शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मातृदिन विशेष- काबाडकष्ट करून दोघा मुलांना दाखविला यशाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 00:49 IST

आपल्या यशात पती प्रभाकर किसन पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रमिलाबाई प्रभाकर पाटील यांनी अभिमानाने सांगितले. 

चंद्रमणी इंगळे                   हरताळा, ता. मुक्ताईनगर : ग्रामीण भागातील महिलांना केवळ शेतमजुरीवर अवलंबून राहून परिवाराचा गाडा ओढत  खूपच समस्यांना तोंड द्यावे लागते. हे काम करीत असताना काही माता  मुलांच्या भविष्यासाठीही रक्ताचे पाणी करताना दिसतात. अशाच येथील एका महिलेने अगदी शेतमजुरी व काबाडकष्ट करून कठीण परिस्थितीमधून मार्ग काढत दोघा मुलांना पोटतिडकीने शिकवले. त्यातील एक मोठा मुलगा आदर्श शिक्षक आहे. आणि दुसरा मुलगा जळगावला चार्टर्ड अकाउंटंट आहे.ही प्रेरणादायी गाथा आहे,  केवळ पाचवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या व अपार कष्ट करीत मुलांना शिक्षण देणाऱ्या प्रमिलाबाई प्रभाकर पाटील यांची.  बैलगाडी हाकण्यासाह शेतीची सर्व कामे करीत.  त्या पिठाची गिरणीही चालवत आहेत.  केवळ दिड - दोन एकर कोरडवाहू शेती मेहनतीने बागायती केली आहे. मोठ्या कुटुंबात राहत सर्व संसाराचा गाडा  ओढताना त्यांचा सिंहाचा वाटा आहे.या कामांमध्ये त्यांना पतीचीही मोलाची साथ मिळत असल्याचे त्या सांगतात.  असे म्हटले जाते की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. मात्र, प्रभाकर किसन पाटील यांच्या बाबतीत हे थोडे उलट आहे.  आपल्या यशात पती प्रभाकर किसन पाटील यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी  अभिमानाने सांगितले. महिलांना मदत नको कामे द्यायला पाहिजे  अनेकदा समाजातील महिला पतीच्या निधनानंतर थेट परिवाराची जबाबदारी खांद्यावर घेतल्यानंतर दुःख उगाळत बसण्याऐवजी आम्हाला मदत नको तर आम्हाला कामे द्या.अठराविश्वे दारिद्र्य व शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या येथील प्रमिलाबाई प्रभाकर पाटील यांनी मातृ दिनानिमित्त आपले विचार मांडले. आजही शिकलेल्या तसेच कष्टकरी बाईला प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागत असल्याची त्यांची खंत आहे. महिलेचे विश्व हे पती आणि मुले इतकेच मर्यादित असते. यासाठी ती धडपडताना दिसते. विशेषत:  ग्रामीण भागात पतीच्या खांद्याला खांदा लावून टिचभर पोटासाठी अनेक महिला या परिश्रम घेताना दिसतात.

मुलांना दिले संस्कार सध्याच्या सोशल मीडियावरील व दूरसंचार संचावरील मालिकांमुळेही दुष्परिणाम होत आहेत. याला कारण केवळ समाज आणि कायदे नसून घरातील संस्कारही जबाबदार आहेत.  मुलांच्या तुलनेत मुलीला घरातच दुय्यम स्थान वागणूक मिळते. मुलगा लाडात वाढल्याने आई-वडिलांचे ऐकण्याच्या पलीकडे गेलेला  दिसतो.  यासाठी मुलगा असो की, मुलगी... आई-वडिलांनी बालपणापासूनच चांगले संस्कार आपल्या मुलांवर करणे काळाची गरज  आहे. आणि याकडे प्रमिलाबाईंनी विशेष लक्ष दिले.

‘सासू आणि तिच्या डोळ्यात आसू’  सून न टाकी तिचे गुण, पूर्वीपेक्षा वाढ दिसत आहे. पूर्वीच्या जुन्या म्हणी आजही कौटुंबिक स्थितीमध्ये सर्वांना घेऊन चालणारी परिस्थिती संस्कार करणे गरजेचे आहे. सध्या खूप धावपळीचे जग आहे. तणाव वाढलेला आहे. यावर संयमाने मार्ग काढणे सध्याची गरज आहे. -प्रमिलाबाई प्रभाकर पाटील

टॅग्स :Mothers Dayमदर्स डेMuktainagarमुक्ताईनगर