शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

महामार्ग वाढीव भूसंपादनाला नशिराबाद ग्रामस्थांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 12:35 IST

नशिराबाद : महामार्ग चौपदरी करण्याच्या कामाने गती घेतली आहे. चौपदरीकरण्याच्या कामासाठी वाढीव भूसंपादन करण्यासाठी हालचाली सुरू आहे. त्याकरिता सोमवारी ...

नशिराबाद : महामार्ग चौपदरी करण्याच्या कामाने गती घेतली आहे. चौपदरीकरण्याच्या कामासाठी वाढीव भूसंपादन करण्यासाठी हालचाली सुरू आहे. त्याकरिता सोमवारी जागा मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना काहींनी सहमती तर अनेकांनी विरोध दर्शवला. यापूर्वी संपादित केलेल्या जागेतच महामार्गाचे काम करावे नव्याने पुन्हा भूसंपादन करू नका, असा आग्रह भूसंपादीतन होणाºया नागरिकांनी केला. पुन्हा वाढीव भूसंपादन झाल्यास त्यामुळे होणाºया अडचणी व्यथांचा पाढा नागरिकांनी मांडला.नशिराबाद महामार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. चौपदरीकरणासाठी गरजेनुसार वाढीव भूसंपादन करण्याचे हालचाली गतिमान झाले आहे. त्यानुसार गेल्या आठवड्यात संबंधित शेती,प्लॉट, धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. त्यानुसार वाढीव भूसंपादनासाठी मोजणीला सोमवारी संबंधित विभागाचे अधिकारी वर्ग आले होते. त्यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. वाढीव भूसंपादनाला विरोधाची कारणे कथन केले. तर काहींनी मोजणी करा आमची सहमती आहे असे सांगितले असल्याची माहिती अधिकारीवर्गाने दिली. यापूर्वी संपादित जागेतच महामार्गाचे काम करावे पुन्हा वाढीव भूसंपादन करू नका. असे सांगत मोजणीला हरकत घेतली. अधिकारी वर्गाने त्याचा पंचनामा केला. उपअधीक्षक भूमिअभिलेख भूमापक प्रफुल्ल पाटील, नही विभागाचे सहाय्यक सहकारी शशीभूषण जोशी यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सरपंच विकास पाटील, माजी सरपंच पंकज महाजन, गणेश पाटील, विनायक धर्माधिकारी, बंडू भोळे,आरिफ शेख, शरद महाजन, अशोक महाजन, दीपक कोष्टी ,गिरीश रोटे, समीर दीक्षित, सुबोध चौधरी,छबीलदास खडके, लक्ष्मण महाजन, हितेश महाजन, संजय चौधरी आदी उपस्थित होते.वाढीव भूसंपादनाने होणार नुकसानवाढीव भूसंपादन झाल्यास संबंधित शेतकरी, प्लॉटधारक, घर यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. आधीच भूसंपादन झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचा आक्षेप नागरिकांनी घेतला. काही ठिकाणी असलेले व्यवसाय चालक याचे जागा भूसंपादनात गेल्यास उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न उभा राहणार असल्याचा दावा उपस्थित नागरिकांनी केला. त्यामुळे वाढीव भूसंपादन करू नका अशी आग्रही मागणी भूसंपादित होणाºया नागरिकांनी केली. गेल्या सहा-सात महिन्यांपूर्वी ही नही विभागाला वाढीव भूसंपादन करू नका या संदर्भात निवेदने दिली होती.-वाढीव भूसंपादन झाल्यास नशिराबाद लगत असलेल्या दोन्ही बाजूंच्या व्यवसायिक, प्लॉटधारक, शेतकरी, दुकानदार यांच्या मोठे नुकसान होऊन घरांची तोडफोड करावी लागणार आहे. त्यामुळे वाढीव भुसंपादन होऊ नये अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.-सहमती दर्शविलेल्या नागरिकांच्या भूसंपादनाची मोजणी केली असता काही ठिकाणी वाढीव भूसंपादनाची गरज नसल्याचे निदर्शनास आले.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव