमी पडलो हे मान्य केले तरच पुढील निवडणुकांसाठी चांगले राहिल, असेही ते म्हणाले़ दरम्यान, नेते हे कार्यकर्त्यांकडे लक्ष देत नाहीत, कार्यकर्ते अनेक वर्ष कुठल्याही स्वार्थाशिवाय झटत असतात, मात्र, एकदा का समोरील पक्षाच्याविरोधात वातावरण निर्माण झाले की आपण आता सत्ताधारीच झालो अशा भूमिकेत नेते राहतात, असे न करता कार्यकर्त्यांकडे लक्ष देऊन नेत्यांनी मदत करावी, अशी अपेक्षा जामनेरच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केली़राष्ट्रवादीत सर्वच नेते कार्यकर्ते नाहीराष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्वजण नेते होत चालले आहेत़ कार्यकर्तेच शिल्लक नसल्याचे मुक्ताईनगरचे यु़डी़ पाटील म्हणाले़ कार्यकर्त्यांना जबादारी द्यावी, बूध कमिट्या मजबूत कराव्यात. एक बुथ १० यूथ ही संकल्पना राबवित असताना त्या युवकांनाच आपण समितीत आहोत हे माहित नसते़ जिल्हाध्यक्षांनी स्वत: मनावर घ्यावे, असेही ते म्हणाले़ ईव्हीएमविरोधात गावागावातून मोर्चे निघायला हवेत, असेही त्यांनी सांगितले़

टॅग्स :Jalgaonजळगाव