शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

भडगाव येथील गिरणा नदीवरील मातीचा कच्चा बंधारा पाण्यात फुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 19:49 IST

गिरणा नदीवर बांधलेल्या मातीच्या कच्च्या बंधाऱ्याचा काही भाग गिरणा नदीला सोडलेल्या पाण्यामुळे २० रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास वाहून गेला आहे.

भडगाव, जि.जळगाव : शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पालिकेने तीन वर्षांपूर्वी येथील गिरणा नदीवर बांधलेल्या मातीच्या कच्च्या बंधाऱ्याचा काही भाग गिरणा नदीला सोडलेल्या पाण्यामुळे २० रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास वाहून गेला आहे. यामुळे पालिकेने कच्च्या बंधाºयावर केलेला खर्च वाया गेला आहे.भडगाव शहरात पक्का बंधारा नाही. ग्रामपंचायतीच्या काळाप्रमाणेच पालिकेने निधी खर्चून येथील गिरणा नदीवर मातीचा कच्चा बंधारा बांधला होता. हा बंधारा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी मोलाचा ठरतो. मागील काळात गिरणा नदीच्या पुरात हा मातीचा कच्चा बंधारा वाहिल्याने नुकसान झाले होते. पालिकेने हा बंधारा दुरुस्त केल्याने बंधाºयात गिरणेच्या आवर्तनाच्या पाण्याने शहराच्या पिण्याच्या पाण्याची तहान भागत होती. दुष्काळी काळातही हा बंधारा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी फायद्याचा ठरला आहे. या महिन्यात परिसरात झालेल्या पावसाच्या पुराने हा बंधारा बराच जलाशयाने भरला होता. मात्र गिरणा धरणातून सोडलेल्या पाण्याने या मातीच्या बंधाºयाचा काही भाग वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. नदीवरील काही भाग दगडी, सिमेंटची भिंत असल्याने काही भाग सुरक्षित आहे. गिरणा धरणातून सध्या गिरणा नदीला ४००० क्युसेस पाणी सोडले आहे. अजून पाणी सुटल्यास किंवा याच पाण्याच्या प्रवाहात बंधाºयाचा उर्वरित मातीचा भाग वाहून जाण्याची भीती आहे. गिरणा नदीवर पालिकेने निधी खर्चून बांधलेला कच्चा बंधारा शहरासाठी फायद्याचा ठरत होता. मात्र हा बंधारा फुटत असून वाहत आहे. त्यामुळे भडगावला पक्का बंधारा होण्यापूर्वीच हा कच्चा बंधारा फुटल्याने, वाहिल्याने पालिकेने खर्च केलेला पैसा पाण्यात वाहून गेला आहे.भडगावला पक्का बंधारा झाला असता तर आज ही वेळ आली नसती, अशी शहरातील नागरिकात चर्चा आहे. या बंधाºयावर मासे पकडण्यासाठी मासेमारी करण्यासाठी सध्या गर्दी होत आहे. बंधाºयावर नागरिकांची एकच गर्दी उसळली आहे. 

टॅग्स :RainपाऊसBhadgaon भडगाव