शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

आता विकास दाखवावाच लागणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:35 IST

केंद्र, राज्य एकाच पक्षाचे असूनही विकास कामे करवून घेण्यात अपयश आल्यानेच भाजपची झाली दमछाक, ईडीचा धाक आणि मेगाभरतीच्या वादळाने गोंधळलेला, गांगरलेला विरोधी पक्ष ताकदीने मैदानात उतरलाच नाही

मिलिंद कुलकर्णीअवघ्या चार महिन्यांपूर्वी खान्देशातील लोकसभेच्या चारही जागा मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या भाजपला घवघवीत यश तर सोडून द्या, २०१४ ची कामगिरीदेखील करता आली नाही. ईडीचा धाक आणि मेगाभरतीच्या वादळाने विरोधी पक्ष गोंधळलेला होता, तो जर मजबुतीने लढला असता तर भाजपची अवस्था आणखी बिकट झाली असती. मैदानात विरोधकच दिसत नाही, ही भाजप नेतृत्वाची शेखी किती फोल होती, हे निकालातून दिसून आले. विकास कामे न झाल्याने भाजप आणि शिवसेनेला हा फटका बसला आहे. आता कामे केली तरच धडगत आहे, असा स्पष्ट संदेश या निवडणुकीने दिला आहे.खान्देशातील निवडणुकीने काही बाबी ठळकपणे समोर आणल्या आहेत, त्याचा गांभीर्याने सर्वच राजकीय पक्ष, नेत्यांनी विचार केला तर पुढीच वाटचाल सुकर होणार आहे. अन्यथा यंदाच्या निवडणुकीपेक्षा बिकट स्थिती होण्याची वेळ फार दूर राहणार नाही.भाजपकडे दोन मंत्रिपदे होती. जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण ही महत्त्वपूर्ण खाती गिरीश महाजन यांच्याकडे तर पर्यटन, रोजगार हमी योजना, अन्न व औषधी प्रशासन ही खाती जयकुमार रावल यांच्याकडे होती. शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्याकडे सहकार राज्यमंत्रीपद होते. रावलांकडे नंदुरबार तर महाजन यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद होते. सेनेच्या दादा भुसे यांच्याकडे धुळ्याचे पालकमंत्रीपद होते.केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी आणला, विविध योजना खेचून आणल्या असा दावा या मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी केला. पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्टÑीय अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष यांनी प्रचार सभा घेऊन ७० वर्षे झाला नाही, एवढा विकास आम्ही पाच वर्षांत केला, असा दावा केला. परंतु, जनतेला तो पटलेला दिसत नाही. अन्यथा २० पैकी ८ जागांवर समाधान मानावे लागले नसते. शिवसेनेने जळगावात चांगली कामगिरी केली असली तरी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात खाते उघडता आलेले नाही, हे दुर्लक्षून चालणार नाही.विरोधी पक्षाचा विचार केला, तर भाजप-सेनेच्या वादळापुढे हे पक्ष सक्षमपणे निवडणुकांना सामोरा गेलेच नाहीत, असे वातावरण होते. राष्टÑवादी काँग्रेसने मुक्ताईनगरची खेळी वगळता अन्यत्र काही प्रयोगदेखील करुन पाहायचे नाकारले. काही जागांवर उमेदवारदेखील मिळाले नाही, बळजबरीने उमेदवारी देण्यात आली. अमळनेरचे अनिल भाईदास पाटील या तीन वर्षांपूर्वी भाजपमधून आलेल्या नेत्याने पक्षाला यश मिळवून दिले, हे लक्षात घ्यायला हवे.काँग्रेसची अवस्था त्या मानाने बरी आहे. आवाका ओळखून पक्षाने निर्णय घेतले आणि समाधानकारक कामगिरी केली. अर्थात ती पक्षाची किती आणि नेत्यांची वैयक्तिक किती हा प्रश्न संशोधनाचा ठरावा. अमरीशभाई पटेल आणि चंद्रकांत रघुवंशी, माणिकराव गावीत, शिवाजीराव दहिते हे दिग्गज नेते ऐन निवडणुकीत पक्ष सोडून गेले. धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा गड खिळखिळा झाला. शिरीष नाईक, के.सी.पाडवी आणि कुणाल पाटील हे तिन्ही उमेदवार हे पक्षापेक्षाही व्यक्तीगत आणि कौटुंबिक कर्तृत्वाने निवडून आले. रावेरमधून शिरीष चौधरी हेदेखील त्याला अपवाद नाही.निवडणुका संपल्या. आता पक्षभेद विसरुन खान्देशातील विकासविषयक मुद्यांवर काम झाले तरच पुढील निवडणुकीमध्ये जनता उभे करेल. अन्यथा भल्याभल्यांना आडवे केलेले आपण पाहिलेच आहे.पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा, ३७० कलम हटविणे या दोन मुद्यांभोवती निवडणूक केंद्रित करण्याचा भाजपचा प्रयत्न पुरता फसला. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, दळणवळणाची गंभीर झालेली समस्या, कायदा व सुव्यवस्थेचा वाजलेला बोºया हे मुद्दे विरोधकांनी लावून न धरता देखील जनतेला या प्रश्नांवरील डोळेझाक पसंत पडली नाही. रस्त्यातील खड्डा बुजवता येत नाही, धड सुविधा देत नाही आणि किती दिवस कोट्यवधींच्या निधीच्या गमजा माराल, हे वास्तव त्यांच्यासमोर होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव