शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

नाम संकिर्तन साधन पै सोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 21:35 IST

वाचक हो, आपण सज्ञान झाल्यापासून व्यवहार आहे. विवाहित झाल्यापासून संसार आपल्या मागे लागला आहे. प्रपंच मागे लागला आहे. प्रपंच ...

वाचक हो, आपण सज्ञान झाल्यापासून व्यवहार आहे. विवाहित झाल्यापासून संसार आपल्या मागे लागला आहे. प्रपंच मागे लागला आहे. प्रपंच आणि तंटा आणि मंदिर आणि घंटा याविषयी एक म्हणच प्रसिद्ध आहे ती अशी-देवळात घंटा आणि प्रपंचायत तंटा ।'ा संसाराला कोणी दु:खमूळ म्हणतात तर कोणी खोटा म्हणतात, पण कवयित्री बहिणाबाई म्हणतात, संसार खोटा म्हणू नाही असे सांगताता.अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नाही ।देवळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नाही ।।तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या संत आणि कवींनी कवयित्रींनी संसारात वर्णन केलेले आहे.आता मंडळी एक आहे की संसाराची, इच्छा, कामनांची पूर्तता कधी होत नाही. संसाराला अंत नाही जो मनुष्य आपल्या मनावर विजय मिळवितो त्यालाच या जगात परम सुख मिळते व त्याचा संसार पूर्णत्वाला जातो.आता संसार म्हणजे विविध प्रकारची दैनंदिन कामे, नित्य कामे नैमित्तिक कार्ये याच्या शिवाय संसार होतच नाही. मग धर्मशास्त्राने संसारामध्ये राहून परमेश्वराच्या नाम जपाचे, किर्तनाचे, कथा श्रवणाचे नियोजन करायला सांगितले आहे.आपण दैनंदिन कामाचे नियोजन विवाह, मौंज, बारसे, डोहाळे जेवण अशा नैमेतिक कामाचे नियोजन अत्यंत बारकाईने करत असतो तसेच नियोजन. सनातनी ऋषीमुनींनी सांगितले आहे ते पुढीलप्रमाणे-शतं विहाय भोक्तव्यं सहस्त्र स्रानमाचरेत् ।लक्षं विहाय दातव्यं कोटि त्यक्त्वा हरिभजेत् ।।अर्थ :- माणसाने शंभर कामे सोडून जेवण करावे. हजार कामे सोडून स्रान (आंघोळ) करावे. एक लाख कामे सोडून दान करावे आणि कोटी कामे सोडून भगवंताचे स्मरण करावे.यात सर्वाधिक संख्या कोटी आहे. म्हणून मनुष्याने आपल्याला मिळालेल्या या श्रेष्ठ अश्या मानव शरीराने भगवंताची सेवा करावी, मुखाने नामचिंतन करावे, पायाने पंढरीची वारी करावी, हाताने भगवंताच्या किर्तनात नाम जपात टाळी वाजवावी. डोळ्यांनी भगवंताचे सुंदर ध्यान करावे. मन भगवंताच्या ठायी लीन करावे म्हणूनच संत म्हणतात.नाम संकिर्तन साधन पै सोपेजळतील पापे जन्मांतरीचीन लभती सायास जावे वनांतरासुखे येतो घरा नारायणठायीच बैसोनी करा एकचित्तआवडी अनंत आळवावा ।तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनीशहाणा तो धनी घेतो येथेकवयित्री बहिणाबाई म्हणतात जे तोंड देवाचे नाव घेत नाही त्याला तोंड म्हणू नये.हरी नामाईन बोलो। त्याले तोंड म्हणू नई ।मराठी सुभाषित कार वर्णन करतात.अहो येता जाता, उठत बसता कार्य करिता ।सदा देता घेता वदनी वदता ग्रास गिळता ।।घरी दारी शय्येवरी रतिसुखाचे अवसरी ।समस्तांची लज्जा त्यजुनी भगवत चिंतन करी ।।अशा प्रकारे नाममहात्म्य सर्व संतांनी सांगितले आहे. श्रीमद् भागवत ग्रंथांची समाप्ती सुद्धा नाम संकिर्तनाने (नाम - माहात्माने) झालेली आहे.श्लोक : भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते ।तथा कुरुष्व देवेष नाथस्त्वनो यत:प्रभो ।।नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं ।प्रणामो दु:ख शमनस्त्वं तं नमामि हरिपरम् ।।अर्थ :- हे भगवान श्रीकृष्णा तुझ्या चरण कमलावर आमचा भक्तीभाव व उत्पन्न होऊ दे.आमच्या मुखातून सदैव तुझे नाम येत राहो कारण तुझे नामसंकिर्तन सर्व प्रकारच्या दु:खाचा नाश करणारे आहे. म्हणून आम्ही अत्यंत श्रेष्ठ अशा तुझ्या चरण कमलांना वारंवार नमस्कार करतो.चला तर मग ! आपणही भगवंताचे नामस्मरण करून या संसाररूपी भवसागरातून जाऊ या !- दादा महाराज जोशी, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव