शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बांगला देशातील मातृभाषा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 02:07 IST

जळगाव येथील प्रसिद्ध कर सल्लागार अनिलकुमार शाह यांनी नुकतीच बांगला देशात भेट दिली. या भेटीवर आधारित लेखमालेतील नववा भाग ते लिहिताहेत ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत...

बांगला देशात भेटी दरम्यान ‘भाषेचे राष्ट्रीय स्मारक’ म्हणजे काय? असे विचारता त्याचा इतिहास कळला. १९५२ मध्ये पाकिस्तानने उर्दूच राष्ट्रीय भाषा राहील, असा फतवा काढला. त्याला या देशात (तेव्हाचा पूर्व पाकिस्तान) प्रचंड विरोध झाला. लोक रस्त्यावर उतरले. विद्यार्थी रस्त्यावर उतरले. पाकिस्तानने आंदोलन दडपून टाकण्यासाठी अमानुष आणि निर्दयी गोळीबार केला. त्यात हजारो विद्यार्थी शहीद झाले. लोक ठाम होते आणि भाषा टिकली. शेवटी तीच राष्ट्रीय भाषा झाली आणि वापरलीही जाते.यत्रतत्र सर्वत्र बंगाली भाषेतूनच कारभार आहे हे सर्व पाहून माझ्या अक्षरश: अंगावर काटा आला. किती महत्व असते मातृभाषेचे! जगभरचे पंडित त्याचे महत्त्व सांगत असतात. शिवाय विद्यार्थ्यांनी आंदोलन केले ही केवढी मोठी गोष्ट. मात्र आपल्याकडे माझी मायमराठी टिकून राहावी म्हणून स्वत:च्या मुलांना इंग्रजी शाळेत पाठवत गळे काढणा-या, तसेच मायमराठीसाठीच्या धोरणे ठरवणाऱ्या खात्याचे मंत्री व त्यातले बाबूलोक या सगळ्यांचे वर्षानुुवर्षे वागणे पाहून आपण किती निष्काळजी आहोत याची खंत वाटली. याचबरोबर हिंदी नको म्हणून आपल्या दक्षिणेकडच्या राज्यांनी इंग्रजीच हवी (हिंदी नेव्हर, इंग्लिश एव्हर) अशी घोषणा आणि पोस्टर्स लागली होती) या अनाठायी हट्टपायी पेटवलेले रानही आठवले. कुठे या एवढ्याशा देशात भाषा टिकावी म्हणून आणि आरक्षण रद्द करावे म्हणून आंदोलने करणारे विद्यार्थी आणि कुठे आपल्याकडच्या विद्यार्थ्यांच्या संघटना. या संघटनांचे राजकीयीकरण झाल्याने विद्यार्थ्यांचे आणि पयार्याने आपल्या देशाचे काही बाबतीत किती नुकसान झाले आहे त्याचीही जाणीव प्रकर्षाने झाली.या चौकात हजारोंनी तरुण मंडळी जमून बंगाली लोकसंगीतातील समूह गीते पारंपरिक वाद्यांसह म्हणत होती. सगळा चौक तरुणाईने, उत्साहाने भरून फुलून गेला होता. ज्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन होते त्यात बव्हंश पुस्तके बंगाली भाषेतीलच होती. प्रदर्शनाला भेट देणाऱ्यांमध्ये आबालवृद्ध होतेच पण स्त्रियांची संख्या लक्षणीय होती. बुरख्याची सक्ती गेली आहे हे जाणवत होतेच. काहीजणींनी बुरखा आणि हिजाब घातला होता. पण चेहरे खुले होते. या मोठ्या जमावाने तेथल्या खुलेपणावर शिक्का मोर्तब केले.ढाक्का शहरात फिरताना वाहतुकीची प्रचंड कोंडी आपल्याला अडवत राहते. कुठेही जायचे ठरवताना कोंडीतून जायला किती वेळ लागेल हे मनाशी ठरवल्याशिवाय भेटीची वेळच ठरवता येत नाही. अक्षरश: कासव गतीने वाहने चालतात. त्याविषयी भेटलेल्या लोकांशी थोड्या गप्पा मारल्या.त्यातल्या एकाने वाहतुकीचे गणित मांडले. ते असे की, सर्वत्र बहुतेक सीएनजी वापरला जातो आणि तो स्वस्त आहे. त्यामुळे वाहने चालवणे परवडते. परिणामी एकट्या ढाक्का शहरात रोज नवी १२ हजार चारचाकी वाहने रस्त्यावर येतात. शहरातील वाहतुकीचा साधारण वेग ताशी ७ कि.मी.पेक्षा जास्त राहत नाही आणि फुटपाथवर माणसांचा पायी चालण्याचा वेग ४ कि.मी. सहज असतो. म्हणजे काही दिवसांनी माणसे गाड्या सोडून पायीच जातील! ढाक्का ते नारायणगंज अंतर फक्त २४ कि.मी. आहे. पण वाहतूक कोंडीमुळे चौपदरी रस्त्यानेसुद्धा जायला कमीतकमी दीड तास तरी लागतोच. दोन्ही शहरे एकच झाली आहेत. इतकी वस्ती दोन्ही शहरांची पसरत गेली आहे. ढाक्का शहराच्या चहूबाजूंनी हीच परिस्थिती आहे. (क्रमश:)-सी.ए.अनिलकुमार शाह, जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यJalgaonजळगाव