शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

गाळेधारकांवर कारवाई सोडून मनपाचा ‘गांधीगिरी’चा स्टंट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 13:25 IST

आवाहनाला केराची टोपली : कारवाईचा इशारा देवूनही भाड्याची रक्कम मिळेना

जळगाव : मनपा प्रशासनाकडून मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना थकित भाड्याची रक्कम भरण्यासाठी दहा दिवसांचा अल्टीमेटम दिल्यावरही गाळेधारकांनी थकित रक्कम भरली नाही. त्यामुळे आता शनिवारी मनपाचे अधिकारी महात्मा फुले मार्केटसह इतर मार्केटमध्ये जावून गाळेधारकांना गुलाबपुष्प देवून भाडे भरण्यासाठी ‘गांधीगिरी’चा स्टंट करणार आहेत. सर्वाेच्च न्यायालयाचे कारवाईचे आदेश असतानादेखील गाळेधारकांवर कारवाई सोडून मनपाकडून गांधीगिरीचा स्टंंट करण्याचा नेमका उद्देश काय ? असा प्रश्न होत आहे.मनपा मालकीच्या मुदत संपलेल्या मार्केटच्या गाळेधारकांकडे गेल्या सात वर्षांपासून भाड्याची रक्कम थकीत आहे. याबाबत मनपा प्रशासनाने सोमवारी े जाहीर नोटीस देवून गाळेधारकांना दहा दिवसाच्या आत थकीत रक्कम भरण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, चार दिवस उलटले तरी एकाही गाळेधारकाने भाड्याची रक्कम भरलेली नाही.आवाहन केल्यावरही थकित रक्कम मिळत नसल्याने शुक्रवारी मनपा आयुक्त उदय टेकाळे यांनी तिन्ही उपायुक्तांच्या उपस्थितीत विभागप्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत शनिवारी महात्मा फुले मार्केटमध्ये जावून गाळेधारकांना गुलाबपुष्प देवून थकीत रक्कम देण्याचे आवाहन करण्याचा सूचना आयुक्तांनी दिल्याची माहिती मनपाच्या विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.कारवाईची हिंमत सोडून, गांधीगिरीची गरजच काय ?मनपाकडून आतापर्यंत अनेकवेळा गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्यासाठी इशारे देण्यात आले आहे. तत्कालीन प्रभारी आयुक्त किशोर राजे निंबाळकर, चंद्रकांत डांगे यांनीदेखील ही रक्कम भरण्यासाठी अल्टीमेटम दिला होता. मात्र, तेव्हाही गाळेधारकांनी थकीत रक्कम भरलीच नव्हती. किशोर राजे निंबाळकरांनी काही बंद गाळे सील करून सहकारी संस्था, सरकारी कार्यालयांकडून २२ कोटींची थकबाकी वसुल केली होती. मात्र, आतापर्यंत थकबाकी वसुल करण्यात मनपाला अपयश आले आहे. मुदत संपलेल्या गाळेधारकांवर कारवाई करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही मनपा गांधीगिरीचे स्टंट का करत आहे? हे समजण्यापलीकडे आहे.गाळेधारकांचा शासनावर भरोसा कायममनपाकडून देण्यात आलेल्या दहा दिवसांच्या अल्टीमेटमबाबत गाळेधारकांवर कुठलाही परिणाम झालेला नाही. गाळेधारकांचा शासनावर भरोसा कायम असून, सोमवारीच पालकमंत्री गिरीश महाजन यांनी आठवडाभरात गाळेधारकांचा प्रश्न सोडविण्याचे आवाहन केले असल्याने जोपर्यंत शासनाचा सकारात्मक निर्णय येत नाही, तोवर भाडे न भरण्याची भूमिका गाळेधारकांची आहे. तसेच शासनाने मनपा अधिनियमात केलेल्या बदलावर दाखल केलेल्या हरकतींबाबत काय निर्णय होतो, याकडेही गाळेधारकांचे लक्ष लागले असल्याने गाळेधारक मनपाच्या इशाऱ्याला जुमानतील, असे सध्या तरी चित्र दिसून येत नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव