शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्हाध्यपदावर पक्षश्रेष्ठी करणार शिकामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 12:56 IST

निरीक्षक रंगनाथ काळे यांची माहिती

ठळक मुद्देसात तालुक्यातून तालुकाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच नावजामनेरात प्रयत्न पूर्ण प्रयत्न केले

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २२ - जिल्ह्यातील ११ विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६६ जिल्हा प्रतिनिधींची नावे जिल्हा निरीक्षकांकडे पाठविण्यात आली असून रविवारी जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात बैठक होणार आहे. यामध्ये जिल्हा प्रतिनिधींनी सुचविलेल्या नावाव्यतिरिक्त उमेदवार पक्षश्रेष्ठींना सक्षम वाटत असेल तर, त्यांच्या नावावरही शिकामोर्तब करु शकतात, असे संकेत जिल्हा निरीक्षक रंगनाथ काळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले़राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगराध्यक्ष तसेच तालुका निवडी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शनिवारी बैठक झाली. यामध्ये नीलेश पाटील यांचे महानगराध्यक्षपदासाठी एकमेव नाव सुचविण्यात आले. या निवडीसंदर्भात तालुक्याच्या ठिकाणी निरीक्षक पाठविण्यात आले होते. प्रत्येक विभानसभा क्षेत्रातून तीन प्रदेश प्रतिनिधी व सहा जिल्हा प्रतिनिधीनींची नावे देण्यात आली. ही नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात येणार असून त्यापैकी एक नाव जिल्हाध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात येणार आहे़ परंतु पक्षश्रेष्ठींकडून अचानक नवीन नावदेखील समोर येऊ शकते अशी शक्यता काळे यांनी व्यक्त केली आहे़जळगाव जिल्ह्यातील तालुकाध्यक्षपदासाठी शनिवारी सायंकाळपर्यंत सात तालुक्यामधुन प्रत्येकी एकच नाव आल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे़ यामध्ये भासवळ, मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव या तालुक्यांचा समावेश आहे.प्रदेश प्रतिनिधींकरीता जिल्ह्यातून प्रत्येक क्षेत्रातून तीन अर्ज मागविण्यात आले असून असे एकूण ३३ अर्ज प्राप्त झाले आहेत़२९ रोजी पुण्यात प्रदेशाध्यक्षांची निवड होणार असून त्याच वेळी वरील सात तालुक्याध्यक्षांचीही नावे जाहीर होती, असेही काळे यांनी सांगितले़यावेळी माजी़ जि प़ अध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आ़मदार अरुण पाटील, विकास पवार, महिला अध्यक्षा कल्पना पाटील, महिला कार्याध्यक्षा मीनल पाटील, युवती अध्यक्षा कल्पिता पाटील, माजी महिला शहराध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, ओबीसी सेलचे अध्यक्ष उन्मेश नेमाडे, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष रोहण सोनवणे, जि.प़ सदस्य रवींद्र पाटील, माजी सभापती राजेंद्र चौधरी, मुकेश येवले, राजेंद्र पाटील, अरविंद मानकरे, गणेश निंबाळकर आदी उपस्थित होते़.जामनेरात प्रयत्न पूर्ण प्रयत्न केलेजामनेर नगरपालिका निवडणुकीत पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही, यावर रंगनाथ काळे यांना विचारले असता, ते म्हणाले जामनेरमध्ये पूर्ण प्रयत्न केले. त्यात यश येऊ शकले नाही. इतरही निवडणुकांमध्ये फितुरांमुळे अपयश येत असल्याच्या चर्चेबद्दल विचारले असता फितुरांवर कारवाई झाली पाहिजे व कोणत्याही निवडणुकीच्या वेळी वरिष्ठ नेत्यांनी तेथे गेले पाहिजे, असे मत काळे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव