शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

अमळनेर येथे पाण्याअभावी शाळेत शिजलाच नाही पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 18:43 IST

दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली असून, शहरातही पावसाचे आगमन लांबल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. अशातच खिचडी शिजवायला पाणी नसल्याने अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन शाळांमध्ये पोषण आहारच शिजला नाही.

ठळक मुद्देसानेगुुरुजी विद्यालयातील प्रकारपाणी पुरविण्याची संस्थेची मागणी

अमळनेर, जि.जळगाव : तालुक्यात दुष्काळाची तीव्रता अधिकच वाढली असून, शहरातही पावसाचे आगमन लांबल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. अशातच खिचडी शिजवायला पाणी नसल्याने अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या तीन शाळांमध्ये पोषण आहारच शिजला नाही. त्यामुळे मुले आहारपासून वंचित राहिल्याची खंत संस्थेचे सचिव संदीप घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त दिली.अमळनेर शिक्षण प्रसारक मंडळाच्या सानेगुरुजी विद्यामंदिर, सानेगुरुजी कन्या विद्यालय, सानेगुरुजी नूतन माध्यमिक विद्यालय या तीन शाळांमध्ये ३३९५ विद्यार्थी शिकत असून पैकी २३०० विद्यार्थी शालेय पोषण आहार घेतात. १९ जून रोजी शाळेची कूपनलिका आटल्याने पाण्याची कमतरता भासू लागली म्हणून संस्थेने पालिका व तहसील कार्यालयात अर्ज देऊन पाणी मिळण्याची विनंती केली. मात्र, टंचाईची परिस्थिती असल्याने पालिका शाळेला पाणी पुरवू शकली नाही. शालेय पोषण आहाराची जबाबदारी शाळेची असल्याने संस्थेने पाण्याचे टँकर मागवून २४ जूनपर्यंत शालेय पोषण आहार शिजवला. परंतु २५ रोजी पाण्याचे टँकरदेखील मिळाले नाही. त्यामुळे शाळेत पोषण आहारच शिजला नाही. विद्यार्थ्यांना पूरक आहार म्हणून बिस्किटे देण्यात आली, असेही घोरपडे यांनी सांगितले.पालिकेने अथवा शासनाने पाणी पुरवावे, अशी मागणी संस्थेने केली आहे. पाणी मिळत नाही तोपर्यंत पोषण आहाराबाबत काय निर्णय घ्यावा याबाबतचे मार्गदर्शन जिल्हाधिकारी व जिल्हा शिक्षणाधिकारी यांच्याकडून मागवण्यात येईल, असेही ते म्हणाले. पाण्याअभावी जनतेचे हाल होत असताना आता पोषण आहारच मिळत नसल्याने यापासून विद्यार्थी वंचित राहत आहेत. दरम्यान, येत्या काळात पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांना झाडे लावण्याचे आवाहन करण्यात येणार आहे.

 

टॅग्स :foodअन्नAmalnerअमळनेर