शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

मातृदिन विशेष- काबाडकष्ट करून दोघा मुलांना दाखविला यशाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:49 IST

आपल्या यशात पती प्रभाकर किसन पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रमिलाबाई प्रभाकर पाटील यांनी अभिमानाने सांगितले. 

चंद्रमणी इंगळे                   हरताळा, ता. मुक्ताईनगर : ग्रामीण भागातील महिलांना केवळ शेतमजुरीवर अवलंबून राहून परिवाराचा गाडा ओढत  खूपच समस्यांना तोंड द्यावे लागते. हे काम करीत असताना काही माता  मुलांच्या भविष्यासाठीही रक्ताचे पाणी करताना दिसतात. अशाच येथील एका महिलेने अगदी शेतमजुरी व काबाडकष्ट करून कठीण परिस्थितीमधून मार्ग काढत दोघा मुलांना पोटतिडकीने शिकवले. त्यातील एक मोठा मुलगा आदर्श शिक्षक आहे. आणि दुसरा मुलगा जळगावला चार्टर्ड अकाउंटंट आहे.ही प्रेरणादायी गाथा आहे,  केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या व अपार कष्ट करीत मुलांना शिक्षण देणाऱ्या प्रमिलाबाई प्रभाकर पाटील यांची.  बैलगाडी हाकण्यासाह शेतीची सर्व कामे करीत.  त्या पिठाची गिरणीही चालवत आहेत.  केवळ दिड - दोन एकर कोरडवाहू शेती मेहनतीने बागायती केली आहे. मोठ्या कुटुंबात राहत सर्व संसाराचा गाडा  ओढताना त्यांचा सिंहाचा वाटा आहे.या कामांमध्ये त्यांना पतीचीही मोलाची साथ मिळत असल्याचे त्या सांगतात.  असे म्हटले जाते की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. मात्र, प्रभाकर किसन पाटील यांच्या बाबतीत हे थोडे उलट आहे.  आपल्या यशात पती प्रभाकर किसन पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी  अभिमानाने सांगितले. महिलांना मदत नको कामे द्यायला पाहिजे  अनेकदा समाजातील महिला पतीच्या निधनानंतर थेट परिवाराची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर दुःख उगाळत बसण्याऐवजी आम्हाला मदत नको तर आम्हाला कामे द्या.अठराविश्वे दारिद्र्य व शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या येथील प्रमिलाबाई प्रभाकर पाटील यांनी मातृ दिनानिमित्त आपले विचार मांडले. आजही शिकलेल्या तसेच कष्टकरी बाईला प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागत असल्याची त्यांची खंत आहे. महिलेचे विश्व हे पती आणि मुले इतकेच मर्यादित असते. यासाठी ती धडपडताना दिसते. विशेषत:  ग्रामीण भागात पतीच्या खांद्याला खांदा लावून टिचभर पोटासाठी अनेक महिला या परिश्रम घेताना दिसतात.

मुलांना दिले संस्कार सध्याच्या सोशल मीडियावरील व दूरसंचार संचावरील मालिकांमुळेही दुष्परिणाम होत आहेत. याला कारण केवळ समाज आणि कायदे नसून घरातील संस्कारही जबाबदार आहेत.  मुलांच्या तुलनेत मुलीला घरातच दुय्यम स्थान वागणूक मिळते. मुलगा लाडात वाढल्याने आई-वडिलांचे ऐकण्याच्या पलीकडे गेलेला  दिसतो.  यासाठी मुलगा असो की, मुलगी... आई-वडिलांनी बालपणापासूनच चांगले संस्कार आपल्या मुलांवर करणे काळाची गरज  आहे. आणि याकडे प्रमिलाबाईंनी विशेष लक्ष दिले.

‘सासू आणि तिच्या डोळ्यात आसू’  सून न टाकी तिचे गुण, पूर्वीपेक्षा वाढ दिसत आहे. पूर्वीच्या जुन्या म्हणी आजही कौटुंबिक स्थितीमध्ये सर्वांना घेऊन चालणारी परिस्थिती संस्कार करणे गरजेचे आहे. सध्या खूप धावपळीचे जग आहे. तणाव वाढलेला आहे. यावर संयमाने मार्ग काढणे सध्याची गरज आहे. -प्रमिलाबाई प्रभाकर पाटील

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेMuktainagarमुक्ताईनगर