शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता विकास दाखवावाच लागणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:35 IST

केंद्र, राज्य एकाच पक्षाचे असूनही विकास कामे करवून घेण्यात अपयश आल्यानेच भाजपची झाली दमछाक, ईडीचा धाक आणि मेगाभरतीच्या वादळाने गोंधळलेला, गांगरलेला विरोधी पक्ष ताकदीने मैदानात उतरलाच नाही

मिलिंद कुलकर्णीअवघ्या चार महिन्यांपूर्वी खान्देशातील लोकसभेच्या चारही जागा मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या भाजपला घवघवीत यश तर सोडून द्या, २०१४ ची कामगिरीदेखील करता आली नाही. ईडीचा धाक आणि मेगाभरतीच्या वादळाने विरोधी पक्ष गोंधळलेला होता, तो जर मजबुतीने लढला असता तर भाजपची अवस्था आणखी बिकट झाली असती. मैदानात विरोधकच दिसत नाही, ही भाजप नेतृत्वाची शेखी किती फोल होती, हे निकालातून दिसून आले. विकास कामे न झाल्याने भाजप आणि शिवसेनेला हा फटका बसला आहे. आता कामे केली तरच धडगत आहे, असा स्पष्ट संदेश या निवडणुकीने दिला आहे.खान्देशातील निवडणुकीने काही बाबी ठळकपणे समोर आणल्या आहेत, त्याचा गांभीर्याने सर्वच राजकीय पक्ष, नेत्यांनी विचार केला तर पुढीच वाटचाल सुकर होणार आहे. अन्यथा यंदाच्या निवडणुकीपेक्षा बिकट स्थिती होण्याची वेळ फार दूर राहणार नाही.भाजपकडे दोन मंत्रिपदे होती. जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण ही महत्त्वपूर्ण खाती गिरीश महाजन यांच्याकडे तर पर्यटन, रोजगार हमी योजना, अन्न व औषधी प्रशासन ही खाती जयकुमार रावल यांच्याकडे होती. शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्याकडे सहकार राज्यमंत्रीपद होते. रावलांकडे नंदुरबार तर महाजन यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद होते. सेनेच्या दादा भुसे यांच्याकडे धुळ्याचे पालकमंत्रीपद होते.केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी आणला, विविध योजना खेचून आणल्या असा दावा या मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी केला. पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्टÑीय अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष यांनी प्रचार सभा घेऊन ७० वर्षे झाला नाही, एवढा विकास आम्ही पाच वर्षांत केला, असा दावा केला. परंतु, जनतेला तो पटलेला दिसत नाही. अन्यथा २० पैकी ८ जागांवर समाधान मानावे लागले नसते. शिवसेनेने जळगावात चांगली कामगिरी केली असली तरी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात खाते उघडता आलेले नाही, हे दुर्लक्षून चालणार नाही.विरोधी पक्षाचा विचार केला, तर भाजप-सेनेच्या वादळापुढे हे पक्ष सक्षमपणे निवडणुकांना सामोरा गेलेच नाहीत, असे वातावरण होते. राष्टÑवादी काँग्रेसने मुक्ताईनगरची खेळी वगळता अन्यत्र काही प्रयोगदेखील करुन पाहायचे नाकारले. काही जागांवर उमेदवारदेखील मिळाले नाही, बळजबरीने उमेदवारी देण्यात आली. अमळनेरचे अनिल भाईदास पाटील या तीन वर्षांपूर्वी भाजपमधून आलेल्या नेत्याने पक्षाला यश मिळवून दिले, हे लक्षात घ्यायला हवे.काँग्रेसची अवस्था त्या मानाने बरी आहे. आवाका ओळखून पक्षाने निर्णय घेतले आणि समाधानकारक कामगिरी केली. अर्थात ती पक्षाची किती आणि नेत्यांची वैयक्तिक किती हा प्रश्न संशोधनाचा ठरावा. अमरीशभाई पटेल आणि चंद्रकांत रघुवंशी, माणिकराव गावीत, शिवाजीराव दहिते हे दिग्गज नेते ऐन निवडणुकीत पक्ष सोडून गेले. धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा गड खिळखिळा झाला. शिरीष नाईक, के.सी.पाडवी आणि कुणाल पाटील हे तिन्ही उमेदवार हे पक्षापेक्षाही व्यक्तीगत आणि कौटुंबिक कर्तृत्वाने निवडून आले. रावेरमधून शिरीष चौधरी हेदेखील त्याला अपवाद नाही.निवडणुका संपल्या. आता पक्षभेद विसरुन खान्देशातील विकासविषयक मुद्यांवर काम झाले तरच पुढील निवडणुकीमध्ये जनता उभे करेल. अन्यथा भल्याभल्यांना आडवे केलेले आपण पाहिलेच आहे.पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा, ३७० कलम हटविणे या दोन मुद्यांभोवती निवडणूक केंद्रित करण्याचा भाजपचा प्रयत्न पुरता फसला. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, दळणवळणाची गंभीर झालेली समस्या, कायदा व सुव्यवस्थेचा वाजलेला बोºया हे मुद्दे विरोधकांनी लावून न धरता देखील जनतेला या प्रश्नांवरील डोळेझाक पसंत पडली नाही. रस्त्यातील खड्डा बुजवता येत नाही, धड सुविधा देत नाही आणि किती दिवस कोट्यवधींच्या निधीच्या गमजा माराल, हे वास्तव त्यांच्यासमोर होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव