शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

नंदुरबारातील शंभर खेड्यांचा ‘सिलेज’ने करणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:09 IST

विद्यापीठाला १३ कोटी ९५ लाखांचा निधी

जळगाव : विज्ञान -तंत्रज्ञानावर आधारीत खेड्यांचा विकास करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाने ‘सिलेज’ (सीटी लाईक व्हीलेजेस) हा प्रकल्प हाती घेतला आहे़ यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने मुंबई यांनी १३ कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. नंदुरबारातील शंभर खेड्यांमध्ये ही योजना राबविली जाणार आहे़ कुलगुरु प्रा. पी.पी.पाटील यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली़शासनाकडून विद्यापीठाला प्राप्त झालेल्या २५ एकर जागेत नंदुरबार येथे विद्यापीठाची आदिवासी अकादमी साकार होत आहे़ आदिवासी, ग्रामीण आणि शहरी शिक्षण व ज्ञानाचा एकत्रित सायबर मंच व विद्यापीठातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम भवन येथे स्थापित करण्यात येणार आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई, बायफ पुणे , कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार, एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन या संस्था देखील विद्यापीठाच्या या सिलेज आधारित प्रकल्पास सहकार्य करणार आहेत असे कुलगुरू प्रा.पाटील यांनी सांगितले. विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर हा दुसरा ऐतिहासिक प्रसंग असल्याचे ते म्हणाल़ेशहादा, अक्राणी, धडगाव आणि अक्कलकुवा या चार तालुक्यांमधील १०० गावांमध्ये टप्प्याटप्प्यात उपक्रम राबविले जाणार असून या मध्ये सौरउर्जा, शुध्द पेयजल, पर्यावरणपुरक घरगुती इंधन तंत्रज्ञान, जौविक खते, औषधी वनस्पतींची उती संवर्धनाद्वारे शेती, पोषक अन्नद्रव्ये तंत्रज्ञान तसेच महिलांसाठी तंत्रज्ञान केंद्र यांचा समावेश असेल.आदिवासी समुहातील नवउद्योजक घडविण्यासाठी ैविज्ञान व तंत्रज्ञानावर आधारीत उद्योजक संसाधन केंद्र नंदुरबार येथे स्थापित केले जाणार आहे.या प्रकल्पाचा एक भाग म्हणून बहिस्थ शिक्षण व अध्ययन विभागाच्या वतीने सिलेज फिनीशिंग स्कूल अंतर्गत पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली. प्रकल्पाचे मुख्य समन्वयक प्रा. एस.टी. बेंद्रे, कार्यक्रम समन्वयक व आदिवासी अकादमीचे संचालक प्रा. ए.बी. चौधरी, उपसमन्वयक प्रा. एच.एल. तिडके, प्रा.के.एस. विश्वकर्मा, प्रा.जे.पी.बंगे, प्रा.बी.एल.चौधरी, प्रा.एस.टी. इंगळे व प्रा. एस.एन.पाटील उपस्थित होते.२४ कोटींचा निधी अपेक्षितसिलेज प्रकल्पासाठी सुमारे २४ ते २५ कोटींचा निधी अपेक्षित आहे़ पहिल्या टप्प्यातील निधीला मंजुरी मिळाली असून उर्वरित निधीही लवकरच मंजूर होईल, असे यावेळी सांगण्यात आले़ नंदुरबारातील ज्या गावांमध्ये विकासच पोहचलेला नाही, त्या गावांच्या अनुभवानुसार प्राधान्याने निवड करण्यात आली आहे़ या प्रकल्पांमध्ये स्थानिक लोकांच्या कल्पकतेला महत्त्व देऊन त्यांना संधी दिली जाणार आहे़ पंढरपुरातही हा प्रकल्प राबविला गेल्याचे राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार डॉ. अजित पाटणकर यांनी सांगितले ़ शंभरपैकी ३५ खेडी निश्चित झाल्याची माहितीही त्यांनी दिली़

टॅग्स :Jalgaonजळगाव