शहरं
Join us  
Trending Stories
1
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
2
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
3
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
4
सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले...
5
वादग्रस्त विधानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज; आ. गोपीचंद पडळकरांना केला फोन, म्हणाले...
6
सर्वच नावं परप्रांतीय कशे? राजुऱ्यातील ६,८५३ मतदारांच्या वोट चोरीच्या आरोपांवर आयोगाकडून थंड प्रतिसाद
7
"पाकिस्तान, बांगलादेशमध्ये घरात असल्यासारखं वाटतं’’, काँग्रेसच्या सॅम पित्रोदा यांचं विधान, Gen-Z ला केलं असं आवाहन    
8
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
9
सर्वपित्री अमावास्या २०२५: सर्वपित्री अमावस्येला सूर्यग्रहण; त्यादिवशी श्राद्धविधी करावे की नाही?
10
E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी?  
11
Video:"...तर मंत्रिपदाची खुर्ची सोडावी लागेल"; DCM अजित पवारांनी पक्षातील नेत्यांचे कान टोचले
12
आयफोन १६ खरेदी करण्याची योग्य वेळ; २७ हजारांहून अधिक रुपये वाचतील, कुठे सुरू आहे ऑफर?
13
अतिशय गुप्तपणे अमेरिकेचे सैन्य बांगलादेशात पोहचलं; १२० जवान दाखल, काही तरी मोठं घडतंय?
14
‘मला एकटे पाडण्यासाठी मोठा राजकीय डाव शिजतोय’; मनोज जरांगे यांचा खळबळजनक दावा
15
कमाल झाली राव! वजन कमी होईल अन् चेहऱ्यावर ग्लो येईल; रोज 'हे' फळ खाल्ल्याचे 'जादुई' फायदे
16
India vs Oman सामन्याआधीच्या सराव सत्रात ६ खेळाडू गैरहजर? टीम इंडियात नेमकं काय घडतंय...
17
आर्यनची केस लढण्यास मुकुल रोहतगींनी दिलेला नकार, शाहरुख खान थेट त्यांच्या पत्नीशीच बोलला
18
राज ठाकरे यांनी अंबरनाथमध्ये कार्यकर्त्यांना दिला असा कानमंत्र, पितृपक्षाबाबत म्हणाले... 
19
एका क्लिकमध्ये मिळणार PF ची पूर्ण हिस्ट्री; EPFO नं बदलली पासबुक पाहण्याची सुविधा
20
Tanya Mittal : "नवऱ्याला राजासारखं ठेवेन", बेरोजगाराशी लग्न करण्यास तयार आहे तान्या मित्तल, म्हणाली...

‘निसर्ग’ चक्रीवादळाने बदलली तीनवेळा दिशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 12:02 IST

जळगाव : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग वादळाने २४ तासात तीनवेळा दिशा बदलली. यातच सुदैवाने वेग मंदावल्याने हानी कमी ...

जळगाव : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या निसर्ग वादळाने २४ तासात तीनवेळा दिशा बदलली. यातच सुदैवाने वेग मंदावल्याने हानी कमी झाली आहे. या वादळ आणि पावसामुळे रात्री अनेक भागात वीज पुरवठा खंडीत झाला होता.निसर्ग वादळाने गुजरात व महाराष्टÑाच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता होती. मात्र, हे वादळ कोकण किनारपट्टीवर धडकले. त्यानुसार उत्तर महाराष्टÑात हे वादळ धुळे व शिरपूर मार्गे मध्यप्रदेशकडे मार्गक्रमण करेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. तसेच बुधवारी रात्री १ वाजेपर्यंत वादळ जाणार होते. मात्र, नाशिकला वादळ पोहचल्यानंतर अचानक वादळाने दिशा बदलली मालेगावकडे न वळता हे वादळ मनमाडमार्गे चाळीसगाव परिसरात घुसले, त्यानंतर पुन्हा वादळाने दिशा बदलली शेवटी पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगरमार्गे या वादळाने मध्यप्रदेशकडे मार्गक्रमण झाले.सुदैवाने वेग मंदावल्याने हानी कमीअरबी समुद्रातून हे वादळ कोकणात धडकल्यानंतर उत्तर महराष्टÑाकडे येत असताना वादळाचा वेग मंदावला होता. तसेच वादळाचा मुख्य परिघ देखील कमी झाला होता.जिल्ह्यात चक्रीवादळाने प्रवेश केला तेव्हा परिघातील वाऱ्यांचा वेग ४० ते ५० किमी प्रतितास वेग होता तर भोवताली हा वेग ३० ते ३५ किमी प्रतितास इतका होता. त्यामुळे सुदैवाने जिल्ह्यात वादळामुळे फार काही हानी झाली नाही.दरम्यान अरबी समुद्रातून किनारपट्टीवर झेपावल्यानंतर ते कोकणात घोंगावू लागले. कोकणात वाºयाचा वेग हा ताशी १०० ते १२० किमी असा होता. मात्र हळूहळू हे वादळ मुंबईकडे सरकू लागले. नवीमुंबईतही वाºयाचा वेग ताशी १०० किमीपर्यंतच होता.मात्र मुख्य मुंबईत वाºयाचा वेग कमी झाला. हे वादळ नाशिक जिल्ह्यात येइपर्यंत वाºयाचा वेग मंदावला असला तरी तो तितकाही कमी नव्हता. त्यानंतर हे वादळ भुसावळमार्गे मध्यप्रदेशाकडे सरकणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिल्यानंतर जिल्हा प्रशासन अधिक दक्ष झालं.मात्र जळगावात या वाºयाचा वेग हा ३० ते ३५ किमी प्रतितास एवढा कमी होता. त्यामुळे शेतांमध्येदेखील सध्या केवळ केळीचे पीक असल्याने केळी उत्पादक शेतकरी वगळता शेतकऱ्यांनाही फारसा फटका या वादळामुळे बसला नाही आणि त्यानंतर हे वादळ शमलं, त्याचे रुपांतर कमी दाबाच्या पट्ट्यात झाल्याचे हवामान खात्याने सांगितले.केळीचे नुकसानबुधवारी रात्री निसर्ग वादळामुळे २५ ते ३० किमी वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे यावल, चोपडा, जळगाव, मुक्ताईनगर तालुक्यातील केळीच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे.यासह जोरदार वाºयामुळे अनेक ठिकाणी वीजेचे खांबदेखील कोसळल्याने जळगाव ग्रामीणसह अनेक तालुक्यांमधील गावांमध्ये वीज पुरवठा खंडीत झाला होता. दरम्यान, रात्री निसर्ग वादळाने दिशा बदलल्यामुळे धुळे जिल्ह्यातून हे वादळ न जाता जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, मुक्ताईनगर मार्गे गेले. मात्र, त्याचा वेग काही प्रमाणात मंदावला होता. 

टॅग्स :cultureसांस्कृतिकJalgaonजळगाव