शहरं
Join us  
Trending Stories
1
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
2
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
3
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
4
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
5
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
6
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
7
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
8
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
9
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
10
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
11
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
12
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ
13
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
14
एका श्वानामुळे तब्बल अर्धा तास रखडली ट्रेन, प्रवाशांचाही उडाला गोंधळ! नेमकं झालं तरी काय?
15
सुवर्णसंधी! BSF मध्ये हेड काँन्स्टेबल पदांवर मेगाभरती; या तारखेपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया
16
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
17
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
18
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
19
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
20
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?

आता विकास दाखवावाच लागणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 12:35 IST

केंद्र, राज्य एकाच पक्षाचे असूनही विकास कामे करवून घेण्यात अपयश आल्यानेच भाजपची झाली दमछाक, ईडीचा धाक आणि मेगाभरतीच्या वादळाने गोंधळलेला, गांगरलेला विरोधी पक्ष ताकदीने मैदानात उतरलाच नाही

मिलिंद कुलकर्णीअवघ्या चार महिन्यांपूर्वी खान्देशातील लोकसभेच्या चारही जागा मोठ्या फरकाने जिंकणाऱ्या भाजपला घवघवीत यश तर सोडून द्या, २०१४ ची कामगिरीदेखील करता आली नाही. ईडीचा धाक आणि मेगाभरतीच्या वादळाने विरोधी पक्ष गोंधळलेला होता, तो जर मजबुतीने लढला असता तर भाजपची अवस्था आणखी बिकट झाली असती. मैदानात विरोधकच दिसत नाही, ही भाजप नेतृत्वाची शेखी किती फोल होती, हे निकालातून दिसून आले. विकास कामे न झाल्याने भाजप आणि शिवसेनेला हा फटका बसला आहे. आता कामे केली तरच धडगत आहे, असा स्पष्ट संदेश या निवडणुकीने दिला आहे.खान्देशातील निवडणुकीने काही बाबी ठळकपणे समोर आणल्या आहेत, त्याचा गांभीर्याने सर्वच राजकीय पक्ष, नेत्यांनी विचार केला तर पुढीच वाटचाल सुकर होणार आहे. अन्यथा यंदाच्या निवडणुकीपेक्षा बिकट स्थिती होण्याची वेळ फार दूर राहणार नाही.भाजपकडे दोन मंत्रिपदे होती. जलसंपदा, वैद्यकीय शिक्षण ही महत्त्वपूर्ण खाती गिरीश महाजन यांच्याकडे तर पर्यटन, रोजगार हमी योजना, अन्न व औषधी प्रशासन ही खाती जयकुमार रावल यांच्याकडे होती. शिवसेनेचे गुलाबराव पाटील यांच्याकडे सहकार राज्यमंत्रीपद होते. रावलांकडे नंदुरबार तर महाजन यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रीपद होते. सेनेच्या दादा भुसे यांच्याकडे धुळ्याचे पालकमंत्रीपद होते.केंद्र व राज्य सरकारकडून कोट्यवधीचा निधी आणला, विविध योजना खेचून आणल्या असा दावा या मंत्री आणि लोकप्रतिनिधींनी केला. पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्टÑीय अध्यक्ष, कार्यकारी अध्यक्ष यांनी प्रचार सभा घेऊन ७० वर्षे झाला नाही, एवढा विकास आम्ही पाच वर्षांत केला, असा दावा केला. परंतु, जनतेला तो पटलेला दिसत नाही. अन्यथा २० पैकी ८ जागांवर समाधान मानावे लागले नसते. शिवसेनेने जळगावात चांगली कामगिरी केली असली तरी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात खाते उघडता आलेले नाही, हे दुर्लक्षून चालणार नाही.विरोधी पक्षाचा विचार केला, तर भाजप-सेनेच्या वादळापुढे हे पक्ष सक्षमपणे निवडणुकांना सामोरा गेलेच नाहीत, असे वातावरण होते. राष्टÑवादी काँग्रेसने मुक्ताईनगरची खेळी वगळता अन्यत्र काही प्रयोगदेखील करुन पाहायचे नाकारले. काही जागांवर उमेदवारदेखील मिळाले नाही, बळजबरीने उमेदवारी देण्यात आली. अमळनेरचे अनिल भाईदास पाटील या तीन वर्षांपूर्वी भाजपमधून आलेल्या नेत्याने पक्षाला यश मिळवून दिले, हे लक्षात घ्यायला हवे.काँग्रेसची अवस्था त्या मानाने बरी आहे. आवाका ओळखून पक्षाने निर्णय घेतले आणि समाधानकारक कामगिरी केली. अर्थात ती पक्षाची किती आणि नेत्यांची वैयक्तिक किती हा प्रश्न संशोधनाचा ठरावा. अमरीशभाई पटेल आणि चंद्रकांत रघुवंशी, माणिकराव गावीत, शिवाजीराव दहिते हे दिग्गज नेते ऐन निवडणुकीत पक्ष सोडून गेले. धुळे व नंदुरबार जिल्ह्याचा गड खिळखिळा झाला. शिरीष नाईक, के.सी.पाडवी आणि कुणाल पाटील हे तिन्ही उमेदवार हे पक्षापेक्षाही व्यक्तीगत आणि कौटुंबिक कर्तृत्वाने निवडून आले. रावेरमधून शिरीष चौधरी हेदेखील त्याला अपवाद नाही.निवडणुका संपल्या. आता पक्षभेद विसरुन खान्देशातील विकासविषयक मुद्यांवर काम झाले तरच पुढील निवडणुकीमध्ये जनता उभे करेल. अन्यथा भल्याभल्यांना आडवे केलेले आपण पाहिलेच आहे.पंतप्रधान मोदी यांचा करिष्मा, ३७० कलम हटविणे या दोन मुद्यांभोवती निवडणूक केंद्रित करण्याचा भाजपचा प्रयत्न पुरता फसला. बेरोजगारी, महागाई, शेतकऱ्यांचे प्रश्न, दळणवळणाची गंभीर झालेली समस्या, कायदा व सुव्यवस्थेचा वाजलेला बोºया हे मुद्दे विरोधकांनी लावून न धरता देखील जनतेला या प्रश्नांवरील डोळेझाक पसंत पडली नाही. रस्त्यातील खड्डा बुजवता येत नाही, धड सुविधा देत नाही आणि किती दिवस कोट्यवधींच्या निधीच्या गमजा माराल, हे वास्तव त्यांच्यासमोर होते.

टॅग्स :PoliticsराजकारणJalgaonजळगाव