शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
4
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
5
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
6
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
7
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
8
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
9
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
10
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
11
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
12
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
13
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
14
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
15
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
16
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
17
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
18
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
19
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
20
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अमळनेर येथे पाण्याअभावी शाळेत शिजलाच नाही पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:43 IST

दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली असून, शहरातही पावसाचे आगमन लांबल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. अशातच खिचडी शिजवायला पाणी नसल्याने अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन शाळांमध्ये पोषण आहारच शिजला नाही.

ठळक मुद्देसानेगुुरुजी विद्यालयातील प्रकारपाणी पुरविण्याची संस्थेची मागणी

अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली असून, शहरातही पावसाचे आगमन लांबल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. अशातच खिचडी शिजवायला पाणी नसल्याने अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन शाळांमध्ये पोषण आहारच शिजला नाही. त्यामुळे मुले आहारपासून वंचित राहिल्याची खंत संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त दिली.अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सानेगुरुजी विद्यामंदिर, सानेगुरुजी कन्या विद्यालय, सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय या तीन शाळांमध्ये ३३९५ विद्यार्थी शिकत असून पैकी २३०० विद्यार्थी शालेय पोषण आहार घेतात. १९ जून रोजी शाळेची कूपनलिका आटल्याने पाण्याची कमतरता भासू लागली म्हणून संस्थेने पालिका व तहसील कार्यालयात अर्ज देऊन पाणी मिळण्याची विनंती केली. मात्र, टंचाईची परिस्थिती असल्याने पालिका शाळेला पाणी पुरवू शकली नाही. शालेय पोषण आहाराची जबाबदारी शाळेची असल्याने संस्थेने पाण्याचे टँकर मागवून २४ जूनपर्यंत शालेय पोषण आहार शिजवला. परंतु २५ रोजी पाण्याचे टँकरदेखील मिळाले नाही. त्यामुळे शाळेत पोषण आहारच शिजला नाही. विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून बिस्किटे देण्यात आली, असेही घोरपडे यांनी सांगितले.पालिकेने अथवा शासनाने पाणी पुरवावे, अशी मागणी संस्थेने केली आहे. पाणी मिळत नाही तोपर्यंत पोषण आहाराबाबत काय निर्णय घ्यावा याबाबतचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडून मागवण्यात येईल, असेही ते म्हणाले. पाण्याअभावी जनतेचे हाल होत असताना आता पोषण आहारच मिळत नसल्याने यापासून विद्यार्थी वंचित राहत आहेत. दरम्यान, येत्या काळात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांना झाडे लावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :foodअन्नAmalnerअमळनेर