शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग वाढीव भूसंपादनाला नशिराबाद ग्रामस्थांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:35 IST

नशिराबाद : महामार्ग चौपदरी करण्याच्या कामाने गती घेतली आहे. चौपदरीकरण्याच्या कामासाठी वाढीव भूसंपादन करण्यासाठी हालचाली सुरू आहे. त्याकरिता सोमवारी ...

नशिराबाद : महामार्ग चौपदरी करण्याच्या कामाने गती घेतली आहे. चौपदरीकरण्याच्या कामासाठी वाढीव भूसंपादन करण्यासाठी हालचाली सुरू आहे. त्याकरिता सोमवारी जागा मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना काहींनी सहमती तर अनेकांनी विरोध दर्शवला. यापूर्वी संपादित केलेल्या जागेतच महामार्गाचे काम करावे नव्याने पुन्हा भूसंपादन करू नका, असा आग्रह भूसंपादीतन होणाºया नागरिकांनी केला. पुन्हा वाढीव भूसंपादन झाल्यास त्यामुळे होणाºया अडचणी व्यथांचा पाढा नागरिकांनी मांडला.नशिराबाद महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. चौपदरीकरणासाठी गरजेनुसार वाढीव भूसंपादन करण्याचे हालचाली गतिमान झाले आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात संबंधित शेती,प्लॉट, धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार वाढीव भूसंपादनासाठी मोजणीला सोमवारी संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग आले होते. त्यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. वाढीव भूसंपादनाला विरोधाची कारणे कथन केले. तर काहींनी मोजणी करा आमची सहमती आहे असे सांगितले असल्याची माहिती अधिकारीवर्गाने दिली. यापूर्वी संपादित जागेतच महामार्गाचे काम करावे पुन्हा वाढीव भूसंपादन करू नका. असे सांगत मोजणीला हरकत घेतली. अधिकारी वर्गाने त्याचा पंचनामा केला. उपअधीक्षक भूमिअभिलेख भूमापक प्रफुल्ल पाटील, नही विभागाचे सहाय्यक सहकारी शशीभूषण जोशी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सरपंच विकास पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, गणेश पाटील, विनायक धर्माधिकारी, बंडू भोळे,आरिफ शेख, शरद महाजन, अशोक महाजन, दीपक कोष्टी ,गिरीश रोटे, समीर दीक्षित, सुबोध चौधरी,छबीलदास खडके, लक्ष्मण महाजन, हितेश महाजन, संजय चौधरी आदी उपस्थित होते.वाढीव भूसंपादनाने होणार नुकसानवाढीव भूसंपादन झाल्यास संबंधित शेतकरी, प्लॉटधारक, घर यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आधीच भूसंपादन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला. काही ठिकाणी असलेले व्यवसाय चालक याचे जागा भूसंपादनात गेल्यास उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न उभा राहणार असल्याचा दावा उपस्थित नागरिकांनी केला. त्यामुळे वाढीव भूसंपादन करू नका अशी आग्रही मागणी भूसंपादित होणाºया नागरिकांनी केली. गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी ही नही विभागाला वाढीव भूसंपादन करू नका या संदर्भात निवेदने दिली होती.-वाढीव भूसंपादन झाल्यास नशिराबाद लगत असलेल्या दोन्ही बाजूंच्या व्यवसायिक, प्लॉटधारक, शेतकरी, दुकानदार यांच्या मोठे नुकसान होऊन घरांची तोडफोड करावी लागणार आहे. त्यामुळे वाढीव भुसंपादन होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.-सहमती दर्शविलेल्या नागरिकांच्या भूसंपादनाची मोजणी केली असता काही ठिकाणी वाढीव भूसंपादनाची गरज नसल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव