शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

नैया

By admin | Updated: June 25, 2017 17:57 IST

स्केचबुक या माङया स्तंभासाठी काही एक रेखाटन मी आधी करतो. त्यानंतर त्याच्या अनुषंगाने योग्य असे शब्द लिहितो.

स्केचबुक या माङया स्तंभासाठी काही एक रेखाटन मी आधी करतो. त्यानंतर त्याच्या अनुषंगाने योग्य असे शब्द लिहितो. लगबगीने, घाईने अशासाठी की जे अनेक विचार स्केच काढताना रुंजी घालतात ते हवेत विरून नको जायला! समुद्र किनारी जी विशेष बारीक रेती असते, ती कितीही प्रयत्न केला तरी ओंजळीतून सारीच्या सारी घरंगळून जाते, आपणास ते माहिती आहे. बघा, किनारा मला अगदी समोर दिसतो आहे; पण तो वाटतो तितका जवळ नाही. वल्हवणे मला जरुरीचे आहे. लगेचच्या लगेच कागदावर शब्द उतरवणेसुद्धा! नाहीतर रेतीसारखे व्हायचे! वल्हवले नाही तर डुब ठरलेली! मी तसे ते आता करतो.
 
नाव, होडी, बोट, आगबोट, ती अजस्त्र टायटॅनिकसारखी जहाजे, हे सारे मी ज्या प्रदेशात राहतो. त्याच्या फार लांबवरचे आहे. समुद्र - किनारा आणि तेथे राहणे नशिबात नाही. कुतूहल मात्र तेव्हापासूनचे आहे जेव्हा अगदी लहानपणी कोणीतरी ती टिकटिक आवाज करणारी आणि परातीतील पाण्यात गोल - गोल फिरणारी आणून दिली होती. तिच्यात बसायचे आणि लांबवर पाण्यातून प्रवासास जायचे हे तेव्हापासूनचे स्वप्नच आहे, पण ते असो. मुद्दा हा की, फार आकर्षक असते समुद्र. तो बीच, त्या लाटा, त्या होडय़ा आणि नेव्हीचे. त्या किना:यावर आदळणा:या लाटांसारख्या आनंदाला देशावरचे पारखे असतात. माङयासारख्याला याची अजिबातच कल्पना नसते की, जमिनीवर आरामात राहणा:या माझी, जीवनाकडे बघण्याची दृष्टी त्या क्वचित दिसणा:या किना:यासारखी झाली आहे. जीवन समुद्रासारखे हवे - किनारा दिसत नाही पण तिथे पोहोचायचे तर असते! तो असतो पण नेटाने वल्हवायला लागते. मध्येच हातपाय गारठून उपयोग नसतो. समुद्रासारखे अथांग आणि खोल असे माङो प्रयत्न हवेत. आपणास सांगतो, आयुष्यातल्या कोणत्याही गहन प्रश्नाचे उत्तर खा:या पाण्यात दडलेले आहे. घाम, अश्रू आणि तो समुद्र हे ते खारे पाणी..! समुद्र किनारी राहणारे किंवा नदी - तिरी राहणारे आणि त्यावरच अवलंबून असणारे अनेक जन, काळजात शहाळी ठेवतात आणि फार आनंदाने जगतात. गाणी गातात. नाचतात, उत्सव मनवतात आणि गरजा अत्यल्प ठेवत सारखे सारखे समुद्राला भेटायला जातात. त्यांना ते दर्या सगळं काही देत असतो. मुख्य म्हणजे- सदा समाधान. चेह:यावर हसी - खुशी कोणी तांडेल, नाखवा, आगरी कधी उदास दिसला आहे? ‘दरिया - दिल’ हा शब्द उगीचच प्रचलित झालेला नाही!
समुद्र आणि जहाजे - होडय़ा, ती शिडाची गलबते, ते त्या वेळचे समुद्र - चाचे यावर मला आपल्याशी आणखीनही खूप बोलावेसे वाटते हिंदी महासागराइतके! समुद्रावरचे जीवन हे संपूर्ण बेभरवशाचे असते, पण ते कणखर बनवणारेही असते. मासे गावणार? माहीत नाही. होडी सुखरूप परत येणार? माहीत नाही. केव्हा तुफान उठणार? माहीत नाही. पण असे असताना हे नाखवे जायचे टाळतात का? नाही.. समुद्र त्यांच्यावर माया करतो. तोच सारे काही देतो - मोती, मासे आणि मनगट! समुद्राकडे नुसते उभे राहून बघत बसलो तर किनारा कधीच गवसणार नाही. त्यासाठी कोळी बांधवांना पाण्यात जावेच लागते. समुद्राची गाज आणि आत्म्याचा आवाज एक करावाच लागतो. ते भारी संगीत असते! शिडांवर किंवा हातातल्या वल्ह्यांवर अवलंबून असणारी ही नाखवा जमात, सगळ्यात जास्त टिकणार आहे असे मला वाटते. जहाजात पाणी आणि डोक्यात नकारात्मक विचार शिरले तर अंत निश्चित असतो. किना:यावर होडय़ा, जहाजे असतात आणि त्यांना कशाचाही धोका संभवतच नाही, अगदी सेफ असतात, तीपण मग त्यांचा काहीच उपयोगही नसतो.
असो. लांबत चालले आहे. एक छान कोट आहे. किनारा असतोच. साथी भेटतोच. बस् आपण आपले ‘माझी’ असायला हवे. आपली नैया तो केवट पार करणार आहे याची आपल्याला त्या सागराइतकीच गहिरी आणि खोलवरची आशा असायला हवी - दॅट्स ऑल.! - प्रदीप रस्से