शहरं
Join us  
Trending Stories
1
Cyclone Ditva: 'दितवाह' चक्रीवादळ भारताच्या दिशेने; श्रीलंकेत ४६ जणांचा बळी, 'या' राज्यांमध्ये सतर्कतेचा इशारा!
2
धक्कादायक! अंत्यसंस्कारासाठी जात असताना डंपर कारवर उलटला, एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू
3
पाकिस्तानात जोरदार राडा! खैबर-पख्तूनख्वाच्या मुख्यमंत्र्यांना पोलिसांनी लाथा-बुक्क्यांनी मारले; इम्रान खान मृत्यू प्रकरण...
4
पुतिन यांच्या भारत दौऱ्याची तारीख ठरली; पीएम मोदींशी ऊर्जा, संरक्षण, व्यापारावर होणार चर्चा
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
दत्त जयंती २०२५: ७ दिवस शक्य नाही, मग ३ दिवसांत गुरुचरित्र पारायण करता येते; कसे? पाहा, नियम
7
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न कधी होणार? आई अमिता मुच्छल यांनी दिली मोठी अपडेट
8
दमदार कमाईची संधी! ५४२१ कोटींचा IPO ३ डिसेंबरला उघडणार; जीएमपी-प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
9
वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा टीम इंडियाकडून खेळणार, संघाचे नेतृत्व 'मराठी मुलगा' करणार !
10
रिलायन्स इंडस्ट्रीजला ५६.४४ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस, पाहा काय आहे प्रकरण?
11
Maharashtra Crime: प्रचार करत असतानाच भाजप उमेदवारावर जीवघेणा हल्ला; अनिकेत नाकाडेंसोबत काय घडलं?
12
AI च्या मदतीने बनवला एसी लोकल पास, अंबरनाथमधील इंजिनिअर पती- उच्चशिक्षित पत्नीला अटक; दोघे कसे अडकले?
13
Elephant Attack: स्कूटरवरून खेचलं, सोंडेनं उचलून जमिनीवर आपटलं, मग...; हत्तीच्या हल्ल्यात मुलगा ठार
14
संतापजनक! १५ एप्रिल रोजी कोर्ट मॅरेज,२२ नोव्हेंबरला पत्नीची हत्या; नेमके प्रकरण काय?
15
नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुका ठरलेल्या वेळेनुसार होणार, स्थगिती नाही: सुप्रीम कोर्ट
16
फायरिंगचा शौक! कपिल शर्मा कॅफे गोळीबार प्रकरणात अटक केलेला बंधू मान सिंह आहे तरी कोण?
17
'सहारा'त अडकलेले कोट्यवधी रुपये परत मिळणार! 'हे' ठेवीदार ऑनलाइन करू शकतात अर्ज
18
"ते जिवंत असल्याचा कोणता पुरावाही नाहीये"; इम्रान खानचा मुलगा झाला भावूक, पाकिस्तान सरकारवर गंभीर आरोप
19
Black Friday Sale 2025: ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये ६५% पर्यंत स्वस्तात मिळताहेत TV-फ्रिज; पाहा ऑफर आणि किंमत
20
निधनापूर्वी धर्मेंद्र यांनी पाहिला होता हा चित्रपट, आमिर खानचा खुलासा, म्हणाला - 'ती स्क्रिप्ट त्यांना...'
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय सेवा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:15 IST

नाव लेखक - डॉ. पंकजकुमार नन्नवरे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना २४ सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिन. सन ...

नाव

लेखक - डॉ. पंकजकुमार नन्नवरे, संचालक,

राष्ट्रीय सेवा योजना २४ सप्टेंबर हा राष्ट्रीय सेवा योजनेचा स्थापना दिन. सन १९६९ मध्ये याच दिवशी सुरू झालेल्या या सामाजिक उत्तरदायित्व

प्रवासाला म्हणता-म्हणता ५२ वर्ष झाली आहेत. योजनेचा प्रारंभ करण्याबाबतची संकल्पना ही राष्ट्रपिता महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांची होती. स्वातंत्र्योत्तर काळात देशातील युवकांनी विशेषत: महाविद्यालयीन तसेच विद्यापीठीय युवकांनी देशातील लोकांच्या सेवेसाठी काही रचनात्मक कार्य केले पाहिजे. सन १९६९ मध्ये एक पायलट स्वरूपात देशभरातील केवळ ३७ विद्यापीठात आणि केवळ ४० हजार विद्यार्थ्यांसाठीच ही योजना होती. हळूहळू ही योजना विस्तारित होत गेली. महाराष्ट्रात २७ कृषी विद्यापीठे, आरोग्य विद्यापीठे, अकृषी विद्यापीठे, तंत्रविद्यापीठ, मत्स्य व इतर महाविद्यालये मिळून ३ लाख २७ हजार ७०० रासेयो स्वयंसेवक सध्या राष्ट्रीय सेवा योजनेत कार्यरत आहेत. आजमितीस संपूर्ण भारतात ३१ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील राष्ट्रीय सेवा योजनेत ३२ लाखापेक्षा जास्त स्वयंसेवकांचा सहभाग आहे.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मनात सामाजिक जाणीव निर्माण करणे त्याचे ग्रामीण भागासाठी संबंध वृद्धिंगत व्हावे व त्यांचा सर्वांगीण व्याक्तिमत्त्व विकास घडवून आणणे या उद्देशाने राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना झाली. स्वावलंबन, चारित्र्य संवर्धन व सामाजिक बांधीलकी या मूल्यांचा समन्वय नवीन शिक्षण पद्धतीत घडवून आणण्यासाठी दरवर्षी २४ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान रासेयो सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या

सप्ताहाभरात रासेयो एकक असलेल्या महाविद्यालयांमध्ये स्पर्धा आयोजित करून हा रासेयो सप्ताह साजरा करतात. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य हे समाजसेवेशी निगडित असून यामध्ये सहभागी स्वयंसेवक हे आपत्ती व्यवस्थापन, साथरोग, संसर्गजन्य आजार, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती संकटकाळी येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जातात. ते आपल्या शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक उपक्रमातदेखील सहभागी होत असतात.

राष्ट्रीय सेवा योजना एकक महाविद्यालयांतर्फे तीन वर्षासाठी एक गाव दत्तक घेण्यात येत असते. दत्तक गावाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, आरोग्यविषयक इत्यादी विविध समस्यांवर स्वयंसेवकाद्वारे काम केले जाते.

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सांगितले की, खेड्याकडे चला या मूलमंत्राच्या अनुषंगाने जळगाव, धुळे, नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यातील राष्ट्रीय सेवा योजना एककांद्वारे त्या त्या दत्तक गावात कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्टा सुरू करण्यात येत आहे.

हम सब मिलकर देश का अपने जग में नाम जगायेंगे।।

एनएनएस का परचम लेकर आगे बढते जायेंगे।।

राष्ट्रीय सेवा योजनेच्या या गीतात म्हटल्याप्रमाणे राष्ट्रीय सेवा योजनेचे हे स्वयंसेवक हे रासेयोचा संदेश घेऊन भारतमातेचे नाव उंचाविण्यासाठी प्रयत्न करतच राहतील यात शंका नाही.