शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

नंदुरबारातील शंभर खेड्यांचा ‘सिलेज’ने करणार कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 12:09 IST

विद्यापीठाला १३ कोटी ९५ लाखांचा निधी

जळगाव : विज्ञान -तंत्रज्ञानावर आधारीत खेड्यांचा विकास करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाने ‘सिलेज’ (सीटी लाईक व्हीलेजेस) हा प्रकल्प हाती घेतला आहे़ यासाठी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाने मुंबई यांनी १३ कोटी ९५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. नंदुरबारातील शंभर खेड्यांमध्ये ही योजना राबविली जाणार आहे़ कुलगुरु प्रा. पी.पी.पाटील यांनी गुरुवारी दुपारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली़शासनाकडून विद्यापीठाला प्राप्त झालेल्या २५ एकर जागेत नंदुरबार येथे विद्यापीठाची आदिवासी अकादमी साकार होत आहे़ आदिवासी, ग्रामीण आणि शहरी शिक्षण व ज्ञानाचा एकत्रित सायबर मंच व विद्यापीठातील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम भवन येथे स्थापित करण्यात येणार आहे. भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई, बायफ पुणे , कृषी विज्ञान केंद्र नंदुरबार, एमकेसीएल नॉलेज फाऊंडेशन या संस्था देखील विद्यापीठाच्या या सिलेज आधारित प्रकल्पास सहकार्य करणार आहेत असे कुलगुरू प्रा.पाटील यांनी सांगितले. विद्यापीठाच्या नामविस्तारानंतर हा दुसरा ऐतिहासिक प्रसंग असल्याचे ते म्हणाल़ेशहादा, अक्राणी, धडगाव आणि अक्कलकुवा या चार तालुक्यांमधील १०० गावांमध्ये टप्प्याटप्प्यात उपक्रम राबविले जाणार असून या मध्ये सौरउर्जा, शुध्द पेयजल, पर्यावरणपुरक घरगुती इंधन तंत्रज्ञान, जौविक खते, औषधी वनस्पतींची उती संवर्धनाद्वारे शेती, पोषक अन्नद्रव्ये तंत्रज्ञान तसेच महिलांसाठी तंत्रज्ञान केंद्र यांचा समावेश असेल.आदिवासी समुहातील नवउद्योजक घडविण्यासाठी ैविज्ञान व तंत्रज्ञानावर आधारीत उद्योजक संसाधन केंद्र नंदुरबार येथे स्थापित केले जाणार आहे.या प्रकल्पाचा एक भाग म्हणून बहिस्थ शिक्षण व अध्ययन विभागाच्या वतीने सिलेज फिनीशिंग स्कूल अंतर्गत पदवी अभ्यासक्रम सुरु करण्याचे प्रस्तावित आहे, अशी माहिती डॉ. पाटणकर यांनी दिली. प्रकल्पाचे मुख्य समन्वयक प्रा. एस.टी. बेंद्रे, कार्यक्रम समन्वयक व आदिवासी अकादमीचे संचालक प्रा. ए.बी. चौधरी, उपसमन्वयक प्रा. एच.एल. तिडके, प्रा.के.एस. विश्वकर्मा, प्रा.जे.पी.बंगे, प्रा.बी.एल.चौधरी, प्रा.एस.टी. इंगळे व प्रा. एस.एन.पाटील उपस्थित होते.२४ कोटींचा निधी अपेक्षितसिलेज प्रकल्पासाठी सुमारे २४ ते २५ कोटींचा निधी अपेक्षित आहे़ पहिल्या टप्प्यातील निधीला मंजुरी मिळाली असून उर्वरित निधीही लवकरच मंजूर होईल, असे यावेळी सांगण्यात आले़ नंदुरबारातील ज्या गावांमध्ये विकासच पोहचलेला नाही, त्या गावांच्या अनुभवानुसार प्राधान्याने निवड करण्यात आली आहे़ या प्रकल्पांमध्ये स्थानिक लोकांच्या कल्पकतेला महत्त्व देऊन त्यांना संधी दिली जाणार आहे़ पंढरपुरातही हा प्रकल्प राबविला गेल्याचे राजीव गांधी तंत्रज्ञान आयोगाचे सल्लागार डॉ. अजित पाटणकर यांनी सांगितले ़ शंभरपैकी ३५ खेडी निश्चित झाल्याची माहितीही त्यांनी दिली़

टॅग्स :Jalgaonजळगाव