शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

महामार्ग वाढीव भूसंपादनाला नशिराबाद ग्रामस्थांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:35 IST

नशिराबाद : महामार्ग चौपदरी करण्याच्या कामाने गती घेतली आहे. चौपदरीकरण्याच्या कामासाठी वाढीव भूसंपादन करण्यासाठी हालचाली सुरू आहे. त्याकरिता सोमवारी ...

नशिराबाद : महामार्ग चौपदरी करण्याच्या कामाने गती घेतली आहे. चौपदरीकरण्याच्या कामासाठी वाढीव भूसंपादन करण्यासाठी हालचाली सुरू आहे. त्याकरिता सोमवारी जागा मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना काहींनी सहमती तर अनेकांनी विरोध दर्शवला. यापूर्वी संपादित केलेल्या जागेतच महामार्गाचे काम करावे नव्याने पुन्हा भूसंपादन करू नका, असा आग्रह भूसंपादीतन होणाºया नागरिकांनी केला. पुन्हा वाढीव भूसंपादन झाल्यास त्यामुळे होणाºया अडचणी व्यथांचा पाढा नागरिकांनी मांडला.नशिराबाद महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. चौपदरीकरणासाठी गरजेनुसार वाढीव भूसंपादन करण्याचे हालचाली गतिमान झाले आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात संबंधित शेती,प्लॉट, धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार वाढीव भूसंपादनासाठी मोजणीला सोमवारी संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग आले होते. त्यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. वाढीव भूसंपादनाला विरोधाची कारणे कथन केले. तर काहींनी मोजणी करा आमची सहमती आहे असे सांगितले असल्याची माहिती अधिकारीवर्गाने दिली. यापूर्वी संपादित जागेतच महामार्गाचे काम करावे पुन्हा वाढीव भूसंपादन करू नका. असे सांगत मोजणीला हरकत घेतली. अधिकारी वर्गाने त्याचा पंचनामा केला. उपअधीक्षक भूमिअभिलेख भूमापक प्रफुल्ल पाटील, नही विभागाचे सहाय्यक सहकारी शशीभूषण जोशी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सरपंच विकास पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, गणेश पाटील, विनायक धर्माधिकारी, बंडू भोळे,आरिफ शेख, शरद महाजन, अशोक महाजन, दीपक कोष्टी ,गिरीश रोटे, समीर दीक्षित, सुबोध चौधरी,छबीलदास खडके, लक्ष्मण महाजन, हितेश महाजन, संजय चौधरी आदी उपस्थित होते.वाढीव भूसंपादनाने होणार नुकसानवाढीव भूसंपादन झाल्यास संबंधित शेतकरी, प्लॉटधारक, घर यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आधीच भूसंपादन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला. काही ठिकाणी असलेले व्यवसाय चालक याचे जागा भूसंपादनात गेल्यास उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न उभा राहणार असल्याचा दावा उपस्थित नागरिकांनी केला. त्यामुळे वाढीव भूसंपादन करू नका अशी आग्रही मागणी भूसंपादित होणाºया नागरिकांनी केली. गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी ही नही विभागाला वाढीव भूसंपादन करू नका या संदर्भात निवेदने दिली होती.-वाढीव भूसंपादन झाल्यास नशिराबाद लगत असलेल्या दोन्ही बाजूंच्या व्यवसायिक, प्लॉटधारक, शेतकरी, दुकानदार यांच्या मोठे नुकसान होऊन घरांची तोडफोड करावी लागणार आहे. त्यामुळे वाढीव भुसंपादन होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.-सहमती दर्शविलेल्या नागरिकांच्या भूसंपादनाची मोजणी केली असता काही ठिकाणी वाढीव भूसंपादनाची गरज नसल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव