शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

राष्ट्रवादीच्या जळगाव जिल्हाध्यपदावर पक्षश्रेष्ठी करणार शिकामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 12:56 IST

निरीक्षक रंगनाथ काळे यांची माहिती

ठळक मुद्देसात तालुक्यातून तालुकाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एकच नावजामनेरात प्रयत्न पूर्ण प्रयत्न केले

आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. २२ - जिल्ह्यातील ११ विधानसभा क्षेत्रातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६६ जिल्हा प्रतिनिधींची नावे जिल्हा निरीक्षकांकडे पाठविण्यात आली असून रविवारी जिल्हाध्यक्ष निवडीसंदर्भात बैठक होणार आहे. यामध्ये जिल्हा प्रतिनिधींनी सुचविलेल्या नावाव्यतिरिक्त उमेदवार पक्षश्रेष्ठींना सक्षम वाटत असेल तर, त्यांच्या नावावरही शिकामोर्तब करु शकतात, असे संकेत जिल्हा निरीक्षक रंगनाथ काळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिले़राष्ट्रवादी काँग्रेसच्या महानगराध्यक्ष तसेच तालुका निवडी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात शनिवारी बैठक झाली. यामध्ये नीलेश पाटील यांचे महानगराध्यक्षपदासाठी एकमेव नाव सुचविण्यात आले. या निवडीसंदर्भात तालुक्याच्या ठिकाणी निरीक्षक पाठविण्यात आले होते. प्रत्येक विभानसभा क्षेत्रातून तीन प्रदेश प्रतिनिधी व सहा जिल्हा प्रतिनिधीनींची नावे देण्यात आली. ही नावे प्रदेशाध्यक्षांकडे पाठविण्यात येणार असून त्यापैकी एक नाव जिल्हाध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात येणार आहे़ परंतु पक्षश्रेष्ठींकडून अचानक नवीन नावदेखील समोर येऊ शकते अशी शक्यता काळे यांनी व्यक्त केली आहे़जळगाव जिल्ह्यातील तालुकाध्यक्षपदासाठी शनिवारी सायंकाळपर्यंत सात तालुक्यामधुन प्रत्येकी एकच नाव आल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे़ यामध्ये भासवळ, मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव, एरंडोल, पारोळा, चाळीसगाव या तालुक्यांचा समावेश आहे.प्रदेश प्रतिनिधींकरीता जिल्ह्यातून प्रत्येक क्षेत्रातून तीन अर्ज मागविण्यात आले असून असे एकूण ३३ अर्ज प्राप्त झाले आहेत़२९ रोजी पुण्यात प्रदेशाध्यक्षांची निवड होणार असून त्याच वेळी वरील सात तालुक्याध्यक्षांचीही नावे जाहीर होती, असेही काळे यांनी सांगितले़यावेळी माजी़ जि प़ अध्यक्ष रवींद्र पाटील, माजी आ़मदार अरुण पाटील, विकास पवार, महिला अध्यक्षा कल्पना पाटील, महिला कार्याध्यक्षा मीनल पाटील, युवती अध्यक्षा कल्पिता पाटील, माजी महिला शहराध्यक्षा प्रतिभा शिरसाठ, ओबीसी सेलचे अध्यक्ष उन्मेश नेमाडे, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष रोहण सोनवणे, जि.प़ सदस्य रवींद्र पाटील, माजी सभापती राजेंद्र चौधरी, मुकेश येवले, राजेंद्र पाटील, अरविंद मानकरे, गणेश निंबाळकर आदी उपस्थित होते़.जामनेरात प्रयत्न पूर्ण प्रयत्न केलेजामनेर नगरपालिका निवडणुकीत पक्षाला एकही जागा जिंकता आली नाही, यावर रंगनाथ काळे यांना विचारले असता, ते म्हणाले जामनेरमध्ये पूर्ण प्रयत्न केले. त्यात यश येऊ शकले नाही. इतरही निवडणुकांमध्ये फितुरांमुळे अपयश येत असल्याच्या चर्चेबद्दल विचारले असता फितुरांवर कारवाई झाली पाहिजे व कोणत्याही निवडणुकीच्या वेळी वरिष्ठ नेत्यांनी तेथे गेले पाहिजे, असे मत काळे यांनी व्यक्त केले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव