शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक : शिवसेनेने भूमिका बदलल्याने काँग्रेस रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 12:48 IST

विनायकराव देशमुख यांची माहिती

जळगाव : मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी अर्ज मागे घेण्याबाबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्याने कॉंग्रेसच्या उमेदवाराचीही उमेदवारी कायम ठेवण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस तथा जिल्हा प्रभारी विनायकराव देशमुख यांनी दिली.मुक्ताईनगर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी शिवसेना, काँग्रेस, मनसे यांची महाआघाडी झाली असली तरी तेथे नगराध्यक्षपदासाठी शिवसेना व काँग्रेस दोन्हीही पक्षांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. त्या पार्श्वभूमीवर विनायकराव देशमुख यांच्याशी चर्चा केली असता ते म्हणाले, महाआघाडी करताना शिवसेनेला जास्त जागा देणे व अध्यक्षपद कॉंग्रेसकडे ठेवणे असे चर्चेत ठरले होते. त्यानुसार शिवसेनेला ९ व काँग्रेसने सहा जागा वाटप करून घेतल्या.अर्ज दाखल झाल्यानंतर माजी मंत्री एकनाथराव खडसे काही तांत्रिक बाबीतून अडचणीत आणू शकतात, असे सांगत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी नगराध्यक्षपदासाठी शिवसेना व काँग्रेस असे दोन्ही पक्षाच्या उमेदवारांचे अर्ज भरून ठेवण्याचे सूचविले. त्यानुसार अर्ज दाखल करण्यात आले. मात्र ऐनवेळी चंद्रकांत पाटील यांनी भूमिका बदलली व अर्ज मागे घेतला नाही. त्यामुळे आम्हीही उमेदवारी कायम ठेवली, असे विनायकराव देशमुख यांनी स्पष्ट केले.एकवेळ राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार असता तर त्यास काँग्रेसने पाठिंबा दिला असता, मात्र शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला तर राज्यात चुकीचा संदेश जाईल, असेही देशमुख यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकJalgaonजळगाव