शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

नटवर्य मधुकर तोरडमल आणि चाळीसगाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 16:15 IST

वयाच्या 84व्या वर्षी 2 जुलै रोजी त्यांचे निधन झाले

 ऑनलाईन लोकमत

 
जळगाव, दि.8 - हुपेडी व्यक्तिमत्त्व, उत्तम शरीरयष्टी, संवादांना न्याय देणारा भारदस्त आवाज.. या अंगभूत गुणवैशिष्टय़ांवर नटवर्य प्रा. मधुकर तोरडमल यांनी नाटय़सृष्टीवर आपले गारुड सदैव झळाळत ठेवले. वयाच्या 84व्या वर्षी 2 जुलै रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या एकूणच कलंदर व संघर्षमय आयुष्याशी चाळीसगावचे अनेकविधी पदर जोडले गेलेय. त्यांचा जन्मच चाळीसगावचा. वयाच्या सातव्या वर्षी त्यांच्या कुटुंबाचे अहमदनगरला स्थलांतर झाले. तथापि, चाळीसगावचे इनामदार असणा:या तोरडमल यांनी जन्मभूमीचा हात सुटू दिला नाही. त्यांच्या ‘तिसरी घंटा’ या आत्मचरित्रात ‘चाळीसगावचा सविस्तर प्रवेश’ रेखाटलाय. अर्थात चाळीसगावच्या सांस्कृतिक वैभवाला मधुकर तोरडमल या नावाने नवी उंचीही मिळाली आहे.
त्यांचे आजोबा स्वातंत्र्यपूर्व कालखंडात ब्रिटिश सरकारमध्ये डेप्युटी सुप्रिटेंडेंट होते. नाशिकला 1909 मध्ये कलेक्टर ज्ॉक्सन यांचा अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी वध केला, याच प्रकरणात रावबहादूर असणा:या मधुकर तोरमडल यांच्या आजोबांनी मारेक:याला जेरबंद करण्यात यश मिळवले. याची बक्षिसी म्हणून ब्रिटिश शासकांनी ‘सोअर्ड ऑफ ऑर्नर’ हा किताब देऊन त्यांना गौरवितानाच चाळीसगावपासून अवघ्या 20-25 कि.मी.वर असणा:या खराडी या गावी 500 एकर इनामी जमीनही दिली.
 खराडी गावाजवळील शिंदी गावातही त्यांच्या मालकीची 50 एकर जमीन होती. पुढे तोरडमल परिवार खराडी गावी स्थायिक झाला.
दरोडेखोरांशी पंगा आणि खराडी सोडले
खराडी गावातील तोरडमल यांच्या शेतात त्या काळात एक दरोडेखोर लपून बसला होता. त्यांच्या वडिलांनी थेट त्याच्याशी पंगा घेत पोलिसांकरवी  त्याला गजाआड केले. दरोडेखोराने त्यांना धमकीही दिली. याच धसक्याने त्यांच्या वडिलांनी खराडी गावातून आपले बि:हाड चाळीसगावी हलवले. स्टेशन पलीकडील माणेकजी पारशी यांच्या इमारतीत ते भाडेकरू म्हणून राहू लागले.
पाटस्कर ‘मधुकर’चा वाडय़ात जन्म
नेहरूंच्या मंत्रीमंडळातील हरिभाऊ पाटस्कर यांच्याशी मधुकर तोरडमल यांच्या परिवाराचा स्नेह होता. पाटस्करांचा एक वाडा रिकामा होता.  त्याची ख्याती तेव्हा भूतबंगला अशी होती. हाच बंगला त्यांच्या वडिलांनी विकत घेतला. तोरडमल कुटुंबीय पाटस्करांच्या वाडय़ात राहू लागले. 24 जुलै 1932 रोजी याच बंगल्यात मधुकर तोरडमल यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांनी तीन विवाह केले, मधुकर तोरडमल हे त्यांच्या तिस:या पत्नीचे अपत्ये. त्यांना दोन भाऊ व एक बहीण अशी भावंडं होती.
अन् रात्रीतून चाळीसगावाहून स्थलांतर
इंग्रजी अमलाखालील भारतीयांमध्ये शेकडो जाती, पोटभेद होते. यामुळे समाजात दुही होती. जातीजातीत श्रेष्ठ-कनिष्ठ वादही होते. याचा फटका मधुकर तोरडमल यांनाही सोसावा लागला. या कालखंडात पाटील-देशमुख या दोन मराठा जातीत वाद होते. त्यांच्या आजी पार्वताबाईंच्या निधनानंतर त्यांचे प्रेतदहन कोणत्या स्मशानभूमीत  करायचे, यावरून वाद झाले. चाळीसगावातील काही बडय़ा वजनदार  व्यक्तींनी तोरडमल कुटुंबाची उपरे म्हणून संभावना केली. 
पुढे मात्र काही व्यक्तींनी त्यांच्या वडिलांवर कजर्वसुलीच्या जप्तीचे बालंट आणले. यातून सुटका करण्यासाठी मधुकर तोरडमल हे सात वर्षाचे असताना एका रात्री 15 मार्च 1939 रोजी त्यांच्या वडिलांनी चाळीसगाव सोडले. आपले बि:हाड  अहमदनगरला हलविले.
 त्यानंतर तब्बल 22 वर्षानी मधुकर तोरडमल हे चाळीसगावी आले होते.
खराडी, शिंदीच्या जमिनीसाठी संघर्ष
इंग्रजी राजवटीत जहागीरदार-इनामदार  यांना काही  अडचण आल्यास किंवा वारस सज्ञान होईर्पयत त्यांची मालमत्ता ‘कोर्ट ऑफ वॉर्डस्’  म्हणून सरकार सांभाळत असे. इतर लोकांसाठी  ‘इस्टेट  नाझर’ अशी सोय होती. कजर्बाजारी पणामुळे मधुकर तोरडमल यांच्या वडिलांनी खराडी व शिंदी येथील साडेपाचशे एकर जमीन कोर्ट ऑफ वॉर्डस् म्हणून सरकारकडे जमा केली. 1944मध्ये मधुकर तोरडमल यांनी मुंबई गाठली. त्यांचे जमिनीकडे दुर्लक्ष झाले. 20 जून 1972 रोजी ते खराडी येथे महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्णयानुसार कुळांकडून जमीन ताब्यात घेण्यासाठी आले. मात्र, कालांतराने न्यायालयाने शासन निर्णयाला स्थगिती दिली.
 शिंदी येथील सखाराम दौंड यांच्याशी त्यांचा जमीन संघर्ष सुरू होता. 1990 र्पयत स्वत: मधुकर तोरडमल यांनी चाळीसगाव न्यायालयाच्या अनेक वा:या केल्या. पुढे 2010 र्पयतही कोर्टात प्रकरण सुरू होते. शेवटी त्यांच्या  वकिलानेही जमीन परत मिळवण्याचा नाद सोडून दिला.
जन्मस्थान चाळीसगावच : मधुकर तोरडमल यांच्या ‘तिसरी घंटा’ या आत्मचरित्रात चाळीसगावविषयी स्वतंत्र प्रकरण आहे. यात त्यांनी त्यांचा जन्म चाळीसगाव येथेच झाल्याचे स्पष्ट नमूद केले आहे.  1989 मध्ये शेठ नारायण बंकट वाचनालयाच्या सरस्वती व्याख्यानमालेसाठी स्व.डॉ.वा.ग.पूर्णपात्रे यांनी, त्यांना निमंत्रित केले होते. 14 ऑक्टोबर 1989 रोजी त्यांचे व्याख्यान झालेही.  व्याख्यानमालेच्या अभिप्राय वहीत त्यांनी अभिप्राय लिहिताना सुरुवात ‘चाळीसगाव हे माङो जन्मगाव’ या वाक्याने केली असल्याची माहिती ग्रंथपाल अण्णा धुमाळ यांनी दिली. 
- जिजाबराव वाघ