शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
2
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
3
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
4
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
5
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
6
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
7
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

बांगला देशातील मातृभाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 02:07 IST

जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शाह यांनी नुकतीच बांगला देशात भेट दिली. या भेटीवर आधारित लेखमालेतील नववा भाग ते लिहिताहेत ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत...

बांगला देशात भेटी दरम्यान ‘भाषेचे राष्ट्रीय स्मारक’ म्हणजे काय? असे विचारता त्याचा इतिहास कळला. १९५२ मध्ये पाकिस्तानने उर्दूच राष्ट्रीय भाषा राहील, असा फतवा काढला. त्याला या देशात (तेव्हाचा पूर्व पाकिस्तान) प्रचंड विरोध झाला. लोक रस्त्यावर उतरले. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पाकिस्तानने आंदोलन दडपून टाकण्यासाठी अमानुष आणि निर्दयी गोळीबार केला. त्यात हजारो विद्यार्थी शहीद झाले. लोक ठाम होते आणि भाषा टिकली. शेवटी तीच राष्ट्रीय भाषा झाली आणि वापरलीही जाते.यत्रतत्र सर्वत्र बंगाली भाषेतूनच कारभार आहे हे सर्व पाहून माझ्या अक्षरश: अंगावर काटा आला. किती महत्व असते मातृभाषेचे! जगभरचे पंडित त्याचे महत्त्व सांगत असतात. शिवाय विद्यार्थ्यांनी आंदोलन केले ही केवढी मोठी गोष्ट. मात्र आपल्याकडे माझी मायमराठी टिकून राहावी म्हणून स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवत गळे काढणा-या, तसेच मायमराठीसाठीच्या धोरणे ठरवणाऱ्या खात्याचे मंत्री व त्यातले बाबूलोक या सगळ्यांचे वर्षानुुवर्षे वागणे पाहून आपण किती निष्काळजी आहोत याची खंत वाटली. याचबरोबर हिंदी नको म्हणून आपल्या दक्षिणेकडच्या राज्यांनी इंग्रजीच हवी (हिंदी नेव्हर, इंग्लिश एव्हर) अशी घोषणा आणि पोस्टर्स लागली होती) या अनाठायी हट्टपायी पेटवलेले रानही आठवले. कुठे या एवढ्याशा देशात भाषा टिकावी म्हणून आणि आरक्षण रद्द करावे म्हणून आंदोलने करणारे विद्यार्थी आणि कुठे आपल्याकडच्या विद्यार्थ्यांच्या संघटना. या संघटनांचे राजकीयीकरण झाल्याने विद्यार्थ्यांचे आणि पयार्याने आपल्या देशाचे काही बाबतीत किती नुकसान झाले आहे त्याचीही जाणीव प्रकर्षाने झाली.या चौकात हजारोंनी तरुण मंडळी जमून बंगाली लोकसंगीतातील समूह गीते पारंपरिक वाद्यांसह म्हणत होती. सगळा चौक तरुणाईने, उत्साहाने भरून फुलून गेला होता. ज्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन होते त्यात बव्हंश पुस्तके बंगाली भाषेतीलच होती. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांमध्ये आबालवृद्ध होतेच पण स्त्रियांची संख्या लक्षणीय होती. बुरख्याची सक्ती गेली आहे हे जाणवत होतेच. काहीजणींनी बुरखा आणि हिजाब घातला होता. पण चेहरे खुले होते. या मोठ्या जमावाने तेथल्या खुलेपणावर शिक्का मोर्तब केले.ढाक्का शहरात फिरताना वाहतुकीची प्रचंड कोंडी आपल्याला अडवत राहते. कुठेही जायचे ठरवताना कोंडीतून जायला किती वेळ लागेल हे मनाशी ठरवल्याशिवाय भेटीची वेळच ठरवता येत नाही. अक्षरश: कासव गतीने वाहने चालतात. त्याविषयी भेटलेल्या लोकांशी थोड्या गप्पा मारल्या.त्यातल्या एकाने वाहतुकीचे गणित मांडले. ते असे की, सर्वत्र बहुतेक सीएनजी वापरला जातो आणि तो स्वस्त आहे. त्यामुळे वाहने चालवणे परवडते. परिणामी एकट्या ढाक्का शहरात रोज नवी १२ हजार चारचाकी वाहने रस्त्यावर येतात. शहरातील वाहतुकीचा साधारण वेग ताशी ७ कि.मी.पेक्षा जास्त राहत नाही आणि फुटपाथवर माणसांचा पायी चालण्याचा वेग ४ कि.मी. सहज असतो. म्हणजे काही दिवसांनी माणसे गाड्या सोडून पायीच जातील! ढाक्का ते नारायणगंज अंतर फक्त २४ कि.मी. आहे. पण वाहतूक कोंडीमुळे चौपदरी रस्त्यानेसुद्धा जायला कमीतकमी दीड तास तरी लागतोच. दोन्ही शहरे एकच झाली आहेत. इतकी वस्ती दोन्ही शहरांची पसरत गेली आहे. ढाक्का शहराच्या चहूबाजूंनी हीच परिस्थिती आहे. (क्रमश:)-सी.ए.अनिलकुमार शाह, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव