शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता निलेश भिल अखेर सापडला....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2018 18:04 IST

राष्ट्रीय बालशौर्य पदक विजेता आणि गेल्या नऊ महिन्यापासून बेपत्ता असलेला निलेश रेवाराम भिल्ल हा गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे सापडला आहे

मुक्ताईनगर (जि.जळगाव) - राष्ट्रीय बालशौर्य पदक विजेता आणि गेल्या नऊ महिन्यापासून बेपत्ता असलेला निलेश रेवाराम भिल्ल हा गोरखपूर (उत्तरप्रदेश) येथे सापडला आहे.  सध्या तो ‘चाईल्ड लाईन’ या स्वयंसेवी संस्थेच्या वसतीगृहात आहे. शनिवारी दुपारी या संस्थेने  मुक्ताईनगर पोलिसांशी संपर्क साधून निलेशबाबत माहिती दिली.

 कोथळी ता. मुक्ताईनगर येथून  १६ मे २०१७ पासून निलेश बेपत्ता झाला होता. कोथळी येथे मुक्ताईच्या जलाशयात वफुली (ता. जि.   बुलढाणा)  येथील भाविक ओंकार उगले यांचा मुलगा भागवत हा अंघोळीसाठी गेला होता. त्याचवेळी घाटावरील पायºयांवरून पाय घसरून भागवत हा जलाशयात पडला. तो खोल पाण्यात बुडत असताना निलेशने पाण्यात उडी टाकून त्याचे प्राण वाचवले होते.  ३० ऑगस्ट २०१५ रोजी ही घटना  घडली होती. या शौर्याबाबत त्याला २६ जानेवारी २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बालशौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले होते.

बक-या चारल्या नाही व त्या उपाशी राहिल्या म्हणून बाबा  रागावतील या भीतीने निलेश भिल्ल व त्याचा लहान भाऊ गणपत याने १६ मे २०१७ रोजी घर सोडले होते. त्या दिवसापासून या दोघा भावंडांचा शोध सुरु झाला. अल्पवयीन असल्याने पोलिसांनीही दक्षता बाळगत अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. बालशौर्य पुरस्कार विजेता निलेश  भिल्ल बेपत्ता होणे हे प्रकरण प्रशासनासमोर आव्हान बनले होते. २१ मे २०१७ रोजी पंतप्रधान कार्यालयाकडूनसुद्धा याबाबत माहिती घेण्यात आली होती.

१६ ऑगस्ट २०१६  रोजी गणपत हा कानपूर येथील बाल सुधारगृहात आढळला होता. यामुळे नीलेशही सापडणार अशी  आशा होती.आता नऊ महिन्या नंतर निलेश हा गोरखपूर येथील ‘चाईल्ड लाइन ऑफिस’ येथे आढळला आला आहे. मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  माणिक निकम, हवालदार कांतिलाल केदारे व नीलेशचे आई -बाबा खाजगी वाहनाने शनिवारी सायंकाळी गोरखपूरकडे रवाना झाले आहेत.