शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

उद्योजकांच्या विनंतीनंतर नवीन स्मशानभूमीच्या जागेत महापालिकेने केला बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी देखील जागा शिल्लक नसल्याने महापालिका प्रशासनाकडून एमआयडीसी मध्ये नवीन स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मात्र स्थानिकांच्या विरोधानंतर व उद्योजकांनी केलेल्या आग्रहानंतर महापालिका प्रशासनाने स्मशानभूमीचे काम थांबवून नवीन जागेवर सोमवारपासून स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात केली असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी पवन पाटील यांनी दिली आहे.

शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी जागाच शिल्लक राहत नसल्याचे चित्र गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना मृतदेहासोबत तासन तास थांबून वाट पाहावी लागत आहे. महापालिका प्रशासनाने एमआयडीसी भागातील जी सेक्टर मध्ये एका मोकळ्या जागेवर नवीन स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र या भागात रहिवास जास्त असल्याने व काही कारखाने असल्याने स्थानिक नागरिकांनी या स्मशानभूमीच्या कामाला विरोध केला होता. तसेच काही उद्योजकांनी देखील या जागे व्यतिरिक्त इतर जागेवर नवीन स्मशानभूमीचे काम करावे अशी विनंती महापालिका प्रशासनाकडे केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आधी सुरू केलेले काम थांबवून आता सोमवारपासून ई सेक्टर मध्ये नवीन स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात केली आहे. दोन दिवसात हे काम पूर्ण होणार असून याठिकाणी सात ओटे तयार करण्यात येणार आहेत.

स्मशानभूमीच्या कामामुळे नाले सफाईचा मुहूर्त हुकला

महापालिका प्रशासनाने नवीन स्मशानभूमीच्या कामासाठी तिन्ही जेसीबी कामाला लावले असून, यामुळे सोमवारपासून शहरातील नाले सफाईच्या कामाला होणारी सुरुवात थांबली आहे. मान्सून पूर्वतयारीसाठी महापालिका प्रशासनाकडून शहरातील ७२ छोट्या नाल्यांच्या सफाईला सुरुवात केली जाणार होती. मात्र स्मशानभूमीच्या कामामुळे नाल्यांच्या सफाईचा मुहूर्त हुकला आहे. स्मशानभूमीचे काम आटोपल्यानंतर शहरातील नाल्यांच्या साफसफाईला सुरुवात होणार असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी पवन पाटील यांनी दिली. दरम्यान शहरातील पाच मुख्य नाल्यांच्या साफसफाईसाठी देखील महापालिका प्रशासनाकडून अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. यासाठी पुढील आठवड्यात मनपाकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार असून मे अखेरपर्यंत शहरातील मुख्य नाल्यांची साफसफाई देखील करण्यात येणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.