शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

अमळनेर येथे पाण्याअभावी शाळेत शिजलाच नाही पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:43 IST

दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली असून, शहरातही पावसाचे आगमन लांबल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. अशातच खिचडी शिजवायला पाणी नसल्याने अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन शाळांमध्ये पोषण आहारच शिजला नाही.

ठळक मुद्देसानेगुुरुजी विद्यालयातील प्रकारपाणी पुरविण्याची संस्थेची मागणी

अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली असून, शहरातही पावसाचे आगमन लांबल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. अशातच खिचडी शिजवायला पाणी नसल्याने अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन शाळांमध्ये पोषण आहारच शिजला नाही. त्यामुळे मुले आहारपासून वंचित राहिल्याची खंत संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त दिली.अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सानेगुरुजी विद्यामंदिर, सानेगुरुजी कन्या विद्यालय, सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय या तीन शाळांमध्ये ३३९५ विद्यार्थी शिकत असून पैकी २३०० विद्यार्थी शालेय पोषण आहार घेतात. १९ जून रोजी शाळेची कूपनलिका आटल्याने पाण्याची कमतरता भासू लागली म्हणून संस्थेने पालिका व तहसील कार्यालयात अर्ज देऊन पाणी मिळण्याची विनंती केली. मात्र, टंचाईची परिस्थिती असल्याने पालिका शाळेला पाणी पुरवू शकली नाही. शालेय पोषण आहाराची जबाबदारी शाळेची असल्याने संस्थेने पाण्याचे टँकर मागवून २४ जूनपर्यंत शालेय पोषण आहार शिजवला. परंतु २५ रोजी पाण्याचे टँकरदेखील मिळाले नाही. त्यामुळे शाळेत पोषण आहारच शिजला नाही. विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून बिस्किटे देण्यात आली, असेही घोरपडे यांनी सांगितले.पालिकेने अथवा शासनाने पाणी पुरवावे, अशी मागणी संस्थेने केली आहे. पाणी मिळत नाही तोपर्यंत पोषण आहाराबाबत काय निर्णय घ्यावा याबाबतचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडून मागवण्यात येईल, असेही ते म्हणाले. पाण्याअभावी जनतेचे हाल होत असताना आता पोषण आहारच मिळत नसल्याने यापासून विद्यार्थी वंचित राहत आहेत. दरम्यान, येत्या काळात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांना झाडे लावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :foodअन्नAmalnerअमळनेर